शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जंगल तुडवित अधिकारी पोहोचले पारधी बेड्यावर; गाव सोडणाऱ्यांच्या व्यथा ऐकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 20:47 IST

Yawatmal News अत्याचाराला कंटाळून ६० कुटुंबांनी गाव सोडल्याची चौकशी करण्यासाठी मंगळवारी अधिकारी जंगल तुडवत पारधीबेड्यावर पोहचले व त्यांनी व्यथा जाणून घेतल्या.

यवतमाळ : गावगुंडांच्याअत्याचाराला कंटाळून पारधी बांधवांच्या ६० कुटुंबीयांना गाव सोडून जंगलात आश्रय घ्यावा लागल्याचे वृत्त ‘लोकमत’ने उजेडात आणताच प्रशासन खडबडून जागे झाले. महिनाभरापासून दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी अखेर मंगळवारी दोन किलोमीटर जंगल तुडवित पारधी बेड्यावर पोहोचून अन्यायग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या.

महागाव तालुक्यातील माळवाकद येथील पारधी बांधव गावातील काही विघातक प्रवृत्तीच्या अन्यायाचे बळी ठरत आहेत. त्यामुळे हे नागरिक महिनाभरापूर्वी गाव सोडून पळाले. दोन किलोमीटर अंतरावर जंगलात एका तलावाच्या काठावर त्यांनी पाल ठोकून कसाबसा आश्रय घेतला; मात्र तेथेही उदरनिर्वाहासाठी त्यांना हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत. ‘लोकमत’ने मंगळवारी याबाबतचे वृत्त प्रकाशित करून अन्यायग्रस्तांच्या व्यथा जगापुढे मांडल्या.

त्यामुळे सकाळीच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पथक माळवाकद येथे पोहोचले. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी लोहारा ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी आगाशे, विजया पंधरे व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे एक पथक पारधी बेड्यावरील महिलांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी पाठविले. हे सर्व अधिकारी-कर्मचारी माळवाकद येथे पोहोचल्यानंतर गाव सोडून गेलेल्या पारधी बांधवांची राहुटी असलेल्या जंगलाकडे निघाले; मात्र तेथे पोहोचण्यासाठी साधा रस्ताही उपलब्ध नसल्याचे पाहून हे कर्मचारी काही जण दुचाकीने तर काही पायदळ राहुटीपर्यंत पोहोचले.

या दोन्ही विभागाच्या पथकांनी पारधी बांधव व तेथील महिलांची बयाणे नोंदवून घेतली. त्यांच्या गावकऱ्यांबाबतच्या नेमक्या तक्रारी काय आहेत, कोणत्या प्रकारचा अन्याय त्यांना सहन करावा लागला, याबाबत इन-कॅमेरा बयाणे घेण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष माळवाकद गावातील रहिवासी आणि सरपंचांच्याही भेटी घेण्यात आल्या. येथे काही मुले आई-वडिलांशिवाय असल्याचे निदर्शनास आले. त्यांना अनाथ प्रमाणपत्र देण्यासंदर्भात महागाव तहसीलदारांना सूचना करण्यात आली. यासंदर्भातील लेखी अहवाल सायंकाळी उशिरा यवतमाळात पोहोचल्यानंतर दिला जाणार असल्याचे या पथकांच्या प्रमुखांनी सांगितले. समस्या सोडविण्यासोबतच गावातील दोन्ही गटात समेट घडावा या दृष्टीने प्रयत्न करण्याची भूमिका प्रशासनाने घेतल्याचे दिसून आले.

पोलीस अधीक्षकांनी साधला संवाद

पारधी कुटुंबातील अन्यायग्रस्त महिलांना आपले म्हणणे मोकळेपणाने मांडता यावे यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी सुरुवातीला महिला पोलीस अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पाठविले; मात्र घटनेचे गांभीर्य ओळखून मंगळवारी सायंकाळी स्वत: पोलीस अधीक्षकही माळवाकद येथे दाखल झाले. प्रत्यक्ष गावकरी आणि गाव सोडून गेलेले पारधी बांधव यांच्याशी त्यांनी संवाद साधला.

टॅग्स :Governmentसरकार