शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

अन्न सुरक्षा योजनेत शेतकऱ्यांचा समावेश, दरमहा दहा हजार टन धान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 17:49 IST

दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने अल्प किंमतीत अन्न-धान्य देण्याचा निर्णय घेतला. यात मराठवाडा आणि विदर्भातील 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

यवतमाळ : दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने अल्प किंमतीत अन्न-धान्य देण्याचा निर्णय घेतला. यात मराठवाडा आणि विदर्भातील 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येत आहे. शेतकरी हितासाठी शासनाने घेतलेल्या या एका निर्णयामुळे अमरावती विभागात आतापर्यंत केवळ मुबलक धान्य पुरवठा तर होतोच, त्यासोबतच शेतकरी सुमारे दहा हजार मेट्रीक टन अन्न-धान्याची उचल प्रत्येक महिन्यात करीत आहेत.

          राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर गरजू शेतकऱ्यांना तीन रुपये किलो तांदूळ आणि दोन रुपये किलो दराने गहू वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 15 ऑगस्ट 2015 पासून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेतून शेतकऱ्यांना प्रतीमहा प्रतीव्यक्ती 5 किलो तांदूळ, गहू हे धान्य सवलतीच्या दरात स्वस्त धान्य दुकानांमार्फत दिले जात आहे़.

गेल्या काही वर्षांत अनियमित आणि कमी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे़. नापिकीमुळे शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना अन्नधान्याची मदत व्हावी, यासाठी शासनाने मराठवाड्यातील आठ आणि विदर्भातील सहा अशा एकूण 14 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना धान्य उपलब्ध केल्या जात आहे़.

अमरावती विभागात सर्वाधिक लाभार्थी अमरावती जिल्ह्यात सहा लाख तीन हजार 332 आहेत. याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून तीन हजार 17 मेट्रीक टन धान्याची उचल होते. त्याखालोखाल बुलढाणा जिल्ह्यात चार लाख 31 हजार 121 लाभार्थी असून दोन हजार 155 मेट्रीक टन धान्य उचल येथील शेतकरी करतात. यवतमाळ जिल्ह्यातील चार लाख पाच हजार 215 शेतकऱ्यांकडून दोन हजार 26 मेट्रीक टन धान्याची उचल होते. अकोला जिल्ह्यात दोन लाख 52 हजार 930 शेतकरी एक हजार 265 मेट्रीक टन तर वाशिम जिल्ह्यातील दोन लाख 46 हजार 957 शेतकरी एक हजार 235 मेट्रीक टन धान्य घेत आहेत.

अमरावती विभागात पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या 19 लाख 39 हजार 555 आहे. हे शेतकरी सहा हजार 250 मेट्रीक टन गहू तर तीन हजार 448 मेट्रीक टन तांदूळ असा एकूण नऊ हजार 698 मेट्रीक टन धान्याची उचल प्रत्येक महिन्याला करीत आहेत. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे गरजू शेतकऱ्यांना अन्नधान्य उपलब्ध होत आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधून अल्पदरातील धान्याची होणारी उचल पाहता शेतकऱ्यांना खरोखरच मदतीची गरज असल्याचे दिसते.

टॅग्स :Farmerशेतकरी