शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पीक विमा योजनेतून फसवणूक

By admin | Updated: September 9, 2014 00:40 IST

पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची नसून फसवणूक करणारी योजना असल्याची ओड शेतकरी करीत आहे. अधिकारी, शासन व विमा कंपनीने मिळवून पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना

पुसद : पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची नसून फसवणूक करणारी योजना असल्याची ओड शेतकरी करीत आहे. अधिकारी, शासन व विमा कंपनीने मिळवून पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुबाडण्याचा गोरखधंदा सुरू केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.शेतकऱ्यांच्या हिताकरिता आणि संरक्षणाकरिता राबविण्यात येणारी पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या हिातची आहे, असा बागुलबुवा कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी शासन व विमा कंपनी मागील पाच वर्षापासून करीत आहे. प्रत्येक वर्षाला शेतकरी पीक विम्याची रक्कम भरतो. दरवर्षी शेतकऱ्यांचे काही ना काही नुकसान होते. पण शेतकऱ्यांना विम्याचा लाभ म्हणून काहीही मिळत नाही. ज्या शेतात सलग तीन वर्ष नुकसान झाले आहेत किंवा त्या परिसराची आणेवारी सतत तीन वर्ष ५० टक्क्यापेक्षा कमी होत असेल त्याला पीक विमा योजनेचा लाभ देता येईल असे बोलले जाते. शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याचे आवाहन केले आहे. खरीप हंगामात पूर, अतिवृष्टी, रोग व किडीमुळे उत्पन्न नाहीसे झाल्यास याचे लाभ मिळणार असल्याचे सांगितले जाते. पीक विमा योजनेत सहभागी घेण्यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांना आवाहन करते. त्यामुळे कृषी विभागाचे धोरण असेल तर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास निश्चित पीक विम्याचा लाभ मिळेल अशी हमी देण्यात आली व कोणाला देण्यात आली त्यांची नावे जाहीर करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांची फसवणूक व लुबाडणूक करून सर्वच मालामाल झाले आहेत व होत आहेत. विमा कंपनीने शेतकऱ्यांकरिता आखलेली पीक विमा योजनासुद्धा कृषी विभाग, शासन व विमा कंपनीद्वारे लुबाडण्याचीच सुनियोजित योजना असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. (तालुका प्रतिनिधी)