शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

फळबाग लागवडीसाठी चार लाख शेतकरी पुढे सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 13:52 IST

कृषी क्षेत्रात नवीन बदल होत आहे. आता शेतकरी पारंपारिक पिके सोडून फळबाग लागवडीकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे.

ठळक मुद्देकृषी क्षेत्रात बदलविदर्भातील शेतकऱ्यांचा पुढाकार

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कृषी क्षेत्रात नवीन बदल होत आहे. आता शेतकरी पारंपारिक पिके सोडून फळबाग लागवडीकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे. संपूर्ण राज्यात यावर्षी तब्बल चार लाख शेतकरी फळबाग लागवडीसाठी पुढे सरसावले आहे. त्यांनी आॅनलाईन प्रक्रियेतून अर्ज केले आहे. यात विदर्भातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या माध्यमातून फळबाग लागवडीसाठी राज्य सरकार अनुदान देते. त्यासाठी यंदा राज्यातून तब्बल चार लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे. यात विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी येत्या काळात विदर्भातील शेती क्षेत्रात बदलाचे चित्र दिसणार आहे. रोपवाटिका, आंबा, डाळींब, साग, आवळा, सीताफळ, बांबू आणि इतर फळ पिकांसाठी शेतकऱ्यांनी या योजनअंतर्गत अर्ज दाखल केले. फळ बाग लागवडीसोभतच जुन्या फळबागांचे पुनर्जीवन करणे, हरितगृह, एकात्मिक शेती साखळी, कांदा चाळ, मधुमक्षिका पालन आदींचा या योजनेत समावेश आहे.अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची ड्रॉ पद्धतीने निवड केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर होतील, त्यांना योजनेत सहभागी होता येणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांचा योजनेत समावेश व्हावा, अशी शासनाची अपेक्षा आहे. मात्र तेवढे अनुदान उपलब्ध नाही. यामुळे योजनेच्या उद्दीष्टाला मर्यादा आली आहे. या योजनेत सहभाग घेण्यात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आघाडीवर आहे. मात्र आता विदर्भातील शेतकरीही जागृत होत आहे. त्यांचा कल फळबाग लागवडीकडे वाढला आहे. आता या शेतकºयांना प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांसाठी जादा अनुदान उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसेच विदर्भातील शेतकरी संख्येचे उद्दीष्ट वाढवून मिळावे, अश्ी विदर्भातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.विदर्भाच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रातून १० पट अधिक अर्जफळबाग लागवड योजनेसाठी विदर्भापेक्षा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जादा अर्ज आले. विदर्भातील बुलडणा ९०००, यवतमाळ ६०००, वाशिम ३७००, अकोला ५०००, अमरावती ५०००, भंडारा ३०००, चंद्रपूर जिल्ह्यातील ६००० शेतकऱ्यांनी अर्ज केले अहे. या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रातून १० पट जादा अर्ज आले. यात सर्वाधिक आघाडीवर अहमदनगर जिल्हा आहे. तेथून तब्बल ६४ हजार अर्ज आले. औरंगाबादमधून ६० हजार, जालना ५६ हजार, नाशिक २६ हजार, सांगली १५ हजार अर्ज आले आहे. यावरून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी सर्वाधिक जागृत असल्याचे स्पष्ट होते.

टॅग्स :agricultureशेती