शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

तब्बल ३७ लाख शेतकऱ्यांचे रेशन थांबले; १४ जिल्ह्यांत प्रश्न गंभीर

By रूपेश उत्तरवार | Updated: December 12, 2022 11:02 IST

भारतीय खाद्य निगमचा रेड सिग्नल

यवतमाळ : भारतीय खाद्य निगमने १४ जिल्ह्यातील ३७ लाख शेतकऱ्यांचे धान्य रोखले आहे. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गहू आणि तांदूळ न मिळाल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे.

सन २०१३ मध्ये देशात अन्न सुरक्षा कायदा आला. २०१४ मध्ये राज्याने या कायद्याला मंजुरी दिली. २०१५ पासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. यातून अंत्योदय अन्न योजना आणि एपीएल शेतकरी गटाला धान्य वितरित करण्यात येत आहे. प्रत्येकांना किमान पाेटभर अन्न मिळावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. यातूनच एपीएल शेतकरी गटातील शेतकऱ्यांना प्रती व्यक्ती पाच किलो धान्य वितरित केले जात होते.

दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ या योजनेतून दिले जात होते. यामुळे कोरडवाहू शेतकरीदेखील निश्चिंत होते. मात्र, एपीएल शेतकरी गटाचे धान्य टप्प्याटप्प्याने थांबविण्यात आले आहे. यात जुलै महिन्यापासून गहू आणि सप्टेंबर महिन्यापासून तांदूळ राज्यातील शेतकऱ्यांना मिळाला नाही. यामुळे मागील सहा महिन्यांपासून या योजनेतील धान्य मिळाले नाही. एकीकडे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली असताना दुसरीकडे धान्य थांबल्याने ते चिंतेत सापडले आहे.

एफसीआयकडून कोटा न मिळाल्याने शेतकरी गटातील धान्याचे वितरण झाले आहे. वरिष्ठांकडे ही बाब मांडण्यात आली आहे. कोटा आला तर धान्याचे वितरण नक्की होईल.

- सुधाकर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी, यवतमाळ

जिल्हा - कार्ड संख्या - लाभार्थी

  • अकोला - ४०,७७६ -१,६०,५७६
  • अमरावती - १,०९,३७२ - ४,५६,४२८
  • औरंगाबाद - ७४,०४९ - ३,४२,३१८
  • बीड - १,३५,३३६ - ५,५०,१५४
  • बुलढाणा - ८४,१७१ - ३,५१,६०८
  • हिंगोली - ३७,७६३ - १,६८,४८१
  • जालना - २९,४०३ - १,३२,५९७
  • लातूर - ५७,२३२ - २,७४,८५६
  • नांदेड - ८८,६८० - ३,६५,५९३
  • उस्मानाबाद - ५२,८४७ - २,४६,४९८
  • परभणी - ५२,३९३ - २,३२,७९३
  • वर्धा - १०,८३६ - ४४,३६९
  • वाशिम - ९,८०६ - ७७,९३२
  • यवतमाळ - ८७,१६९ - ३,४९,५६०

एकूण - ८,७९,८५७ - ३७,५२,८३४

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी