शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनात वाचलेली शेती कंपन्यामुळे धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 16:00 IST

कोट्यवधीचा नफा मिळूनही समाधानी नसलेल्या कंपन्या शेतकऱ्यांना बुडवायला निघाल्या आहेत. यामुळे कोरोनातून वाचलेली शेती आता कंपन्यांच्या विश्वासघातकी प्रवृत्तीने धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देकर्जमुक्तीही अपूर्ण बोगस खत, बियाण्याने विश्वास ठेवायचा कुणावर?

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देशभरात उद्योग व्यवसाय ठप्प पडले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अशा स्थितीत शेतीतील रोजगार टिकून आहे. या व्यवसायालाही पोखरण्याचे काम बियाणे आणि खत कंपन्यांनी सुरू केले आहे. कोट्यवधीचा नफा मिळूनही समाधानी नसलेल्या कंपन्या शेतकऱ्यांना बुडवायला निघाल्या आहेत. यामुळे कोरोनातून वाचलेली शेती आता कंपन्यांच्या विश्वासघातकी प्रवृत्तीने धोक्यात आली आहे.

आजपर्यंत बियाणे आणि खतावर शेतकऱ्यांचा विश्वास होता. यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आले. बोगस खताचा पुरवठा झाला. पेरणीनंतरच हा प्रकार उघड झाला. तोपर्यंत बोगस बियाणे विकलेल्या कंपन्यांचे फावले. यातच निसर्ग प्रकोपाने शेतशिवार थरथरत आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत शेतकऱ्यांचे शेकडो प्रश्न जसेच्या तसे आहेत. यामुळे अनेक पिढ्या शेती कसल्यानंतरही शेतीची अवस्था सुधारली नाही. कधी पाऊस जास्त पडतो तर कधी कमी बरसतो. या स्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहणारे सरकार दिसत नाही. कोरोनाच्या संकटकाळात शेती हा एकमेव उद्योग वाचला आहे. इतर उद्योगांनी हात वर केले आहे. अशा स्थितीत बेरोजगारांचा संपूर्ण भार शेतीवरच आला आहे. शेतीचे आर्थिक गणित बिघडलेले आहे. यावर्षी जिल्ह्यातील बहुतांश भागात १० ते १५ दिवस पावसाचा खंड पडला आहे. सिंचन करण्यासाठी वीज मिळत नाही. कृषी फिडरवर १६ तासांचे भारनियमन आहे. यात तीन दिवस दिवसा आणि चार दिवस मध्यरात्री वीज पुरवठा होत आहे. या बिकट स्थितीत दिवसा वीज मिळावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने वीज वितरणने कुठल्याही उपाययोजना केल्या नाही. अनेक भागात वायरमनचा तुटवडा आहे. तर वीज पुरवठा करणारे खांबही वाकले आहे.

यावर्षी बोगस बियाणे आणि खतांचा पुरवठा झाला आहे. शेतकºयांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. अशा १२०० वर तक्रारी दररोज पुढे आल्या आहेत. यातून १० हजार हेक्टरला फटका बसला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यास यंत्रणा कमी पडत आहे. या स्थितीचा फायदा कंपन्या घेत आहे. शेतीचे संपूर्ण अर्थचक्रच बिघडले आहे. कर्जमुक्तीचा मोठा हातभार शेतकऱ्यांना लाभणार होता. पण रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीयकृत बँकांना कुठल्याही सूचना दिल्या नाहीत. यामुळे लाखावर शेतकरी कर्जात अडकून पडले आहेत.हवामान खात्याने दिला दगाहवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रारंभी पाऊस पडला. मात्र नंतर पाऊस गायब झाला. आता अशा स्थितीत शेतकऱ्यांचे लाखमोलाचे बियाणे अडकले आहेत.

 

टॅग्स :agricultureशेतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस