शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

‘माझ्या आत्महत्येला मोदी सरकारच जबाबदार’, चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 05:53 IST

कर्जबाजारीपणा, नापिकी आणि निराशेने घेरलेल्या एका शेतकऱ्याने आपल्या शेतात मंगळवारी सकाळी आत्महत्या केली.

ठळक मुद्देयवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील घटनाआधी गळफास घेतला नंतर किटकनाशक प्राशन केले

यवतमाळ/घाटंजी : बोंडअळीची मदत मिळाली नाही, कर्जमाफीही मिळाला नाही, त्यामुळे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरून एका शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविली. ‘माझ्या आत्महत्येची जबाबदारी नरेंद्र मोदी यांच्यावर राहील,’ अशी चिठ्ठी लिहून या शेतकºयाने प्राण त्यागला. घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथे मंगळवारी ही घटना घडली. शंकर चायरे (५०) असे त्यांचे नाव आहे.चायरे यांच्याकडे सहा एकर शेती असून, यंदा कापसाची पेरणी केली होती. तीन-चार वर्षांपासून सतत नापिकी होत असल्याने कर्ज वाढले होते. त्यातच कापसावर बोंडअळीने प्रचंड हल्ला चढविला. त्यामुळे ३० टक्केही उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे कर्ज कसे फेडावे ही चिंता त्यांना सतावत होती, असे त्यांची मुलगी जयश्रीने सांगितले.मंगळवारी सकाळी ते गावालगतच्या आपल्या शेतात गेले. सुरुवातीला त्यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोर तुटला, नंतर त्यांनी कीटकनाशक घेतले. मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ‘मी कर्जबाजारी झालो, बोंडअळीने पीक वाया गेले,’ असेही म्हटले आहे. शंकर चायरे यांच्या मागे पत्नी, तीन मुली आणि मुलगा असा परिवार आहे. पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने पत्नी अलका यांची प्रकृती अत्यवस्थ असून, त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.>पीएम, सीएम आल्याशिवाय अंत्यसंस्कार नाहीगावक-यांनी चायरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळ येथे आणला. शेतकरी कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार आणि चमूने शवविच्छेदन गृहापुढे ठिय्या दिला. चायरे यांच्या कुटुंबीयांना एक कोटीची मदत द्यावी, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांना भेट द्यावी, अशी मागणी केली. या मागण्या मान्य होईपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका कार्यकर्ते आणि नातेवाइकांनी घेतली. सरकारचे धोरण फसल्यानेच पंतप्रधान मोदींच्या नावे चिठ्ठी लिहून शेतकºयाने आत्महत्या केली. यातून बोध घेऊन सरकारने संपूर्ण कर्जमाफी करावी.- राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधी पक्षनेते-विधानसभा

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या