शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

राज्यात शेतासाठी धुके,थंडीचे व्यवस्थापन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 12:34 IST

शेतीचा डॉक्टर : काही दिवसात थंडीसुद्धा वाढण्याची दाट शक्यता आहे.

- डॉ. प्रमोद यादगिरवार (यवतमाळ)

राज्यात विविध ठिकाणी अलीकडे अनेक भागात पाऊस पडला, या पावसामुळे रात्रीपासून पहाटेपर्यंत मोठ्या प्रमाणात धुके संचारत असते. अशा प्रकारच्या धुक्यामुळे पिकांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. विशेषत: हिरव्या कपाशीवर, तुरीवर, फळझाडांवर जास्त परिणाम होतो. पाऊस पडून गेल्यावर काही दिवसात थंडीसुद्धा वाढण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. पिकांवर पोटॅशियमयुक्त खताची थोडीफार फवारणी केल्यास वातावरणातील लगेच बदलाच्या धक्क्यापासून बचाव होईल.

संध्याकाळी व पहाटेच्या वेळेस शेतात शेकोटी पेटवून धूर केल्यास धुके व थंडी यापासून होणाऱ्या नुकसानीला रोखता येईल. आभाळ आणि धुके असल्यास किडींची प्रजनन शक्ती व क्रियाशिलता वाढते. म्हणून तूर व हरभरा पिकात अळीच्या प्रादुर्भावाविषयी विशेष जागरूक राहणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी निंबोळी ५%  किंवा बाजारातील सीआयबी शिफारशीत अझॅडिरॅक्टीनची फवारणी केल्यास पिकावर किडीचे अंडी सोडणाऱ्या मादींना परावृत्त करता येईल, थंडीचे प्रमाण जास्त वाढल्यास जमिनीवर पालापाचोळा, हिरव्या गवताचे आच्छादन टाकावे व हलके पाणी दिल्याससुद्धा फायदा होईल.

अळ््यांची तीव्रता जास्त आढळल्यास  म्हणजेच दोन अळ््या प्रतिमीटर इतकी असल्यास इमॅमेट्टीन बेंझोएट किंवा क्रोलट्रॉमीपॉल साडेतीन मिली प्रति दहा लिटर पाणी या किटकनाशकाची फवारणी करावी. शेतशिवारात पक्षीथांबे व कामगंध सापळे लावावेत. राज्यात या वातावरणामुळे हिरव्या अळींचा प्रादुर्भाव  हरभऱ्यावर जाणवत आहे. शेतकऱ्यांनी जागरूक राहून उपाययोजना करावी.

(लेखक हे यवतमाळ येथील मध्य विदर्भ विभागातील विभागीय कृषी संशोधन केंद्रामध्ये सहयोगी संचालक आहेत.) 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी