शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

राज्यघटना बदलण्याचे दलित समाजात भय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:45 IST

देशात काही जणांकडून राज्यघटना बदलण्याची वक्तव्ये केली जात आहे. मात्र देशभरातून याला विरोध झाल्यानंतर आता चर्चा थांबली. तथापि दलितांमधील भय अद्याप संपलेले नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयदेवराव गायकवाड यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देजयदेवराव गायकवाड : दारव्हा येथे राकाँचा कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : देशात काही जणांकडून राज्यघटना बदलण्याची वक्तव्ये केली जात आहे. मात्र देशभरातून याला विरोध झाल्यानंतर आता चर्चा थांबली. तथापि दलितांमधील भय अद्याप संपलेले नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयदेवराव गायकवाड यांनी व्यक्त केले. ते दारव्हा येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग होते. प्रदेश सरचिटणीस वसंतराव घुईखेडकर, ज्येष्ठ नेते अ‍ॅड.शंकरराव राठोड, उत्तमराव शेळके, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष क्रांती राऊत, पंडित कांबळे, हरीश कुडे, सुभाष भोयर मंचावर उपस्थित होते. आमदार गायकवाड म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सर्व समाज घटकांना समोर ठेवून राज्यघटना तयार केली. त्याच आधारावर देश चालतो. परंतु अलीकडे राज्यघटनेला धक्का लावण्याचे वक्तव्य केले जात आहे. केंद्र राज्य सरकारची चार वर्षांची ही वाटचाल सर्वांना अस्वस्थ करणारी असल्याचा आरोप त्यांनी केला.आमदार ख्वाजा बेग यांनी जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून प्रत्येक विंगमधील चांगले कार्यकर्ते शोधून त्यांना बळ देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. वसंतराव घुईखेडकर, उत्तमराव शेळके, क्रांती राऊत, पंडित कांबळे यांनी विचार व्यक्त केले.यावेळी आमदारव्दय गायकवाड व बेग यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन तालुक अध्यक्ष प्रा.चरण पवार, तर आभार सेवादलाचे जिल्हाध्यक्ष शेषराव राठोड यांनी मानले. मेळाव्याला शहराध्यक्ष नासीर शेख, प्रा.सुभाष गावंडे, महिला तालुकाध्यक्ष गोदावरी पाटील, शहर अध्यक्ष नलिनी राठोड, युवक तालुका अध्यक्ष अ‍ॅड.मनमोहन ठाकरे, शहराध्यक्ष सादीक शेख, रामदास राऊत, सचिन ठाकरे, नेर तालुकाध्यक्ष युवराज अर्मळ, शहराध्यक्ष तन्वीर खान, दिग्रस तालुकाध्यक्ष लालसिंग राठोड, उमरखेड अध्यक्ष शंकर तालंगकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस