शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

पाच कुटुंबांचा आधार गेला

By admin | Updated: April 1, 2015 23:57 IST

घरातील कर्त्या व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाल्याने कारेगाव येथील पाच कुटुंबांचा आधार गेला.

वडकी : घरातील कर्त्या व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाल्याने कारेगाव येथील पाच कुटुंबांचा आधार गेला. पाचही जणांवर बुधवारी एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळच्या आक्रोशामुळे वातावरण सुन्न झाले होते. कुणाचे वडील, कुणाचा मुलगा तर कुणाचा भाऊ काळाने हिरावून नेला. संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले होते. उघड्यावर आलेल्या या पाचही जणांच्या कुटुंबाला आता मदतीचा हात हवा आहे. राळेगाव तालुक्याच्या कारेगाव येथील सार्वजनिक विहिरीतील गाळ उपसताना घडलेल्या घटनेत पाच तरुणांचा दुर्दैवी अंत झाला. यात विजय पुरुषोत्तम नंदूरकर (४५), भूपेश कवडू कुडमते (३०), आशिष तुकाराम मडावी (३५), शंकर रमेश जोगी (३२), गणेश राजू नंदूरकर (२५) यांचा समावेश आहे. या सर्व जणांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अतिशय गरीब कुटुंबातील या व्यक्ती आहेत. त्यांचा उदरनिर्वाह रोजमजुरी करून चालत होता. यातून सर्वच कुटुंबाचे आधार होते. त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने कुटुंब पोरके झाले आहे. वृद्ध आई-वडील, पत्नी, चिलेपिले यांचा आक्रोश हृदय हेलावून सोडणारा होता. अंत्यसंस्कार प्रसंगी प्रशासनातर्फे तहसीलदार सुरेश कव्हळे, वडकीचे ठाणेदार अमोल माळवे, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, तलाठी गिरीश खडसे आदी उपस्थित होते. प्रसंगी तहसीलदार व बीडीओंनी प्रत्येक कुटुंबाला तत्काळ मदत दिली. यावेळी विलास राऊत, मनोज भोयर, हेमंत वाभिटकर, डॉ.इंगोले, डॉ.अशोक जवादे, अशोक केवटे, डॉ.तेलतुंबडे, अंकुश मुनेश्वर आदी उपस्थित होते.पाच कुटुंबावर अचानक कोसळलेल्या दु:खामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी या ठिकाणी तळ ठोकून होते. वैद्यकीय अधिकारी अशोक बोबडे हे आरोग्यसेविका शेंडे, मडकाम, शेषराव बोरपे यांच्यासह दाखल झाले होते. (वार्ताहर)पदाधिकाऱ्यांविषयी नाराजीकारेगावातील या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. मात्र परिसरातील कुठल्याही विद्यमान लोकप्रतिनिधीने दु:खात बुडालेल्या कुटुंबाची भेट घेण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे त्यांच्याप्रति गावकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रा.वसंत पुरके यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये मदत दिली.