शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

मजुरांच्या शोधात शेतकऱ्यांची भटकंती

By admin | Updated: October 4, 2014 23:34 IST

दिवाळीसारखा मोठा सण तोंडावर आला असताना कापूस, सोयाबीन ही पिके शेतात उभी आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सध्या मजुरांची मोठ्याप्रमाणात पळवापवळी सुरू असल्याने

पुसद : दिवाळीसारखा मोठा सण तोंडावर आला असताना कापूस, सोयाबीन ही पिके शेतात उभी आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सध्या मजुरांची मोठ्याप्रमाणात पळवापवळी सुरू असल्याने पीक काढण्यासाठी लागणाऱ्या मजूरांची कधी नव्हे एवढी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी शेतकरी मजुरांच्या शोधात वणवण भटकंती करीत आहे. मजुरांची विनवणी करून व मजुरीच्या दरात वाढ करूनसुद्धा मजूर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. भविष्यात शेती करावी की नाही, या निर्णयाप्रत शेतकरी येऊन ठेपले आहेत. शेतकऱ्यांपेक्षा शेतमजूरच सुखी असे चित्र असल्याचे शेतकरीवर्ग सांगत आहे. यावर्षी विधानसभा निवडणूक आल्याने मजुरांची चांगलीच चंगळ सुरू आहे. शेतात राबराब राबल्यानंतर ८० ते १०० रुपये रोज पडतो. परंतु एखद्या नेत्याच्या प्रचारात सहभागी झाल्यानंतर नेत्यांकडून जेवणखाण व भत्ता मिळत असल्याने मजूरवर्ग तिकडेच जात आहेत. बहुतेक शेतकरी आपली शेती मक्त्याने देण्याच्या मानसिकते दिसत आहे. बदलत्या काळानुरूप शेतातील अनेक कामे यंत्रानेच केली जात असली तरीसुद्धा कापूस वेचणे, ज्वारी, खुडणी व सोयाबीन कापणी या कामांसाठी शेतकऱ्यांना मजुरांवरच विसंबून राहावे लागते. दिवसेंदिवस शेती कामासाठी मजुंराची संख्या कमी होत असल्याने शेतकऱ्यांना मजूर सापडने कमी झाले आहे. शेतावर वर्षभर कामासाठी लागणाऱ्या गडी माणसांचे सालही प्रचंड वाढले आहे. आता कापूस शेतात फुटत आहे, तो वेचन्यासाठी मजूर नाही. वेचणीचा दर तीन ते चार रुपये प्रति किलो करूनही मजूर मिळेनासा झाला आहे. शहरातील मजुरांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी शहराकडे धाव घेऊन मजुरांची गयावया करून त्यांची मने वळविण्यात मजुरांना त्यांच्या घरून शेतापर्यंत नेण्याची सोय वाहनाव्दारे करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शाळेतील विद्यार्थीसुद्धा कापूस वेचणीच्या कामी लागले आहे. परंतु शाळेमध्ये प्रथम सत्र परीक्षांची तयारी सुरू असल्याने विद्यार्थीसुद्धा उपलब्ध होत नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत मजुरांची चांगलीच चंगळ होत असून, शेतकरी मात्र भरडल्या जात आहे. सध्या सोयाबीन काढणीवर आले असताना परतीच्या पावसाचे आगमण झाले तर शेतातील पिकांची नासाडी होऊ नये या विवंचनेत शेतकरी आहे. शेतकऱ्यांचे उभे पीक नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक शेतकरी कुटुंबासह स्वत: शेतात राबत आहेत. (तालुका प्रतिनिधी)