शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

राज्यात शेतासाठी धुके,थंडीचे व्यवस्थापन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 12:34 IST

शेतीचा डॉक्टर : काही दिवसात थंडीसुद्धा वाढण्याची दाट शक्यता आहे.

- डॉ. प्रमोद यादगिरवार (यवतमाळ)

राज्यात विविध ठिकाणी अलीकडे अनेक भागात पाऊस पडला, या पावसामुळे रात्रीपासून पहाटेपर्यंत मोठ्या प्रमाणात धुके संचारत असते. अशा प्रकारच्या धुक्यामुळे पिकांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. विशेषत: हिरव्या कपाशीवर, तुरीवर, फळझाडांवर जास्त परिणाम होतो. पाऊस पडून गेल्यावर काही दिवसात थंडीसुद्धा वाढण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. पिकांवर पोटॅशियमयुक्त खताची थोडीफार फवारणी केल्यास वातावरणातील लगेच बदलाच्या धक्क्यापासून बचाव होईल.

संध्याकाळी व पहाटेच्या वेळेस शेतात शेकोटी पेटवून धूर केल्यास धुके व थंडी यापासून होणाऱ्या नुकसानीला रोखता येईल. आभाळ आणि धुके असल्यास किडींची प्रजनन शक्ती व क्रियाशिलता वाढते. म्हणून तूर व हरभरा पिकात अळीच्या प्रादुर्भावाविषयी विशेष जागरूक राहणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी निंबोळी ५%  किंवा बाजारातील सीआयबी शिफारशीत अझॅडिरॅक्टीनची फवारणी केल्यास पिकावर किडीचे अंडी सोडणाऱ्या मादींना परावृत्त करता येईल, थंडीचे प्रमाण जास्त वाढल्यास जमिनीवर पालापाचोळा, हिरव्या गवताचे आच्छादन टाकावे व हलके पाणी दिल्याससुद्धा फायदा होईल.

अळ््यांची तीव्रता जास्त आढळल्यास  म्हणजेच दोन अळ््या प्रतिमीटर इतकी असल्यास इमॅमेट्टीन बेंझोएट किंवा क्रोलट्रॉमीपॉल साडेतीन मिली प्रति दहा लिटर पाणी या किटकनाशकाची फवारणी करावी. शेतशिवारात पक्षीथांबे व कामगंध सापळे लावावेत. राज्यात या वातावरणामुळे हिरव्या अळींचा प्रादुर्भाव  हरभऱ्यावर जाणवत आहे. शेतकऱ्यांनी जागरूक राहून उपाययोजना करावी.

(लेखक हे यवतमाळ येथील मध्य विदर्भ विभागातील विभागीय कृषी संशोधन केंद्रामध्ये सहयोगी संचालक आहेत.) 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी