शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

पाच कुटुंबांचा आधार गेला

By admin | Updated: April 1, 2015 23:57 IST

घरातील कर्त्या व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाल्याने कारेगाव येथील पाच कुटुंबांचा आधार गेला.

वडकी : घरातील कर्त्या व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाल्याने कारेगाव येथील पाच कुटुंबांचा आधार गेला. पाचही जणांवर बुधवारी एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळच्या आक्रोशामुळे वातावरण सुन्न झाले होते. कुणाचे वडील, कुणाचा मुलगा तर कुणाचा भाऊ काळाने हिरावून नेला. संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले होते. उघड्यावर आलेल्या या पाचही जणांच्या कुटुंबाला आता मदतीचा हात हवा आहे. राळेगाव तालुक्याच्या कारेगाव येथील सार्वजनिक विहिरीतील गाळ उपसताना घडलेल्या घटनेत पाच तरुणांचा दुर्दैवी अंत झाला. यात विजय पुरुषोत्तम नंदूरकर (४५), भूपेश कवडू कुडमते (३०), आशिष तुकाराम मडावी (३५), शंकर रमेश जोगी (३२), गणेश राजू नंदूरकर (२५) यांचा समावेश आहे. या सर्व जणांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अतिशय गरीब कुटुंबातील या व्यक्ती आहेत. त्यांचा उदरनिर्वाह रोजमजुरी करून चालत होता. यातून सर्वच कुटुंबाचे आधार होते. त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने कुटुंब पोरके झाले आहे. वृद्ध आई-वडील, पत्नी, चिलेपिले यांचा आक्रोश हृदय हेलावून सोडणारा होता. अंत्यसंस्कार प्रसंगी प्रशासनातर्फे तहसीलदार सुरेश कव्हळे, वडकीचे ठाणेदार अमोल माळवे, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, तलाठी गिरीश खडसे आदी उपस्थित होते. प्रसंगी तहसीलदार व बीडीओंनी प्रत्येक कुटुंबाला तत्काळ मदत दिली. यावेळी विलास राऊत, मनोज भोयर, हेमंत वाभिटकर, डॉ.इंगोले, डॉ.अशोक जवादे, अशोक केवटे, डॉ.तेलतुंबडे, अंकुश मुनेश्वर आदी उपस्थित होते.पाच कुटुंबावर अचानक कोसळलेल्या दु:खामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी या ठिकाणी तळ ठोकून होते. वैद्यकीय अधिकारी अशोक बोबडे हे आरोग्यसेविका शेंडे, मडकाम, शेषराव बोरपे यांच्यासह दाखल झाले होते. (वार्ताहर)पदाधिकाऱ्यांविषयी नाराजीकारेगावातील या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. मात्र परिसरातील कुठल्याही विद्यमान लोकप्रतिनिधीने दु:खात बुडालेल्या कुटुंबाची भेट घेण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे त्यांच्याप्रति गावकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रा.वसंत पुरके यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये मदत दिली.