मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : कोरोनामुळे लग्नसराई, सण-उत्सव बंद झाले. अनेकप्रसंगी अनिवार्य असलेल्या फुलांची मागणी घटली. त्यामुळे तालुक्यातील खोपडी येथील फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या ३० एकरातील फुलांनी झाडावरच माना टाकल्या.खोपडी येथे ४५ वर्षांपूर्वी दिवंगत नामदेव आरेकर यांनी फुलशेतीची मुहूर्तमेढ रोवली. नंतर मधुकर आरेकर व आता त्यांची मुले प्रेमदास, जयदीप, गोपाल, प्रदीप हे व्यवसाय सांभाळतात. तिसऱ्या पिढीने लागवड क्षेत्र ३0 एकरापर्यंत वाढविले. नांदेड, नागपूर, शिर्डी येथून कलम आणून गुलाब, निशिगंधा, लिली, गलांडा, बिजली, मोगरा, झेंडूसह विविध जातींच्या फुलांची लागवड केली. यातून दररोज १० हजार गुलाब, ५०० बंडल लिली, २० किलो मोगरा, यासह झेंडू, गलांडा, शेवंती, निशिगंधाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते.वाशीम, अमरावती, माहूर, वर्धा आदी ठिकाणी फुले विक्रीकरिता पाठविली जातात. यावर्षी १५ लाख रुपये खर्च करून फुलझाडे लावली. मात्र ऐन हंगामात कोरोनाचे संकट ओढवले. सर्व कार्यक्रम थांबले. परिणामी फुलांच्या मागणीवर परिणाम झाला. संचारबंदीमुळे निर्यातही बंद झाली. दुकान बंद असल्याने विक्री थांबली. त्यामुळे आरेकर कुटुंबाला फटका बसला.जिल्ह्यात एकमेव फुलशेती३० एकर जागेत फुलांची शेती करणारे आरेकर हे जिल्ह्यातील एकमेव शेतकरी कुटुंब आहे. हे कुटुंब यावर्षी कोरोनामुळे अडचणीत आले. झाडावरच फुले सुकली. पर्याय नसल्याने मजूर लावून त्यांनी फुले तोडली व फेकून दिली.
दारव्हा तालुक्यात फूल उत्पादक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST
खोपडी येथे ४५ वर्षांपूर्वी दिवंगत नामदेव आरेकर यांनी फुलशेतीची मुहूर्तमेढ रोवली. नंतर मधुकर आरेकर व आता त्यांची मुले प्रेमदास, जयदीप, गोपाल, प्रदीप हे व्यवसाय सांभाळतात. तिसऱ्या पिढीने लागवड क्षेत्र ३0 एकरापर्यंत वाढविले. नांदेड, नागपूर, शिर्डी येथून कलम आणून गुलाब, निशिगंधा, लिली, गलांडा, बिजली, मोगरा, झेंडूसह विविध जातींच्या फुलांची लागवड केली. यातून दररोज १० हजार गुलाब, ५०० बंडल लिली, २० किलो मोगरा, यासह झेंडू, गलांडा, शेवंती, निशिगंधाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते.
दारव्हा तालुक्यात फूल उत्पादक संकटात
ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : ३० एकरातील फुलांनी टाकल्या माना, फुले फेकण्याशिवाय पर्याय नाही