शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

दिल्ली आंदोलन समर्थनार्थ शेतकऱ्यांनी रात्र जागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:00 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधातील जुल्मी कायदे लागू केले. यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. ...

ठळक मुद्देआझाद मैदान : मेणबत्या लावून केंद्राचा निषेध

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधातील जुल्मी कायदे लागू केले. यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. केंद्र शासनाच्या कायद्याविरोधात आवाज उठवित स्वाभिमानी शेतकरी संघर्ष समितीने गुरुवारी रात्री ठिय्या आंदोलन केले. स्थानिक आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनाला असंख्य शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. दिल्लीत देशभरातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासोबतच स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यवतमाळात गुरुवारी आंदोलन केले. यावेळी संघटनेने जिल्ह्यात उद्‌भवलेल्या गुलाबी बोंड अळीच्या प्रश्नावर प्रशासनाला नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना राज्य शासनाने प्रती हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, असे मतही मांडण्यात आले आहे. कृषीपंपासाठी दिवसा १२ तास वीज मिळावी, खरीप हंगामातील बोगस बियाण्यामध्ये दाखल झालेल्या तक्रारी प्रकरणात खासगी कंपन्यांकडून मदत मिळावी, राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, जिल्ह्यातील नऊ लाख हेक्टरवरील सर्व पिकांना सरसकट प्रधानमंत्री पीक विमा लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे जागर आंदोलन पार पडले. यावेळी संघटनेचे जिल्हा नेते मनीष जाधव, अनुप चव्हाण, गजानन अमदाबादकर, सिकंदर शहा, युवा जिल्हाध्यक्ष शिवानंद राठोड, महागाव तालुका अध्यक्ष मंगल राठोड यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते. शेतकरी पुत्रांचा मोर्चाशुक्रवारी शेतकरी पुत्र संघर्ष समितीने शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात मोर्चा काढला. स्थानिक आर्णी नाक्यावरून निघालेला हा मोर्चा थेट बसस्थानक चौकात पोहोचला. यावेळी मोर्चेकऱ्यांना मधातच रोखण्यात आले. मोर्चेकऱ्यांनी मोदी सरकारच्या विरोधात नारेबाजी केली. काळे कायदे रद्द करण्याची मागणी केली. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांची कायद्यामुळे पिळवणूक होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. आंदोलकांनी दिवसभर स्थानिक बसस्थानक चौकात ठिय्या दिला. यावेळी प्रा. प्रवीण देशमुख, किसान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार, नगरसेवक नितीन मिर्झापुरे, नगरसेवक चंदू चौधरी, उमेश इंगळे, अतुल राऊत, अरुण ठाकूर, घनश्याम अत्रे, सुरज खोब्रागडे यांच्यासह अनेक जण आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पोलीस तैनात होते. विविध समाज-संघटनांची     आज मोटरसायकल रॅली भारतीय पिछडा शोषित संघटन, मराठा सेवा संघ, सत्यशोधक स्टडी सर्कल, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समिती, गुरु रविदास विचारमंच स्मारक समिती, स्मृतीपर्व महिला समिती, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जमाते इस्लामे हिंद, यवतमाळ अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, आंबेडकरी साहित्य व कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली शनिवारी ५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता संविधान चौकापासून प्रारंभ होणार आहे. महात्मा फुले चौकात या रॅलीचा समारोप होणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन