शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

राळेगाव मतदारसंघात चौरंगी लढत

By admin | Updated: October 11, 2014 02:20 IST

राळेगाव या आदिवासीसाठी राखीव विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र आहे. प्रा.वसंत पुरके यांच्यावर चार वेळा संधी मिळूनही ठोस अशी विकास कामे केली नसल्याचा आरोप केला जात आहे.

राळेगाव या आदिवासीसाठी राखीव विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र आहे. प्रा.वसंत पुरके यांच्यावर चार वेळा संधी मिळूनही ठोस अशी विकास कामे केली नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यांचे लक्ष केवळ राळेगाववरच राहिले. बाभूळगाव आणि कळंब हे दोन तालुके आणि करंजी सर्कलवर त्यांची कृपादृष्टी राहिली नाही. या बाबी त्यांच्यासाठी घातक सांगितल्या जात असल्यातरी मतदारसंघातील लोकांशी सततचा संपर्क, दादा गटाचा काँग्रेसमध्ये प्रवेश आणि विरोधकांना छुप्या पध्दतीने मदत करणाऱ्यांची मौन भूमिका या बाबी त्यांच्यासाठी जमेच्या मानल्या जातात. कळंब तालुक्यातून त्यांना किती प्रतिसाद मिळतो यावर बरेच काही अवलंबून आहे.भाजपाचे उमेदवार प्रा.डॉ. अशोक उईके हे चौथ्यांदा प्रा.पुरके यांच्याशी लढत देत आहे. मात्र ते गावागावात पक्षाचे संघटन उभे करण्यात यशस्वी झाले नाही. कार्यकर्त्यांची त्यांच्याकडे वाणवा आहे. संस्था ताब्यात मिळविण्यात त्यांना यश आले नाही. तथापि पक्षाची परंपरागत मते आणि मोदी लाट या बाबी त्यांच्यासाठी आशेचा किरण आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद एखाद्या तगड्या उमेदवाराला पराभूत करण्याइतपत नक्कीच होती. त्याचा अनुभवही काही निवडणुकांमध्ये आला आहे. परंतु यावेळचे चित्र वेगळे आहे. एक गट काँग्रेसमध्ये गेला तर विशेषत: कळंब तालुक्यातील लोकांनी कुुठे शब्द टाकणे सुुुरू केले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार मिलिंद धुर्वे यांना मोठी कसरत करावी लागत आहे. जमादार उत्तम मडावी यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यांचा या मतदारसंघात फारसा संपर्क राहिला नाही. निवडणूक प्रचार करताना त्यांना कमालीची कसरत करावी लागत आहे. शिवसैनिकांची साथ हीच त्यांच्यासाठी तेवढी जमेची बाजू आहे. याशिवाय इतर उमेदवारही आपलीच बाजू भक्कम असल्याचे सांगत मतांचा जोगवा मागत आहे. राळेगाव, कळंब, बाभूळगाव या पूर्ण तीन तालुक्यातील आणि रुंझा महसूल सर्कलमधील ४२३ गावातील साडेतीन लाखावर नागरिक या मतदारसंघात आहे. चार महत्त्वपूर्ण पक्षांचा प्रभाव मतदारसंघात थोड्याफार फरकाने सारखाच आहे. परिवर्तन हवे, नको, विकास झाला, नाही झाला, पुरकेंची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द, बेंबळा प्रकल्प, शेतमालाला दामसह शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, बेरोजगारी, पंतप्रधान मोदींची शैली आदी विविध मुद्यांवर ही निवडणूक वेगळीच रंगत घेऊ लागली आहे.