शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

लॉकडाऊन काळात पीठगिरणीला आले सुगीचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 11:38 IST

कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. या काळात हॉटेल व्यवसाय पूर्णत: बंद आहे. बाहेरगावी असलेले अनेक जण गावाकडे परतले आहे. संचारबंदीत बहुतांश व्यवसाय अडचणीत आले असताना पिठ गिरणी व्यवसायाला मात्र सुगीचे दिवस आले आहे.

ठळक मुद्दे दररोज ५०० क्विंटल धान्याची आवश्यकतानागरिकांच्या खाण्याच्या आवडीसुद्धा बदलल्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. या काळात हॉटेल व्यवसाय पूर्णत: बंद आहे. बाहेरगावी असलेले अनेक जण गावाकडे परतले आहे. संचारबंदीत बहुतांश व्यवसाय अडचणीत आले असताना पिठ गिरणी व्यवसायाला मात्र सुगीचे दिवस आले आहे.गत दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे बाहेरगावी जाण्याचा प्रश्नच उरला नाही. परिवारातील सर्वच सदस्य एकत्रितपणे घरातच बंदीस्त अहे. साहजिकच घरातील सदस्य संख्येत वाढ झाल्याने दररोज लागणाऱ्या वस्तूंचे प्रमाण वाढले आहे. जेवणात दररोज लागणारी भाकर आणि चपात्याही महिला वर्गाला अधिकच कराव्या लागत आहे. परिणामी अन्नधान्याच्या विक्रीत वाढ झाली आणि त्याचबरोबर पिठ गिरणी व्यवसायाला सुगीचे दिवस आल्याचे दिसत आहे.शहराची लोकसंख्या एक लाखापेक्षा अधिक आहे. शहरात पिठ गिरण्यांची संख्या पन्नासहून अधिक आहे. सरासरी या सर्व गिरण्यांमधून दररो ३00 क्विंटलपेक्षा अधिक धान्य दळून दिले जाते. त्याचप्रमाणे काही नागरिकांकडे घरच्या घरी व सिंगल फेजवर चालणाऱ्या पिठ गिरण्या आहे. काही नागरिक इन्स्टंट पिठाचा वापर करतात. एकूण गोळाबेरीज केली तर दररोज अंदाजे ५०० क्विंटल गहू व ज्वारी धान्य पुसदकरांना दररोज लागते. कोरोनाच्या प्रादुर्भावाने नागरिकांचे जीवनमान पूर्णपणे बदलले आहे. कोरोनाची भीती नागरिकांच्या मनामध्ये घर करुन बसलेली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी आपल्या दररोजच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्येसुद्घा बदल घडवून आणले आहेत. त्याचप्रमाणे आरोग्य जास्तीत जास्त सदृढ कसे राहील, याची पूरेपूर काळजी घेतली जात आहे.

किराणा जिन्नसाची मागणी वाढलीपुणे, मुंबई, औरंगाबाद, हैद्राबाद तसेच अन्य शहरातून आणि परराज्यातून गावी परत आलेल्या नागरिकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे घरच्या बाहेर पडण्याची मुभा फार थोडी आहे. त्यामुळे दिवसभर घरातच राहावे लागते. परिणामी दररोजच्या जेवणाबरोबर इतर पदार्थ करुन आस्वाद घेणाऱ्या  कुटुंबांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिणामी सहजिकच किराणा आणि आवश्यक असलेल्या वस्तूंची मागणीही वाढली आहे. लॉकडाऊनपूर्वी एरव्ही पिठ गिरणीत फारशी गर्दी राहत नसे. आता मात्र दळणासाठी गर्दी होत असल्याचे एका पिठ गिरणी चालकाने सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस