शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

राज्यघटना बदलण्याचे दलित समाजात भय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:45 IST

देशात काही जणांकडून राज्यघटना बदलण्याची वक्तव्ये केली जात आहे. मात्र देशभरातून याला विरोध झाल्यानंतर आता चर्चा थांबली. तथापि दलितांमधील भय अद्याप संपलेले नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयदेवराव गायकवाड यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देजयदेवराव गायकवाड : दारव्हा येथे राकाँचा कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : देशात काही जणांकडून राज्यघटना बदलण्याची वक्तव्ये केली जात आहे. मात्र देशभरातून याला विरोध झाल्यानंतर आता चर्चा थांबली. तथापि दलितांमधील भय अद्याप संपलेले नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयदेवराव गायकवाड यांनी व्यक्त केले. ते दारव्हा येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग होते. प्रदेश सरचिटणीस वसंतराव घुईखेडकर, ज्येष्ठ नेते अ‍ॅड.शंकरराव राठोड, उत्तमराव शेळके, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष क्रांती राऊत, पंडित कांबळे, हरीश कुडे, सुभाष भोयर मंचावर उपस्थित होते. आमदार गायकवाड म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सर्व समाज घटकांना समोर ठेवून राज्यघटना तयार केली. त्याच आधारावर देश चालतो. परंतु अलीकडे राज्यघटनेला धक्का लावण्याचे वक्तव्य केले जात आहे. केंद्र राज्य सरकारची चार वर्षांची ही वाटचाल सर्वांना अस्वस्थ करणारी असल्याचा आरोप त्यांनी केला.आमदार ख्वाजा बेग यांनी जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून प्रत्येक विंगमधील चांगले कार्यकर्ते शोधून त्यांना बळ देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. वसंतराव घुईखेडकर, उत्तमराव शेळके, क्रांती राऊत, पंडित कांबळे यांनी विचार व्यक्त केले.यावेळी आमदारव्दय गायकवाड व बेग यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन तालुक अध्यक्ष प्रा.चरण पवार, तर आभार सेवादलाचे जिल्हाध्यक्ष शेषराव राठोड यांनी मानले. मेळाव्याला शहराध्यक्ष नासीर शेख, प्रा.सुभाष गावंडे, महिला तालुकाध्यक्ष गोदावरी पाटील, शहर अध्यक्ष नलिनी राठोड, युवक तालुका अध्यक्ष अ‍ॅड.मनमोहन ठाकरे, शहराध्यक्ष सादीक शेख, रामदास राऊत, सचिन ठाकरे, नेर तालुकाध्यक्ष युवराज अर्मळ, शहराध्यक्ष तन्वीर खान, दिग्रस तालुकाध्यक्ष लालसिंग राठोड, उमरखेड अध्यक्ष शंकर तालंगकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस