शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

राज्यघटना बदलण्याचे दलित समाजात भय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:45 IST

देशात काही जणांकडून राज्यघटना बदलण्याची वक्तव्ये केली जात आहे. मात्र देशभरातून याला विरोध झाल्यानंतर आता चर्चा थांबली. तथापि दलितांमधील भय अद्याप संपलेले नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयदेवराव गायकवाड यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देजयदेवराव गायकवाड : दारव्हा येथे राकाँचा कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : देशात काही जणांकडून राज्यघटना बदलण्याची वक्तव्ये केली जात आहे. मात्र देशभरातून याला विरोध झाल्यानंतर आता चर्चा थांबली. तथापि दलितांमधील भय अद्याप संपलेले नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयदेवराव गायकवाड यांनी व्यक्त केले. ते दारव्हा येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग होते. प्रदेश सरचिटणीस वसंतराव घुईखेडकर, ज्येष्ठ नेते अ‍ॅड.शंकरराव राठोड, उत्तमराव शेळके, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष क्रांती राऊत, पंडित कांबळे, हरीश कुडे, सुभाष भोयर मंचावर उपस्थित होते. आमदार गायकवाड म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सर्व समाज घटकांना समोर ठेवून राज्यघटना तयार केली. त्याच आधारावर देश चालतो. परंतु अलीकडे राज्यघटनेला धक्का लावण्याचे वक्तव्य केले जात आहे. केंद्र राज्य सरकारची चार वर्षांची ही वाटचाल सर्वांना अस्वस्थ करणारी असल्याचा आरोप त्यांनी केला.आमदार ख्वाजा बेग यांनी जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून प्रत्येक विंगमधील चांगले कार्यकर्ते शोधून त्यांना बळ देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. वसंतराव घुईखेडकर, उत्तमराव शेळके, क्रांती राऊत, पंडित कांबळे यांनी विचार व्यक्त केले.यावेळी आमदारव्दय गायकवाड व बेग यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन तालुक अध्यक्ष प्रा.चरण पवार, तर आभार सेवादलाचे जिल्हाध्यक्ष शेषराव राठोड यांनी मानले. मेळाव्याला शहराध्यक्ष नासीर शेख, प्रा.सुभाष गावंडे, महिला तालुकाध्यक्ष गोदावरी पाटील, शहर अध्यक्ष नलिनी राठोड, युवक तालुका अध्यक्ष अ‍ॅड.मनमोहन ठाकरे, शहराध्यक्ष सादीक शेख, रामदास राऊत, सचिन ठाकरे, नेर तालुकाध्यक्ष युवराज अर्मळ, शहराध्यक्ष तन्वीर खान, दिग्रस तालुकाध्यक्ष लालसिंग राठोड, उमरखेड अध्यक्ष शंकर तालंगकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस