शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

धक्कादायक! अत्याचाराला कंटाळून ६० पारधी कुटुंबे गेली जंगलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 09:08 IST

महिनाभरापासून सोडले गाव : रोजगार, अन्न-पाण्यावाचून होताहेत मुला-बाळांचे हाल

अविनाश साबापुरेयवतमाळ :  गावकऱ्यांच्या अनन्वित अत्याचारांना कंटाळून ६० पारधी कुटुंबांना गाव सोडून पलायन करावे लागले. ते सर्वजण मुला-बाळांसह महिनाभरापासून जंगलात तलावाच्या काठावर जीव मुठीत घेऊन राहत आहेत. आता तलावही आटल्याने त्यांची उपासमार सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

महागाव तालुक्याच्या माळवाकद गावात हा प्रकार उघडकीस आला. येथे अनेक पारधी समाज बांधव आहेत. आरक्षणामुळे पारधी समाजाच्या एका तरुणाकडे सरपंच पदही आले होते. मात्र, त्याला मारहाण केली गेली. गावातील काही दारुड्या नागरिकांचा पारधी महिलांना त्रास वाढला आहे. महिनाभरापूर्वी या लोकांनी गावच सोडून दोन किलोमीटरवर जंगलात पाझर तलावाच्या बाजूला आसरा घेतला. ही माहिती कळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी  भेट देऊन पारधी महिलांशी संवाद साधला. त्यावेळी महिलांनी त्यांच्यावरील अत्याचाराची कहाणीच मांडली.

जिल्हा कचेरीवर धडकअखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या विदर्भ प्रदेश महासचिव डॉ. आरती फुपाटे यांनी अन्यायग्रस्तांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तातडीने हस्तक्षेप करून किमान सोयी पुरवाव्यात, अशी मागणी केली. 

शनिवारी तक्रारीनंतर उमरखेड एसडीओ व पुसद आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. अहवाल आल्यावर कार्यवाही केली जाईल.         - अमोल येडगे, जिल्हाधिकारी

टॅग्स :YavatmalयवतमाळTrible Development Schemeआदिवासी विकास योजना