शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

लॉकडाऊन काळात पीठगिरणीला आले सुगीचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 11:38 IST

कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. या काळात हॉटेल व्यवसाय पूर्णत: बंद आहे. बाहेरगावी असलेले अनेक जण गावाकडे परतले आहे. संचारबंदीत बहुतांश व्यवसाय अडचणीत आले असताना पिठ गिरणी व्यवसायाला मात्र सुगीचे दिवस आले आहे.

ठळक मुद्दे दररोज ५०० क्विंटल धान्याची आवश्यकतानागरिकांच्या खाण्याच्या आवडीसुद्धा बदलल्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. या काळात हॉटेल व्यवसाय पूर्णत: बंद आहे. बाहेरगावी असलेले अनेक जण गावाकडे परतले आहे. संचारबंदीत बहुतांश व्यवसाय अडचणीत आले असताना पिठ गिरणी व्यवसायाला मात्र सुगीचे दिवस आले आहे.गत दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे बाहेरगावी जाण्याचा प्रश्नच उरला नाही. परिवारातील सर्वच सदस्य एकत्रितपणे घरातच बंदीस्त अहे. साहजिकच घरातील सदस्य संख्येत वाढ झाल्याने दररोज लागणाऱ्या वस्तूंचे प्रमाण वाढले आहे. जेवणात दररोज लागणारी भाकर आणि चपात्याही महिला वर्गाला अधिकच कराव्या लागत आहे. परिणामी अन्नधान्याच्या विक्रीत वाढ झाली आणि त्याचबरोबर पिठ गिरणी व्यवसायाला सुगीचे दिवस आल्याचे दिसत आहे.शहराची लोकसंख्या एक लाखापेक्षा अधिक आहे. शहरात पिठ गिरण्यांची संख्या पन्नासहून अधिक आहे. सरासरी या सर्व गिरण्यांमधून दररो ३00 क्विंटलपेक्षा अधिक धान्य दळून दिले जाते. त्याचप्रमाणे काही नागरिकांकडे घरच्या घरी व सिंगल फेजवर चालणाऱ्या पिठ गिरण्या आहे. काही नागरिक इन्स्टंट पिठाचा वापर करतात. एकूण गोळाबेरीज केली तर दररोज अंदाजे ५०० क्विंटल गहू व ज्वारी धान्य पुसदकरांना दररोज लागते. कोरोनाच्या प्रादुर्भावाने नागरिकांचे जीवनमान पूर्णपणे बदलले आहे. कोरोनाची भीती नागरिकांच्या मनामध्ये घर करुन बसलेली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी आपल्या दररोजच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्येसुद्घा बदल घडवून आणले आहेत. त्याचप्रमाणे आरोग्य जास्तीत जास्त सदृढ कसे राहील, याची पूरेपूर काळजी घेतली जात आहे.

किराणा जिन्नसाची मागणी वाढलीपुणे, मुंबई, औरंगाबाद, हैद्राबाद तसेच अन्य शहरातून आणि परराज्यातून गावी परत आलेल्या नागरिकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे घरच्या बाहेर पडण्याची मुभा फार थोडी आहे. त्यामुळे दिवसभर घरातच राहावे लागते. परिणामी दररोजच्या जेवणाबरोबर इतर पदार्थ करुन आस्वाद घेणाऱ्या  कुटुंबांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिणामी सहजिकच किराणा आणि आवश्यक असलेल्या वस्तूंची मागणीही वाढली आहे. लॉकडाऊनपूर्वी एरव्ही पिठ गिरणीत फारशी गर्दी राहत नसे. आता मात्र दळणासाठी गर्दी होत असल्याचे एका पिठ गिरणी चालकाने सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस