शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

शेतकऱ्यांना चार महिन्यांपासून अतिवृष्टीच्या मदतीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 10:45 IST

१६ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या हजारो हेक्टर शेती व शेकडो घरांच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही. त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

ठळक मुद्दे१६ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या हजारो हेक्टर शेती  व शेकडो घरांच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही. गेल्या चार महिन्यापासून  नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहे.पुरामुळे ७९  गावातील २ हजार ८१५ शेतकऱ्यांच्या ११ हजार ९३ हेक्टर क्षेत्रावरील शेतातील पिकांचे व ३०१ घरांचे नुकसान झाले.

मुकेश इंगोले

यवतमाळ -  तालुक्‍यात १६ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या हजारो हेक्टर शेती  व शेकडो घरांच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही. त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

अतिवृष्टी व नदी-नाल्यांच्या पुरामुळे ७९  गावातील २ हजार ८१५ शेतकऱ्यांच्या ११ हजार ९३ हेक्टर क्षेत्रावरील शेतातील पिकांचे व ३०१ घरांचे नुकसान झाले. यानुकसानीचे सर्वक्षण करुन अहवाल पाठविण्यात आला आहे. दारव्हा तालुक्याला १५ व १६ ऑगस्टला पावसाने जबरदस्त तडाखा दिला. पंधरा तासात १२१.४२ मीमी पाऊस पडला. त्यामुळे तालुक्यातील सर्व छोटे-मोठे प्रकल्प नदी-नाले तुडुंब भरले.काही ठिकाणी पाझर तलाव फुटल्यामुळे पाणी गावात व शेतात घुसले त्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. दारव्हा तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ८०५ मी.मी.आहे. या दोन दिवसांच्या पावसामुळे मोठी भर पडली. एकूण ६५९.८६ मी. मी.पाऊस पडला. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातच वार्षिक सरासरीच्या जवळपास आकडा पोहोचला. यावरून या अतिवृष्टीचा अंदाज येऊ शकतो.

मोठ्या प्रमाणातील पावसामुळे सर्व छोटे-मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. नदी नाल्यांना पूर आला. त्याचबरोबर वरून जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे सर्व पाणी शेतात जमा झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावर्षी तालुक्यात ३३ह जार चारशे हेक्टर कापूस, २२ हजार तीनशे हेक्टर सोयाबीन, ८ हजार पाचशे हेक्टर तुर, ४०९ हेक्टर मुग, ३६५ हेक्टर उडीद यासह फळबाग व इतर पिकाची लागवड झाली. यामधील झालेल्या नुकसानीच्या सर्वेनंतर ७९ गावातील २ हजार ८१६ शेतकऱ्यांचे ९ हजार ९१८.१५ हेक्टर ३३ टक्केच्या वर तर १ हजार ९१८.११ हेक्टरवरील शेती खरडुन गेल्याचे स्पष्ट झाले. त्याचबरोबर ३०१ घरांची पडझड होऊन जीवनावश्यक वस्तुंचे नुकसान झाले. ४६ जनावरे मृत्युमुखी पडली. यातील ३०१ कुटुंबांना १४ लाख ९५ हजार रूपये सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. तर पशुधन खरेदीसाठी ४ लाख ७ हजाराची मदत देण्यात आली. मात्र शेतीच्या नुकसानाची भरपाई अद्यापही मिळाली नाही त्यामुळे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

दोन हेक्टरची मदत मिळेल 

ओलीत पिकांना हेक्टरी १३ हजार पाचशे, कोरडवाहु ६ हजार आठशे तर खरडलेल्या जमिनीची ३ हजार ७५९ रुपये मदत मिळेल मात्र त्यातही दोन हेक्टरची मर्यादा असेल.झालेल्या नुकसानीच्या तुलनेत ही मदत तोकडी आहे.आणी तीसुद्धा चार महीने होऊन गेले तरी शेतकऱ्यांच्या हातात अजुनपर्यंत पडली नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त केल्या जात आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळFarmerशेतकरीagricultureशेती