शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

४० टक्के शेतकऱ्यांच्या घरात कापूसच नव्हता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:00 IST

राळेगाव १७४४, वाढोणा १६००, खैरी ६१२ याप्रमाणे ३६८९ शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस विक्री करण्याकरिता नोंदणी केली होती. त्यावेळीच यापैकी अर्धी अधिक नोंदणी बोगस आहे, व्यापाऱ्यांनी आपला कापूस शेतकऱ्यांच्या नावावर विकण्याकरिता केलेली खेळी असल्याची चर्चा सुरू होती. मे, जूनच्या खरेदीत आणि सर्वेक्षणात ते त्याप्रमाणे सिद्धही झाले आहे.

ठळक मुद्देनोंदणीच्या सर्वेक्षणात बिंग फुटले : तरीही कापूस विकण्याचा गेम यशस्वी

के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : सीसीआयला कापूस विकण्याकरिता तीन हजार ६८९ शेतकऱ्यांनी राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केली होती. सहकार विभागाद्वारे याचे सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर तब्बल ४० टक्के शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक नव्हता, असे आढळून आले आहे. यावरून शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांचा कापूस विकण्याचा काही महाभागांचा डाव यशस्वी झाला नाही, असे दिसत असले तरी सर्वेक्षणापूर्वीच अर्ध्या नोंदणीतील कापूस विकला गेला होता. काही ‘पोच’ असलेल्यांनी सर्वेक्षणातही जमवून घेतले असल्याने यावेळी अनेकांनी तगडा हात मारला असल्याचे समजते.राळेगाव १७४४, वाढोणा १६००, खैरी ६१२ याप्रमाणे ३६८९ शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस विक्री करण्याकरिता नोंदणी केली होती. त्यावेळीच यापैकी अर्धी अधिक नोंदणी बोगस आहे, व्यापाऱ्यांनी आपला कापूस शेतकऱ्यांच्या नावावर विकण्याकरिता केलेली खेळी असल्याची चर्चा सुरू होती. मे, जूनच्या खरेदीत आणि सर्वेक्षणात ते त्याप्रमाणे सिद्धही झाले आहे.नोंदणी झालेल्या ८०९ शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक नसल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. त्यांच्याद्वारे २५ हजार क्विंटल कापूस सीसीआयला विकण्याचा डाव सर्वेक्षणामुळे अयशस्वी झाला आहे. पण सर्वेक्षणापूर्वी व सर्वेक्षणानंतर जमून गेल्यामुळे आणि जमवून घेतल्यामुळे अनेकजण मालामाल झाले आहे. या काळात तालुका व जिल्ह्याबाहेरूनही कापूस विक्रीस आलेला असल्याने त्यास दुजोरा मिळाला आहे. मे अखेर झालेल्या सर्वेक्षणामुळे शासन व सीसीआयचे होणारे नुकसान टळले. मात्र सुरुवातीलाच संपूर्ण नोंदणीचे सर्वेक्षण झाले असते तर नुकसानीचा आकडा आणखी कमी झाला असता.मेपूर्वी व मेमध्ये खरेदी केलेल्या वाहनात दररोज २० टक्के वाहने नोंदणी असूनही आलेली नव्हती. तर सर्वेनंतर जूनमध्ये हेच प्रमाण पाच टक्क्यांवर आले. यावरून बरेच काही स्पष्ट होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी गैरप्रकार करण्याची शक्यता नाही. हाती असलेल्या अधिकाराचा वापर स्वत:करिता आणि आपल्या लोकांकरिता काहींनी शेतकऱ्यांच्या नावावर करून घेतल्याची चर्चा गेली दोन महिन्यांपासून सर्वत्र सुरू राहिली आहे. या सपूर्ण गैरप्रकाराची चौकशी झाल्यास वास्तविकता आणि त्यामागील सूपीक डोक्यांची चेहरे पुढे येऊ शकतात.२१७० शेतकऱ्यांचे सर्वेक्षणवरिष्ठांच्या आदेशाने राळेगाव तालुक्यातील २१७० शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील ८०९ शेतकऱ्यांकडे विक्रीकरिता कापूस शिल्लक नसल्याचे आढळून आले. काही शेतकऱ्यांनी कापूस खासगीत विकला असल्याचे सांगितले. कापूस विक्रीच्या यादीत नावे दोनदा आल्याने काही शेतकऱ्यांची नावे रद्द करण्यात आली. ४४६ शेतकऱ्यांची नावे नव्याने नोंदणी करण्यात आली. त्याचेही सर्वेक्षण करण्यात आले, अशी माहिती राळेगावचे सहायक निबंधक ए.टी. खताडे यांनी दिली.राळेगाव केंद्रावर सीसीआयची सोमवारी, तर वाढोणा केंद्रावरील खैरीतील कापूस खरेदी या आठवड्यात पूर्णत्वास जाणार आहे.मेमध्ये खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे प्रथमच १०-१५ दिवसात देण्यात आले. शेतकऱ्यांना हा पैसा पेरणीसाठी वेळेवर उपयोगी पडणारा आहे.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी