शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
4
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
5
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
6
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
7
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
8
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
9
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
10
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
11
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
12
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
13
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
14
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
15
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
17
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
18
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
19
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
20
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'

गुंडप्रवृत्तीमुळे घेतलेल्या निर्णयाने कमालीचे दु:ख झाले - डॉ. राणी बंग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 9:24 PM

विदर्भातील संमेलन हा घरचा कार्यक्रम असल्यामुळे मी येथे आले आहे. पुन्हा असे घडू नये, याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेविका डॉ. राणी बंग यांनी रविवारी ‘प्रतिभावंतांच्या सहवासात’ या कार्यक्रमात सहगल प्रकरणाचा समाचार घेतला.

ठळक मुद्देसुसंस्कृत समाजात मात्र एकट्या स्त्रीला वावरणे अवघड बनले आहे

प्रज्ञा केळकर-सिंग ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : वऱ्हाडी परंपरेमध्ये कार्यक्रमाला न बोलावलेल्या माणसाचेही मनापासून स्वागत केले जाते. संमेलनाच्या सुरुवातीला आमंत्रण नाकारल्याच्या घटनेमुळे खूप दु:ख झाले. गुंडप्रवृत्तीमुळे आयोजकांना हा अप्रिय निर्णय घ्यावा लागला. विदर्भातील संमेलन हा घरचा कार्यक्रम असल्यामुळे मी येथे आले आहे. पुन्हा असे घडू नये, याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेविका डॉ. राणी बंग यांनी रविवारी ‘प्रतिभावंतांच्या सहवासात’ या कार्यक्रमात सहगल प्रकरणाचा समाचार घेतला.‘वर्धेला विनोबा भावेंनी जय जगतचा नारा दिला. मराठीचा अभिमान बाळगणारे आपण मुलांना इंग्रजी शाळेत पाठवतो आणि संमेलनात येण्यास इंग्रजी लेखिकेला नकार देतो, हा कोणता न्याय’, असा सवाल राणी बंग यांनी उपस्थित केला.बंग म्हणाल्या, ‘शिक्षणाने शहाणपण येते, असे मला वाटत नाही. शिकलेले लोक महामूर्ख असतात, तर अशिक्षित लोक जास्त शहाणे असतात. आधुनिकता म्हणजे धिंगाणा, व्यसनाधीनता, वाटेल तसे वागणे, असे शिकलेल्याना वाटते. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, हे नवीन पिढीने जाणून घेतले पाहिजे. साजरे करणे ही आपली प्रवृत्ती बनली आहे. आपल्या वागण्याला उत्सवी रूप आले आहे. लग्नसोहळा खर्चिक करण्याची सवय आपल्याला लागली आहे. गरीब लोकही श्रीमंतांचे अनुकरण करतात. त्यामुळे समाज संस्कृती बिघडत चालली आहे. सौंदर्याला अमाप महत्व दिले जाते. सौंदर्य प्रसाधनांचे दुष्परिणाम अनेक जणी भोगत आहेत. तरीही, अभिनेत्री सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिराती करताना दिसतात. दिसण्यापेक्षा असण्याला जास्त महत्व द्यावे, हे तरुणाईला समजून सांगितले पाहिजे’. सना पंडित आणि डॉ. मोना चिमोटे यांनी बंग यांच्याशी संवाद साधला.आदिवासी लोक जास्त सुसंस्कृत की आपण? असा मला नेहमी प्रश्न पडतो. आदिवासी लोकांमध्ये चोरी होत नाही, त्यांच्यात एकही भिकारी नाही, तेथील मुली, स्त्रियांवर बलात्कार होत नाहीत. सुसंस्कृत समाजात मात्र एकट्या स्त्रीला वावरणे अवघड बनले आहे.प्रतिभावंतांचा सहवास लाभलाच नाहीसाहित्य संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी ‘प्रतिभावंतांच्या सहवासात’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये डॉ. विजय भटकर, माधव गाडगीळ, चंद्रकांत कुलकर्णी, डॉ. राणी बंग यांच्याशी संवाद साधला जाणार होता. मात्र, या कार्यक्रमाला राणी बंग वगळता इतर तिन्ही मान्यवर अनुपस्थित होते. त्यामुळे ‘प्रतिभावंतांचा सहवास लाभलाच नाही’ अशी भावना उपस्थितांमध्ये पहायला मिळाली.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन