शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

कोरोनात वाचलेली शेती कंपन्यामुळे धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 16:00 IST

कोट्यवधीचा नफा मिळूनही समाधानी नसलेल्या कंपन्या शेतकऱ्यांना बुडवायला निघाल्या आहेत. यामुळे कोरोनातून वाचलेली शेती आता कंपन्यांच्या विश्वासघातकी प्रवृत्तीने धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देकर्जमुक्तीही अपूर्ण बोगस खत, बियाण्याने विश्वास ठेवायचा कुणावर?

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देशभरात उद्योग व्यवसाय ठप्प पडले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अशा स्थितीत शेतीतील रोजगार टिकून आहे. या व्यवसायालाही पोखरण्याचे काम बियाणे आणि खत कंपन्यांनी सुरू केले आहे. कोट्यवधीचा नफा मिळूनही समाधानी नसलेल्या कंपन्या शेतकऱ्यांना बुडवायला निघाल्या आहेत. यामुळे कोरोनातून वाचलेली शेती आता कंपन्यांच्या विश्वासघातकी प्रवृत्तीने धोक्यात आली आहे.

आजपर्यंत बियाणे आणि खतावर शेतकऱ्यांचा विश्वास होता. यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आले. बोगस खताचा पुरवठा झाला. पेरणीनंतरच हा प्रकार उघड झाला. तोपर्यंत बोगस बियाणे विकलेल्या कंपन्यांचे फावले. यातच निसर्ग प्रकोपाने शेतशिवार थरथरत आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत शेतकऱ्यांचे शेकडो प्रश्न जसेच्या तसे आहेत. यामुळे अनेक पिढ्या शेती कसल्यानंतरही शेतीची अवस्था सुधारली नाही. कधी पाऊस जास्त पडतो तर कधी कमी बरसतो. या स्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहणारे सरकार दिसत नाही. कोरोनाच्या संकटकाळात शेती हा एकमेव उद्योग वाचला आहे. इतर उद्योगांनी हात वर केले आहे. अशा स्थितीत बेरोजगारांचा संपूर्ण भार शेतीवरच आला आहे. शेतीचे आर्थिक गणित बिघडलेले आहे. यावर्षी जिल्ह्यातील बहुतांश भागात १० ते १५ दिवस पावसाचा खंड पडला आहे. सिंचन करण्यासाठी वीज मिळत नाही. कृषी फिडरवर १६ तासांचे भारनियमन आहे. यात तीन दिवस दिवसा आणि चार दिवस मध्यरात्री वीज पुरवठा होत आहे. या बिकट स्थितीत दिवसा वीज मिळावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने वीज वितरणने कुठल्याही उपाययोजना केल्या नाही. अनेक भागात वायरमनचा तुटवडा आहे. तर वीज पुरवठा करणारे खांबही वाकले आहे.

यावर्षी बोगस बियाणे आणि खतांचा पुरवठा झाला आहे. शेतकºयांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. अशा १२०० वर तक्रारी दररोज पुढे आल्या आहेत. यातून १० हजार हेक्टरला फटका बसला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यास यंत्रणा कमी पडत आहे. या स्थितीचा फायदा कंपन्या घेत आहे. शेतीचे संपूर्ण अर्थचक्रच बिघडले आहे. कर्जमुक्तीचा मोठा हातभार शेतकऱ्यांना लाभणार होता. पण रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीयकृत बँकांना कुठल्याही सूचना दिल्या नाहीत. यामुळे लाखावर शेतकरी कर्जात अडकून पडले आहेत.हवामान खात्याने दिला दगाहवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रारंभी पाऊस पडला. मात्र नंतर पाऊस गायब झाला. आता अशा स्थितीत शेतकऱ्यांचे लाखमोलाचे बियाणे अडकले आहेत.

 

टॅग्स :agricultureशेतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस