शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
5
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
6
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
7
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
8
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
9
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
10
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
11
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
12
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
13
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
14
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
15
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
16
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
17
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
18
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
19
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
20
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण

कृषी विद्यापीठाच्या महाग सापळ्यात शेतकरी ‘ट्रॅप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 06:00 IST

घाबरलेल्या शेतकऱ्यांनी मिळेल ते सापळे लावून बोंडअळी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. बाजारात गेल्या पाच-सात वर्षांपासून वेगवेगळ्या कंपनीचे सापळे दोन ते पाच हजार रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत. परंतु यावर्षी विद्यापीठाने सोलर लाईट ट्रॅप बनवून ते बाजारात आणण्याचा प्रयत्न चालविलेला आहे.

ठळक मुद्देबाजारात पाच हजार कृषीचे दर आठ हजार रुपये : सोलर लाईट ट्रॅप खपविण्यासाठी कृषी विभागावर दबाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बोंडअळीच्या त्रासाने शेतकरी आधीच मेटाकुटीला आलेले आहेत. त्यांना दिलासा देण्याची जबाबदारी असलेल्या कृषी विद्यापीठाने मात्र या संकटाला संधी मानून नफेखोरीचा मार्ग अवलंबलेला आहे. बोंडअळी व इतर कीटकांपासून बचावासाठी शेतकऱ्यांना बाजारात ५ हजार रुपयांचे कामगंध सापळे (ट्रॅप) उपलब्ध आहेत. मात्र कृषी विद्यापीठाने स्वत:चे संशोधन असल्याचा आव आणत चक्क आठ हजारांपेक्षा जास्त किमतीचे सापळे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या विविध ठिकाणच्या कार्यालयांवर दबाव वाढविला जात आहे.विदर्भात मागील दोन-तीन वर्षात कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव वाढला. त्यामुळे कपाशी उत्पादनावर मोठा परिणाम झाला. घाबरलेल्या शेतकऱ्यांनी मिळेल ते सापळे लावून बोंडअळी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. बाजारात गेल्या पाच-सात वर्षांपासून वेगवेगळ्या कंपनीचे सापळे दोन ते पाच हजार रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत. परंतु यावर्षी विद्यापीठाने सोलर लाईट ट्रॅप बनवून ते बाजारात आणण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. सदर ट्रॅप बनविण्यासाठी विद्यापीठाने केव्हापासून संशोधनाचे काम सुरू केले, याची कुठलीही माहिती विद्यापीठाने दिलेली नाही. सदर उपकरणाची चाचणी घ्यावी लागते. यात किती किडे, मित्र किडे पकडल्या गेले याबाबतही चाचणी घेतली जाते. परंतु हे सापळे विद्यापीठाने इतक्या तत्परतेने बाजारात आणण्याची घाई केली आहे, की त्याची चाचणी झाली किंवा नाही, याबाबत साशंकता आहे.उल्लेखनीय बाब म्हणजे, पाच वॅटचा यूवी बल दोन एकर परिसरातील किडीला आकर्षित करू शकतो, असा दावा विद्यापीठातर्फे करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कुठल्याही लोकप्रतिनिधीसमोर या सापळाची चाचणी करण्यात आली नाही. विद्यापीठाने हे सापळे तयार केले. ते बाजारात आणण्यापूर्वी वितरक नेमणे, शेतकऱ्यांशी संपर्क करणे आदी बाबी करावयास हव्या होत्या. त्या सर्व प्रक्रियेला धाब्यावर बसवून सदर ट्रॅप थेट बाजारात दाखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागावर दबाव टाकून हे सापळे शासनाच्या मार्फत शेतकऱ्यांना पुरवठा करण्याचे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यापीठाने ८ हजार ८०० रुपये एवढी किंमत या सापळ्यांसाठी ठेवल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी मात्र अडचणीत आले आहेत.शेतकऱ्यांची तक्रार दुर्लक्षितशेतकºयांपर्यंत नवे संशोधन पोहोचविणे हा कृषी विद्यापीठाचा हेतू असतो. त्यात विद्यापीठ बºयाचदा कमी पडते. आता सोलर लाईट ट्रॅप हे संशोधन विद्यापीठाने आणल्याचा दावा केला जात आहे. बाजारात २ ते ५ हजारात ट्रॅप उपलब्ध असताना शेतकऱ्यांनी ८ हजार ८०० रुपयांचा विद्यापीठाचा ट्रॅप विकत घेण्यासाठी दबाव आणला जात आहे. याबाबत यवतमाळ जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी शासनाकडे तक्रारही केली होती. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शेतकºयांवर हे सापळे थोपविले जाणार आहेत. अडचणीतील शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाच्या सोलर लाईट ट्रॅपची किंमत कमी असावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती