शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
3
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
4
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
5
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
6
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
7
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
9
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
10
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
11
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
12
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
13
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
14
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
15
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
16
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
17
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
18
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
19
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

राळेगाव मतदारसंघात चौरंगी लढत

By admin | Updated: October 11, 2014 02:20 IST

राळेगाव या आदिवासीसाठी राखीव विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र आहे. प्रा.वसंत पुरके यांच्यावर चार वेळा संधी मिळूनही ठोस अशी विकास कामे केली नसल्याचा आरोप केला जात आहे.

राळेगाव या आदिवासीसाठी राखीव विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र आहे. प्रा.वसंत पुरके यांच्यावर चार वेळा संधी मिळूनही ठोस अशी विकास कामे केली नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यांचे लक्ष केवळ राळेगाववरच राहिले. बाभूळगाव आणि कळंब हे दोन तालुके आणि करंजी सर्कलवर त्यांची कृपादृष्टी राहिली नाही. या बाबी त्यांच्यासाठी घातक सांगितल्या जात असल्यातरी मतदारसंघातील लोकांशी सततचा संपर्क, दादा गटाचा काँग्रेसमध्ये प्रवेश आणि विरोधकांना छुप्या पध्दतीने मदत करणाऱ्यांची मौन भूमिका या बाबी त्यांच्यासाठी जमेच्या मानल्या जातात. कळंब तालुक्यातून त्यांना किती प्रतिसाद मिळतो यावर बरेच काही अवलंबून आहे.भाजपाचे उमेदवार प्रा.डॉ. अशोक उईके हे चौथ्यांदा प्रा.पुरके यांच्याशी लढत देत आहे. मात्र ते गावागावात पक्षाचे संघटन उभे करण्यात यशस्वी झाले नाही. कार्यकर्त्यांची त्यांच्याकडे वाणवा आहे. संस्था ताब्यात मिळविण्यात त्यांना यश आले नाही. तथापि पक्षाची परंपरागत मते आणि मोदी लाट या बाबी त्यांच्यासाठी आशेचा किरण आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद एखाद्या तगड्या उमेदवाराला पराभूत करण्याइतपत नक्कीच होती. त्याचा अनुभवही काही निवडणुकांमध्ये आला आहे. परंतु यावेळचे चित्र वेगळे आहे. एक गट काँग्रेसमध्ये गेला तर विशेषत: कळंब तालुक्यातील लोकांनी कुुठे शब्द टाकणे सुुुरू केले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार मिलिंद धुर्वे यांना मोठी कसरत करावी लागत आहे. जमादार उत्तम मडावी यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यांचा या मतदारसंघात फारसा संपर्क राहिला नाही. निवडणूक प्रचार करताना त्यांना कमालीची कसरत करावी लागत आहे. शिवसैनिकांची साथ हीच त्यांच्यासाठी तेवढी जमेची बाजू आहे. याशिवाय इतर उमेदवारही आपलीच बाजू भक्कम असल्याचे सांगत मतांचा जोगवा मागत आहे. राळेगाव, कळंब, बाभूळगाव या पूर्ण तीन तालुक्यातील आणि रुंझा महसूल सर्कलमधील ४२३ गावातील साडेतीन लाखावर नागरिक या मतदारसंघात आहे. चार महत्त्वपूर्ण पक्षांचा प्रभाव मतदारसंघात थोड्याफार फरकाने सारखाच आहे. परिवर्तन हवे, नको, विकास झाला, नाही झाला, पुरकेंची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द, बेंबळा प्रकल्प, शेतमालाला दामसह शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, बेरोजगारी, पंतप्रधान मोदींची शैली आदी विविध मुद्यांवर ही निवडणूक वेगळीच रंगत घेऊ लागली आहे.