शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थीच बनले एकमेकांचे शत्रू; क्षुल्लक कारणावरून दोन गटात राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 18:31 IST

लहान सहान कारणांवरुन विद्यार्थ्यांमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. वणीत सोमवारी सकाळी रेल्वे गेटलगत विद्यार्थ्यांच्या दोन गटांत चांगलीच हाणामारी झाली. हे विद्यार्थी दहाव्या वर्गातील असून, याच मार्गावर असलेल्या एका नामांकित शाळेत शिक्षण घेत आहेत.

ठळक मुद्देपालक आणि शिक्षकांचेही दुर्लक्ष, अप्रिय घटनेची भीती

यवतमाळ : अगदी क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडण्याचे प्रकार वणी शहरात वाढले आहेत. नांदेपेरा मार्गावर एक दिवसाआड अशी भांडणे पाहायला मिळत आहेत. एकमेकांचे डोके फुटेपर्यंत हा वाद विकोपाला जात असून, यातून एखादी मोठी अप्रिय घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सोमवारी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास रेल्वे गेटलगत विद्यार्थ्यांच्या दोन गटांत चांगलीच हाणामारी झाली. भांडणाचे कारण मात्र कळू शकले नाही. हे विद्यार्थी दहाव्या वर्गातील असल्याचे सांगितले जात असून, याच मार्गावर असलेल्या एका नामांकित शाळेत ते शिक्षण घेत आहेत. प्रेम प्रकरणातून अशा हाणामारीच्या घटना सातत्याने घडत असल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये इतका आक्रस्ताळेपणा येतो कुठून, हा पालकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. शाळेमध्ये क्षुल्लक कारणावरून शाब्दिक वाद होतात. शाळा सुटल्यानंतर रस्त्याने घराकडे परत जात असताना याच कारणावरून पुन्हा वाद उफाळून येतो आणि त्यातून हाणामारीचे प्रकार घडत आहेत.

२१ डिसेंबरला याच मार्गावर रेल्वे गेटजवळ नवव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात भीषण हाणामारी झाली होती. यात एकाचे डोके फुटून त्याला तीन टाके पडले होते. दुसऱ्याही गटातील विद्यार्थी जखमी झाला होता. घटना घडताच, संबंधित शाळेतील शिक्षकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन जखमी विद्यार्थ्याला जवळच्याच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. उपचारानंतर प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. रीतसर तक्रारही करण्यात आली. परंतु काही वेळानंतर दोन्ही कुटुंबात तडजोड होऊन प्रकरण मागे घेण्यात आले.

त्यानंतर सोमवारी पुन्हा याच घटनेची पुनरावृत्ती झाली. यावेळी मात्र भांडण करणारे हे विद्यार्थी दहाव्या वर्गातील असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ज्या शाळेत हे विद्यार्थी शिकत आहेत त्या शाळेकडून विद्यार्थ्यांना शिस्त लावली जात नाही का, असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

मुलांना शाळेत पाठवून पालक होतात बिनधास्त

आपली मुले शाळेत गेल्यानंतर नेमके काय करतात, याकडे पालकांचे कायम दुर्लक्ष असते. या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे चित्र वणी शहरात पाहायला मिळते. मुलगा शाळेत गेला म्हणजे तो शिस्तीत आहे, अशा भ्रामक कल्पनेत पालक राहतात. यातूनच विद्यार्थ्यांना मोकळेपणा येतो आणि अशा घटना घडतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थी