शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

‘माझ्या आत्महत्येला मोदी सरकारच जबाबदार’, चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 05:53 IST

कर्जबाजारीपणा, नापिकी आणि निराशेने घेरलेल्या एका शेतकऱ्याने आपल्या शेतात मंगळवारी सकाळी आत्महत्या केली.

ठळक मुद्देयवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील घटनाआधी गळफास घेतला नंतर किटकनाशक प्राशन केले

यवतमाळ/घाटंजी : बोंडअळीची मदत मिळाली नाही, कर्जमाफीही मिळाला नाही, त्यामुळे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरून एका शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविली. ‘माझ्या आत्महत्येची जबाबदारी नरेंद्र मोदी यांच्यावर राहील,’ अशी चिठ्ठी लिहून या शेतकºयाने प्राण त्यागला. घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथे मंगळवारी ही घटना घडली. शंकर चायरे (५०) असे त्यांचे नाव आहे.चायरे यांच्याकडे सहा एकर शेती असून, यंदा कापसाची पेरणी केली होती. तीन-चार वर्षांपासून सतत नापिकी होत असल्याने कर्ज वाढले होते. त्यातच कापसावर बोंडअळीने प्रचंड हल्ला चढविला. त्यामुळे ३० टक्केही उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे कर्ज कसे फेडावे ही चिंता त्यांना सतावत होती, असे त्यांची मुलगी जयश्रीने सांगितले.मंगळवारी सकाळी ते गावालगतच्या आपल्या शेतात गेले. सुरुवातीला त्यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोर तुटला, नंतर त्यांनी कीटकनाशक घेतले. मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ‘मी कर्जबाजारी झालो, बोंडअळीने पीक वाया गेले,’ असेही म्हटले आहे. शंकर चायरे यांच्या मागे पत्नी, तीन मुली आणि मुलगा असा परिवार आहे. पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने पत्नी अलका यांची प्रकृती अत्यवस्थ असून, त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.>पीएम, सीएम आल्याशिवाय अंत्यसंस्कार नाहीगावक-यांनी चायरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळ येथे आणला. शेतकरी कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार आणि चमूने शवविच्छेदन गृहापुढे ठिय्या दिला. चायरे यांच्या कुटुंबीयांना एक कोटीची मदत द्यावी, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांना भेट द्यावी, अशी मागणी केली. या मागण्या मान्य होईपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका कार्यकर्ते आणि नातेवाइकांनी घेतली. सरकारचे धोरण फसल्यानेच पंतप्रधान मोदींच्या नावे चिठ्ठी लिहून शेतकºयाने आत्महत्या केली. यातून बोध घेऊन सरकारने संपूर्ण कर्जमाफी करावी.- राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधी पक्षनेते-विधानसभा

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या