शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

अन्न सुरक्षा योजनेत शेतकऱ्यांचा समावेश, दरमहा दहा हजार टन धान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 17:49 IST

दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने अल्प किंमतीत अन्न-धान्य देण्याचा निर्णय घेतला. यात मराठवाडा आणि विदर्भातील 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

यवतमाळ : दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने अल्प किंमतीत अन्न-धान्य देण्याचा निर्णय घेतला. यात मराठवाडा आणि विदर्भातील 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येत आहे. शेतकरी हितासाठी शासनाने घेतलेल्या या एका निर्णयामुळे अमरावती विभागात आतापर्यंत केवळ मुबलक धान्य पुरवठा तर होतोच, त्यासोबतच शेतकरी सुमारे दहा हजार मेट्रीक टन अन्न-धान्याची उचल प्रत्येक महिन्यात करीत आहेत.

          राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर गरजू शेतकऱ्यांना तीन रुपये किलो तांदूळ आणि दोन रुपये किलो दराने गहू वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 15 ऑगस्ट 2015 पासून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेतून शेतकऱ्यांना प्रतीमहा प्रतीव्यक्ती 5 किलो तांदूळ, गहू हे धान्य सवलतीच्या दरात स्वस्त धान्य दुकानांमार्फत दिले जात आहे़.

गेल्या काही वर्षांत अनियमित आणि कमी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे़. नापिकीमुळे शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना अन्नधान्याची मदत व्हावी, यासाठी शासनाने मराठवाड्यातील आठ आणि विदर्भातील सहा अशा एकूण 14 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना धान्य उपलब्ध केल्या जात आहे़.

अमरावती विभागात सर्वाधिक लाभार्थी अमरावती जिल्ह्यात सहा लाख तीन हजार 332 आहेत. याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून तीन हजार 17 मेट्रीक टन धान्याची उचल होते. त्याखालोखाल बुलढाणा जिल्ह्यात चार लाख 31 हजार 121 लाभार्थी असून दोन हजार 155 मेट्रीक टन धान्य उचल येथील शेतकरी करतात. यवतमाळ जिल्ह्यातील चार लाख पाच हजार 215 शेतकऱ्यांकडून दोन हजार 26 मेट्रीक टन धान्याची उचल होते. अकोला जिल्ह्यात दोन लाख 52 हजार 930 शेतकरी एक हजार 265 मेट्रीक टन तर वाशिम जिल्ह्यातील दोन लाख 46 हजार 957 शेतकरी एक हजार 235 मेट्रीक टन धान्य घेत आहेत.

अमरावती विभागात पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या 19 लाख 39 हजार 555 आहे. हे शेतकरी सहा हजार 250 मेट्रीक टन गहू तर तीन हजार 448 मेट्रीक टन तांदूळ असा एकूण नऊ हजार 698 मेट्रीक टन धान्याची उचल प्रत्येक महिन्याला करीत आहेत. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे गरजू शेतकऱ्यांना अन्नधान्य उपलब्ध होत आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधून अल्पदरातील धान्याची होणारी उचल पाहता शेतकऱ्यांना खरोखरच मदतीची गरज असल्याचे दिसते.

टॅग्स :Farmerशेतकरी