शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

कृषी केंद्रांना ‘टॉनिक’ची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:53 IST

मर्जीतील कंपनीचेच ‘टॉनिक’ शेतकºयांना विकावे, यासाठी जिल्हाभरातील कृषी केंद्रांना सक्ती केली जात आहे. या ‘टॉनिक’चा नागपुरातून पुरवठा होतो आहे.

ठळक मुद्देनागपुरातून पुरवठा : शेतकºयांची दिशाभूल, कृषी प्रशासनावर राजकीय दबाव

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मर्जीतील कंपनीचेच ‘टॉनिक’ शेतकºयांना विकावे, यासाठी जिल्हाभरातील कृषी केंद्रांना सक्ती केली जात आहे. या ‘टॉनिक’चा नागपुरातून पुरवठा होतो आहे. राजकीय दबावापोटी अव्वाच्या सव्वा दराने हे ‘टॉनिक’ शेतकºयांच्या माथी मारले जात आहे.पिकांना पीजीआर अर्थात प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर देण्याची पद्धत रुढ झाली आहे. शेतकºयांच्या भाषेत याला ‘टॉनिक’ म्हणून गणले जाते. ‘टॉनिक’ पुरवठ्याच्या या काही उत्पादनांना कृषी विभागाची परवानगी लागते. मात्र बहुतांश उत्पादने विनापरवानाच विकली जातात. सर्वच कृषी केंद्र ‘टॉनिक’चा हा माल उपलब्ध ठेवतात. शेतकºयांकडून त्याची नियमित मागणीही होते. परंतु यावर्षी जिल्हाभरातील कृषी केंद्रांना विशिष्ट कंपनीनेच ‘टॉनिक’ विकावे, यासाठी खुद्द जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडूनच सक्ती केली जात आहे.प्रत्येक कृषी केंद्राला ६० ते ६५ हजार रुपये किंमतीच्या ‘टॉनिक’चा माल बळजबरीने पाठविण्यात आला आहे. नागपुरातून त्याचा पुरवठा होतो आहे. पुरवठा करणारी ही कंपनी नागपुरातील एका नेत्याची असल्याचे सांगितले जाते.अन्य कंपन्या ८० रुपये किलो दराने हे ‘टॉनिक’ विकत असताना नागपुरातील ही कंपनी १२० रुपये दराने त्याचा पुरवठा करीत आहे. अन्य कंपन्यांचे ‘टॉनिक’ विकता, तर मग आमचेही विका असे म्हणून कृषी केंद्रांना सक्ती केली जात आहे.स्थानिक पातळीवर त्यासाठी जिल्हा परिषदेतून कृषी प्रशासनावर दबाव निर्माण केला जात आहे. अखेर सक्ती केली जात असल्याने कृषी केंद्रांनी ‘टॉनिक’चा हा माल नाईलाजाने स्वीकारला असून तो आता जादा दरात शेतकºयांच्या माथी मारला जात आहे. या सक्तीच्या चौकशीचे आव्हान आहे.आठ कोटींची उलाढालविशिष्ट कंपनीचे ‘टॉनिक’ ‘ग्रो’ करण्यासाठी जिल्हाभरातील सुमारे १३०० कृषी केंद्रांना जिल्हा परिषद कृषी विभागाकडून सक्ती केली जात आहे. प्रत्येक कृषी केंद्रात ६० ते ६५ हजारांचा माल सक्तीने दिला जात आहे. हा हिशेब आठ कोटी ४५ लाखांच्या घरात जातो आहे. याच्या ‘मार्जीन’चे गणित जिल्हा परिषदेत सोडविले जाणार आहे.