शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

जिल्ह्यातील 2046 गावांची अंतिम पैसेवारी 46 पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 18:35 IST

50 पेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या गावांची संख्या निरंक

यवतमाळ : खरीप हंगामात पिकांची अंतिम पैसेवारी ही शेतक-यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब आहे. ही पैसेवारी 50 च्या आत असेल तर शासनाकडून जिल्ह्याला काही प्रमाणात सवलती मिळतात. यात जमीन महसूलात सुट, शेतक-यांच्या कर्जाची सक्तीने वसूली न करणे, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, नरेगाच्या टंचाई कामांना प्राधान्य, शेतक-यांच्या पाल्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ आदींचा समावेश आहे. 

जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी अंतिम पैसेवारी ही वस्तुनिष्ठ पध्दतीने प्रत्यक्ष क्षेत्रीय तपासणी करून जाहीर करण्याबाबत वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी 31 ‍डिसेंबर 2020 रोजी जिल्ह्याची सन 2020-21 ची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे 2046 गावांची अंतिम पैसेवारी 46 पैसे असल्याचे जिल्हाधिका-यांनी विभागीय आयुक्तांना पाठविलेल्या अहवालात नमुद केले आहे. 

यवतमाळ जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 13 लक्ष 9 हजार 592 हेक्टर आर. आहे. 16 तालुके असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात 110 महसुली मंडळ, 682 समाविष्ट साझे आणि जिल्ह्यातील एकूण गावांची संख्या 2159 आहे. यापैकी 2046 गावांची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी 46 पैसे जाहीर करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील उर्वरीत 113 गावांची पैसेवारी काढण्यात आली नाही. तालुकानिहाय अंतिम पैसेवारी जाहीर झालेल्या गावांची संख्या 2046 असून यात यवतमाळ तालुक्यातील 135 गावे, कळंब तालुक्यातील 141 गावे, बाभुळगाव तालुक्यातील 133, आर्णि तालुक्यातील 106, दारव्हा तालुक्यातील 146, दिग्रस तालुक्यातील 81, नेर तालुक्यातील 121, पुसद तालुक्यातील 185, उमरखेड तालुक्यातील 136, महागाव तालुक्यातील 113, केळापूर तालुक्यातील 130, घाटंजी तालुक्यातील 107, राळेगाव तालुक्यातील 132, वणी तालुक्यातील 155, मारेगाव तालुक्यातील 108 आणि झरीजामणी तालुक्यातील 117 गावांचा समावेश आहे.

तसेच संपूर्ण जिल्ह्याची सरासरी पैसेवारी 46 पैसे असली तरी यात यवतमाळ, नेर, केळापूर, घाटंजी, वणी आणि मारेगाव या तालुक्यांची पैसेवारी 46 पैसे, कळंब, बाभुळगाव, आर्णि, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव आणि राळेगाव या तालुक्यांची पैसेवारी 47 पैसे तर झरीजामणी या तालुक्याची पैसेवारी 48 काढण्यात आली आहे. पैसेवारी न काढण्यात आलेल्या गावांमध्ये यवतमाळ तालुक्यातील 17 गावे, कळंब तालुक्यातील 2 गावे, बाभुळगाव तालुक्यातील 7, आर्णि तालुक्यातील 5, दारव्हा आणि नेर तालुक्यातील 0, दिग्रस तालुक्यातील 1, पुसद तालुक्यातील 4, उमरखेड तालुक्यातील 22, महागाव तालुक्यातील 3, केळापूर तालुक्यातील 11, घाटंजी तालुक्यातील 15, राळेगाव तालुक्यातील 1, वणी आणि मारेगाव तालुक्यातील प्रत्येकी 7 आणि झरीजामणी तालुक्यातील 11 गावांचा समावेश असल्याचे जिल्हाधिका-यांच्या अहवालात नमुद आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळFarmerशेतकरी