शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शेतकरीपुत्राची कंपनी ‘फोर्ब्स’च्या यादीत; यवतमाळमधील ‘ग्रामहित’चा चांगल्या उत्पन्नासाठी 3 हजार शेतकऱ्यांना आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 13:18 IST

आर्णी तालुक्यातील वरूड (तुका) या छोट्याशा गावातील पंकज महल्ले व श्वेता महल्ले या उच्चशिक्षित दाम्पत्याने यशाला गवसणी घातली आहे.

आर्णी (जि. यवतमाळ) : शेतकऱ्यांच्या मालाला सुरक्षितता आणि चांगला भाव मिळावा, त्यांचे जीवनमान उंचवावे, यासाठी शेतकरीपुत्राने स्थापन केलेल्या कंपनीने तीन हजारांवर शेतकऱ्यांना सेवा दिली आहे. या कामाची अमेरिकन मासिक ‘फोर्ब्स’ने दखल घेतल्याने यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. विशेष म्हणजे, कोरोनाकाळात या कंपनीने शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा करून मोठा आधार दिला होता.

आर्णी तालुक्यातील वरूड (तुका) या छोट्याशा गावातील पंकज महल्ले व श्वेता महल्ले या उच्चशिक्षित दाम्पत्याने यशाला गवसणी घातली आहे. शेतकऱ्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी २०१८ मध्ये शेतकऱ्यांसाठी ‘ग्रामहित’ ही कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकाच्या काढणीनंतर शेतमाल, बाजारपेठेतील चढउतार, शेतमालाला सुरक्षितता मिळवून देणे आदींबाबत मोबाईलद्वारे मार्गदर्शन करण्यात येते. कंपनीने यवतमाळ जिल्ह्यातील वरूड, सावळीसदोबा आणि कळंब, तर अकोला जिल्ह्यातील मंगरूळ कांबेसह इतर दोन गावांत सहा गोडाऊन उभारली असून शेतमाल गोडाऊनमध्ये ठेवल्यानंतर शेतकऱ्यांना कंपनीतर्फे अल्प व्याजदरावर कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्यात येतो. 

उच्चशिक्षित दाम्पत्य- शेतकरीपुत्र असलेल्या पंकज महल्ले यांनी मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून समाजकार्याची पदव्युतर पदवी प्राप्त केली. काही वर्षे टाटाच्याच सीएसआर प्रकल्पात काम केले. - श्वेता महल्ले यांनी अभियांत्रिकी पदवीनंतर हैदराबाद येथून आयआयटी पदव्युत्तर पदवी मिळविली. या दोघांनीही मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडून शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘ग्रामहित’ सुरू केले. आज ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळbusinessव्यवसायForbesफोर्ब्स