शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना चार महिन्यांपासून अतिवृष्टीच्या मदतीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 10:45 IST

१६ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या हजारो हेक्टर शेती व शेकडो घरांच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही. त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

ठळक मुद्दे१६ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या हजारो हेक्टर शेती  व शेकडो घरांच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही. गेल्या चार महिन्यापासून  नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहे.पुरामुळे ७९  गावातील २ हजार ८१५ शेतकऱ्यांच्या ११ हजार ९३ हेक्टर क्षेत्रावरील शेतातील पिकांचे व ३०१ घरांचे नुकसान झाले.

मुकेश इंगोले

यवतमाळ -  तालुक्‍यात १६ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या हजारो हेक्टर शेती  व शेकडो घरांच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही. त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

अतिवृष्टी व नदी-नाल्यांच्या पुरामुळे ७९  गावातील २ हजार ८१५ शेतकऱ्यांच्या ११ हजार ९३ हेक्टर क्षेत्रावरील शेतातील पिकांचे व ३०१ घरांचे नुकसान झाले. यानुकसानीचे सर्वक्षण करुन अहवाल पाठविण्यात आला आहे. दारव्हा तालुक्याला १५ व १६ ऑगस्टला पावसाने जबरदस्त तडाखा दिला. पंधरा तासात १२१.४२ मीमी पाऊस पडला. त्यामुळे तालुक्यातील सर्व छोटे-मोठे प्रकल्प नदी-नाले तुडुंब भरले.काही ठिकाणी पाझर तलाव फुटल्यामुळे पाणी गावात व शेतात घुसले त्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. दारव्हा तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ८०५ मी.मी.आहे. या दोन दिवसांच्या पावसामुळे मोठी भर पडली. एकूण ६५९.८६ मी. मी.पाऊस पडला. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातच वार्षिक सरासरीच्या जवळपास आकडा पोहोचला. यावरून या अतिवृष्टीचा अंदाज येऊ शकतो.

मोठ्या प्रमाणातील पावसामुळे सर्व छोटे-मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. नदी नाल्यांना पूर आला. त्याचबरोबर वरून जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे सर्व पाणी शेतात जमा झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावर्षी तालुक्यात ३३ह जार चारशे हेक्टर कापूस, २२ हजार तीनशे हेक्टर सोयाबीन, ८ हजार पाचशे हेक्टर तुर, ४०९ हेक्टर मुग, ३६५ हेक्टर उडीद यासह फळबाग व इतर पिकाची लागवड झाली. यामधील झालेल्या नुकसानीच्या सर्वेनंतर ७९ गावातील २ हजार ८१६ शेतकऱ्यांचे ९ हजार ९१८.१५ हेक्टर ३३ टक्केच्या वर तर १ हजार ९१८.११ हेक्टरवरील शेती खरडुन गेल्याचे स्पष्ट झाले. त्याचबरोबर ३०१ घरांची पडझड होऊन जीवनावश्यक वस्तुंचे नुकसान झाले. ४६ जनावरे मृत्युमुखी पडली. यातील ३०१ कुटुंबांना १४ लाख ९५ हजार रूपये सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. तर पशुधन खरेदीसाठी ४ लाख ७ हजाराची मदत देण्यात आली. मात्र शेतीच्या नुकसानाची भरपाई अद्यापही मिळाली नाही त्यामुळे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

दोन हेक्टरची मदत मिळेल 

ओलीत पिकांना हेक्टरी १३ हजार पाचशे, कोरडवाहु ६ हजार आठशे तर खरडलेल्या जमिनीची ३ हजार ७५९ रुपये मदत मिळेल मात्र त्यातही दोन हेक्टरची मर्यादा असेल.झालेल्या नुकसानीच्या तुलनेत ही मदत तोकडी आहे.आणी तीसुद्धा चार महीने होऊन गेले तरी शेतकऱ्यांच्या हातात अजुनपर्यंत पडली नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त केल्या जात आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळFarmerशेतकरीagricultureशेती