शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

विद्यार्थीच बनले एकमेकांचे शत्रू; क्षुल्लक कारणावरून दोन गटात राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 18:31 IST

लहान सहान कारणांवरुन विद्यार्थ्यांमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. वणीत सोमवारी सकाळी रेल्वे गेटलगत विद्यार्थ्यांच्या दोन गटांत चांगलीच हाणामारी झाली. हे विद्यार्थी दहाव्या वर्गातील असून, याच मार्गावर असलेल्या एका नामांकित शाळेत शिक्षण घेत आहेत.

ठळक मुद्देपालक आणि शिक्षकांचेही दुर्लक्ष, अप्रिय घटनेची भीती

यवतमाळ : अगदी क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडण्याचे प्रकार वणी शहरात वाढले आहेत. नांदेपेरा मार्गावर एक दिवसाआड अशी भांडणे पाहायला मिळत आहेत. एकमेकांचे डोके फुटेपर्यंत हा वाद विकोपाला जात असून, यातून एखादी मोठी अप्रिय घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सोमवारी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास रेल्वे गेटलगत विद्यार्थ्यांच्या दोन गटांत चांगलीच हाणामारी झाली. भांडणाचे कारण मात्र कळू शकले नाही. हे विद्यार्थी दहाव्या वर्गातील असल्याचे सांगितले जात असून, याच मार्गावर असलेल्या एका नामांकित शाळेत ते शिक्षण घेत आहेत. प्रेम प्रकरणातून अशा हाणामारीच्या घटना सातत्याने घडत असल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये इतका आक्रस्ताळेपणा येतो कुठून, हा पालकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. शाळेमध्ये क्षुल्लक कारणावरून शाब्दिक वाद होतात. शाळा सुटल्यानंतर रस्त्याने घराकडे परत जात असताना याच कारणावरून पुन्हा वाद उफाळून येतो आणि त्यातून हाणामारीचे प्रकार घडत आहेत.

२१ डिसेंबरला याच मार्गावर रेल्वे गेटजवळ नवव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात भीषण हाणामारी झाली होती. यात एकाचे डोके फुटून त्याला तीन टाके पडले होते. दुसऱ्याही गटातील विद्यार्थी जखमी झाला होता. घटना घडताच, संबंधित शाळेतील शिक्षकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन जखमी विद्यार्थ्याला जवळच्याच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. उपचारानंतर प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. रीतसर तक्रारही करण्यात आली. परंतु काही वेळानंतर दोन्ही कुटुंबात तडजोड होऊन प्रकरण मागे घेण्यात आले.

त्यानंतर सोमवारी पुन्हा याच घटनेची पुनरावृत्ती झाली. यावेळी मात्र भांडण करणारे हे विद्यार्थी दहाव्या वर्गातील असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ज्या शाळेत हे विद्यार्थी शिकत आहेत त्या शाळेकडून विद्यार्थ्यांना शिस्त लावली जात नाही का, असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

मुलांना शाळेत पाठवून पालक होतात बिनधास्त

आपली मुले शाळेत गेल्यानंतर नेमके काय करतात, याकडे पालकांचे कायम दुर्लक्ष असते. या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे चित्र वणी शहरात पाहायला मिळते. मुलगा शाळेत गेला म्हणजे तो शिस्तीत आहे, अशा भ्रामक कल्पनेत पालक राहतात. यातूनच विद्यार्थ्यांना मोकळेपणा येतो आणि अशा घटना घडतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थी