शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
4
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
5
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
7
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
8
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
9
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
10
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
11
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
12
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
13
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
14
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
15
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
16
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
17
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
18
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
19
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
20
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
Daily Top 2Weekly Top 5

‘केवायसी’ केली तरच मिळणार शेतकऱ्यांना दोन हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 05:00 IST

ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल त्यांनी ३१ मार्चपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. यानंतर अडलेली रक्कम या शेतकऱ्यांच्या खात्यात वळती होईल. या संदर्भातील सूचना जिल्हा प्रशासनाने बँकांना दिल्या आहेत. संबंधित शेतकऱ्यांनाही सांगितले जात आहे. यानंतरही अनेकांनी आपले खाते अपडेट केले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील तीन लाख ९७ शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरले आहेत. असे असतानाही अनेक खात्यांमध्ये पैसे वळते होत नाहीत, अशा तक्रारी आहेत. या तक्रारी निकाली काढण्यासाठी ई-केवायसीचा पर्याय सुचविण्यात आला आहे. अशी केवायसी असेल तरच खात्यात पैसे जमा होईल.ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल त्यांनी ३१ मार्चपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. यानंतर अडलेली रक्कम या शेतकऱ्यांच्या खात्यात वळती होईल. या संदर्भातील सूचना जिल्हा प्रशासनाने बँकांना दिल्या आहेत. संबंधित शेतकऱ्यांनाही सांगितले जात आहे. यानंतरही अनेकांनी आपले खाते अपडेट केले नाही.

‘केवायसी’ न केल्याने पैसे परत- ‘केवायसी’ करण्याच्या सूचना प्रत्येक शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहे. यानंतरही अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही. यामुळे त्यांच्या बँक खात्यात प्रधानमंत्री सन्मान धन योजनेचे पैसेच जमा झाले नाहीत.- अशा शेतकऱ्यांच्या खात्यात ‘केवायसी’नंतरच पैसे जमा होणार आहेत. त्यासाठी आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये झालेला संभ्रम दूर होईल आणि प्रत्येकाच्या खात्यात सन्मान धन योजनेचे पैसे जमा होतील.

३ हप्ते बँकेत जमा

- प्रधानमंत्री सन्मान धन योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत तीन हप्त्यांची रक्कम जमा करण्यात आली आहे. यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम आलीच नसल्याचे पुढे आले आहे.- काही शेतकऱ्यांच्या खात्यात नावांमध्ये दुरुस्ती आहे, तर काही शेतकऱ्यांनी बँक खाते क्रमांक दिलेला नाही.

कसे कराल ‘केवायसी’

शेतकरी सन्मान धन योजनेसाठी जे खाते पुस्तक देण्यात आले आहे. त्या बँकेच्या खाते पुस्तकाला आधार कार्ड जोडायचे आहे. यासाठी शेतकऱ्याने बँकेत जायचे आणि संबंधित कर्मचाऱ्यांना खात्याची ई-केवायसी करायची आहे असे सांगायचे.

३१ मार्चची डेडलाईन

ज्या खात्याचे पैसे अजूनही जमा झाले नाही, अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नसेल तर ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना ही ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. अन्यथा ही रक्कम परत जाण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना