शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

वीज निर्मिती प्रकल्पांसाठी शासनाकडून वित्त पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 12:25 IST

राज्यातील विजेची मागणी व पुरवठा यातील तफावत दूर करण्यासाठी शासनाने महानिर्मिती कंपनीच्या जुन्या वीज निर्मिती प्रकल्पांचे आधुनिकीकरण व नव्या प्रकल्पांची पायाभरणी यावर जोर दिला आहे.

ठळक मुद्देभुसावळ, कोराडीचा समावेश ९८८१ कोटी, राज्याची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील विजेची मागणी व पुरवठा यातील तफावत दूर करण्यासाठी शासनाने महानिर्मिती कंपनीच्या जुन्या वीज निर्मिती प्रकल्पांचे आधुनिकीकरण व नव्या प्रकल्पांची पायाभरणी यावर जोर दिला आहे. त्यासाठी शासन शेकडो कोटींचा वित्त पुरवठा करीत आहे. यातून राज्य वीज क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करीत आहे.शासनाने कोराडी, नाशिक, परळी, चंद्रपूर येथील एकूण १२५० मेगावॅटचे संच बंद केले आहेत. त्या बदल्यात कोराडी औष्णिक विद्युत केंद्रावर कोळसा व सुपर क्रीटीकल तंत्रज्ञानावर आधारित ६६० मेगावॅटचे दोन विद्युत निर्मिती प्रकल्प (एकूण १३२० मेगावॅट क्षमता) प्रस्तावित केले आहे. या प्रकल्पाच्या उभारणीचा खर्च आठ हजार ४०७ कोटी (सहा कोटी ३७ लाख रुपये प्रति मेगावॅट) एवढा आहे. त्यावर व्याज आकारणी होऊन प्रकल्प पूर्ण होईस्तोवर या प्रकल्पाची किंमत नऊ हजार ८८१ कोटी सहा लाख एवढी होणार आहे. या प्रकल्पाची ८० टक्के रक्कम फायनान्स कार्पोरेशन, ररुल इलेक्ट्रीफिकेशन कार्पोरेशन आणि बँकेकडून घेण्यास मान्यता देण्यात आली .१९७६ कोटींचे शासकीय अनुदानउर्वरित २० टक्के अर्थात एक हजार ९७६ कोटी ३२ लाख रुपये एवढी रक्कम भागभांडवल म्हणून शासनाने अनुदान म्हणून देण्याची विनंती निर्मिती कंपनीने शासनाला केली होती. त्याला ७ मार्चला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. या कामाच्या शुभारंभासाठी वीज नियामक आयोगाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.कोराडी संच क्र. ६ ला १६ कोटी रोखकोराडी प्रकल्पाच्या संच क्र. ६ च्या नूतनीकरण व आधुनिकीकरणासाठी १६ कोटी ६२ लाख रुपये रोखीने वीज निर्मिती कंपनीला देण्यास मंजुरी देण्यात आली. कोराडीच्या या संच क्र. ६ चा मूळ प्रकल्प खर्च ४८६ कोटी ९७ लाख एवढा होता. मात्र त्यात आता ७७ कोटी पाच लाखाने वाढ झाली असून त्याला शासनाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी जागतिक बँकेकडून ३६० कोटींचे कर्ज घेतले जात आहे. शासनाचे भागभांडवल त्यात २० टक्के अर्थात ११२ कोटी ६२ लाख रुपये राहणार आहे. त्यात महानिर्मिती कंपनीचा सहा टक्के अर्थात ९० कोटी ४३ लाखांचा वाटा राहणार असून या खर्चाला शासनाने मान्यता दिली.भुसावळला १२ कोटी ९६ लाखभुसावळ औष्णीक विद्युत प्रकल्पाच्या बदली प्रकल्पाचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी १२ कोटी ९६ लाख रुपये भांडवली गुंतवणूक म्हणून शासनाने २७ मार्च २०१९ ला मंजुरी दिली .वीज खरेदीवर हजारो कोटींचा खर्चमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी राज्यातील विद्युत ग्राहकांना एक लाख २४ हजार ११६ दशलक्ष युनिट विजेचा पुरवठा करते. त्यासाठी २०१८-१९ मध्ये वितरण कंपनीने वीज खरेदीवर ५० हजार ८१७ कोटी रुपये खर्च केले.३१ आॅक्टोबर २०१७ पर्यंत राज्याची एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमता १३ हजार ६०२ मेगावॅट एवढी आहे. त्यात वाढ करण्याच्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न आहे. त्याकरिताच मोठ्या प्रमाणात निधी- अनुदान, वित्त सहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे.सध्याच्या वीज निर्मिती क्षमतेमध्ये औष्णिक दहा हजार १७० मेगावॅट, गॅस ६७२ मेगावॅट, हायड्रो दोन हजार ५८० मेगावॅट तर सौर ऊर्जेवरील वीज केंद्रांची स्थापित क्षमता १८० मेगावॅट एवढी आहे.महानिर्मिती कंपनीने कोराडी संच ५, नाशिक संच ४ व ५, परळी संच ४ व ५, चंद्रपूर संच ३ असे एकूण १२५० मेगावॅटचे संच बंद केले आहे. त्या बदल्यात सुमारे दहा हजार कोटी रुपये खर्च करून १३२० मेगावॅटचे नवे वीज निर्मिती प्रकल्प उभारले जात आहे.

टॅग्स :electricityवीज