शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

फिट इंडिया; खेळा, लिहा अन्‌ २५ लाखांचे बक्षीस मिळवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 07:00 IST

Yawatmal news Fit India अभ्यासासोबतच विद्यार्थी शारीरिक-मानसिक तंदुरुस्त बनावा यासाठी देशात फिट इंडिया मोहीम सुरू आहे. यंदा या मोहिमेच्या तिसऱ्या वर्षी देशभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एकाच वेळी ऑनलाइन ‘स्पोर्ट क्विझ’ स्पर्धा घेतली जाणार आहे.

ठळक मुद्दे शालेय विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच देशव्यापी ‘स्पोर्ट क्विझ’ स्पर्धा

अविनाश साबापुरे

लोकमत न्यूज नेटवर्क 

यवतमाळ : अभ्यासासोबतच विद्यार्थी शारीरिक-मानसिक तंदुरुस्त बनावा यासाठी देशात फिट इंडिया मोहीम सुरू आहे. यंदा या मोहिमेच्या तिसऱ्या वर्षी देशभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एकाच वेळी ऑनलाइन ‘स्पोर्ट क्विझ’ स्पर्धा घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे यात जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ लाखांचे घसघशीत बक्षीस शासनातर्फे दिले जाणार आहे.

केंद्रीय युवक कल्याण मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या वतीने हे आयोजन करण्यात आले असून, यात बक्षिसापोटी तीन कोटी २५ लाखांचा खर्च केला जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना खेळाविषयीची माहिती जाणून घेऊन या स्पर्धेत ऑनलाइन उत्तरे देऊन वैयक्तिकरीत्या एक ते २५ लाखांपर्यंतचे बक्षीस पटकावता येणार आहे. याशिवाय चमू म्हणून शाळेलाही बक्षीस दिले जाणार आहे.

राज्यातील प्रत्येक शाळेने या स्पर्धेत विद्यार्थी सहभागी व्हावे, असे लेखी आदेश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिले आहेत.

या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना १ जुलैपासून फिट इंडियाच्या संकेत स्थळावर नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर चार फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा होईल. ऑगस्टमध्ये पहिली फेरी शाळास्तरावर होऊन प्राथमिक फेरीसाठी विद्यार्थी निवडले जातील. या फेरीतून निवडलेले विद्यार्थी राज्यस्तरीय फेरीसाठी पात्र ठरतील. त्यात पात्र ठरलेले विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र असतील. ही राष्ट्रीय फेरी १ ते १४ नोव्हेंबरदरम्यान घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे या सर्व फेऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून देशात एकाच वेळी घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे देशभरातील कोट्यवधी विद्यार्थी एकाच वेळी क्रीडा-खेळ याविषयी विचार करताना पहायला मिळणार आहेत.

पालकांना फोन करा, उत्तर विचारा

नववी ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थी स्पर्धेसाठी पात्र आहेत. विशेष म्हणजे ही स्पर्धा अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी या स्पर्धेदरम्यान ‘फोन अ टीचर’, ‘फोन अ पॅरेन्ट’ असे प्रकारही ठेवले जाणार आहेत. म्हणजेच एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत विद्यार्थ्यांना फोनद्वारे पालक किंवा शिक्षकाशी चर्चा करता येणार आहे. विशेष म्हणजे फोनद्वारे असे मार्गदर्शन करणाऱ्यांनाही तब्बल नऊ लाख ६९ हजारांची बक्षिसे दिले जाणार आहेत. शिवाय देशभरातील विद्यार्थ्यांना सहज सहभाग घेता यावा यासाठी ही स्पर्धा इंग्रजी, हिंदी, मराठीसह १३ भाषांमध्ये घेतली जाणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी