शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

कोरोनात वाचलेली शेती कंपन्यामुळे धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 16:00 IST

कोट्यवधीचा नफा मिळूनही समाधानी नसलेल्या कंपन्या शेतकऱ्यांना बुडवायला निघाल्या आहेत. यामुळे कोरोनातून वाचलेली शेती आता कंपन्यांच्या विश्वासघातकी प्रवृत्तीने धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देकर्जमुक्तीही अपूर्ण बोगस खत, बियाण्याने विश्वास ठेवायचा कुणावर?

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देशभरात उद्योग व्यवसाय ठप्प पडले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अशा स्थितीत शेतीतील रोजगार टिकून आहे. या व्यवसायालाही पोखरण्याचे काम बियाणे आणि खत कंपन्यांनी सुरू केले आहे. कोट्यवधीचा नफा मिळूनही समाधानी नसलेल्या कंपन्या शेतकऱ्यांना बुडवायला निघाल्या आहेत. यामुळे कोरोनातून वाचलेली शेती आता कंपन्यांच्या विश्वासघातकी प्रवृत्तीने धोक्यात आली आहे.

आजपर्यंत बियाणे आणि खतावर शेतकऱ्यांचा विश्वास होता. यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आले. बोगस खताचा पुरवठा झाला. पेरणीनंतरच हा प्रकार उघड झाला. तोपर्यंत बोगस बियाणे विकलेल्या कंपन्यांचे फावले. यातच निसर्ग प्रकोपाने शेतशिवार थरथरत आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत शेतकऱ्यांचे शेकडो प्रश्न जसेच्या तसे आहेत. यामुळे अनेक पिढ्या शेती कसल्यानंतरही शेतीची अवस्था सुधारली नाही. कधी पाऊस जास्त पडतो तर कधी कमी बरसतो. या स्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहणारे सरकार दिसत नाही. कोरोनाच्या संकटकाळात शेती हा एकमेव उद्योग वाचला आहे. इतर उद्योगांनी हात वर केले आहे. अशा स्थितीत बेरोजगारांचा संपूर्ण भार शेतीवरच आला आहे. शेतीचे आर्थिक गणित बिघडलेले आहे. यावर्षी जिल्ह्यातील बहुतांश भागात १० ते १५ दिवस पावसाचा खंड पडला आहे. सिंचन करण्यासाठी वीज मिळत नाही. कृषी फिडरवर १६ तासांचे भारनियमन आहे. यात तीन दिवस दिवसा आणि चार दिवस मध्यरात्री वीज पुरवठा होत आहे. या बिकट स्थितीत दिवसा वीज मिळावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने वीज वितरणने कुठल्याही उपाययोजना केल्या नाही. अनेक भागात वायरमनचा तुटवडा आहे. तर वीज पुरवठा करणारे खांबही वाकले आहे.

यावर्षी बोगस बियाणे आणि खतांचा पुरवठा झाला आहे. शेतकºयांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. अशा १२०० वर तक्रारी दररोज पुढे आल्या आहेत. यातून १० हजार हेक्टरला फटका बसला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यास यंत्रणा कमी पडत आहे. या स्थितीचा फायदा कंपन्या घेत आहे. शेतीचे संपूर्ण अर्थचक्रच बिघडले आहे. कर्जमुक्तीचा मोठा हातभार शेतकऱ्यांना लाभणार होता. पण रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीयकृत बँकांना कुठल्याही सूचना दिल्या नाहीत. यामुळे लाखावर शेतकरी कर्जात अडकून पडले आहेत.हवामान खात्याने दिला दगाहवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रारंभी पाऊस पडला. मात्र नंतर पाऊस गायब झाला. आता अशा स्थितीत शेतकऱ्यांचे लाखमोलाचे बियाणे अडकले आहेत.

 

टॅग्स :agricultureशेतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस