शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

शेतकरीपुत्राची कंपनी ‘फोर्ब्स’च्या यादीत; यवतमाळमधील ‘ग्रामहित’चा चांगल्या उत्पन्नासाठी 3 हजार शेतकऱ्यांना आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 13:18 IST

आर्णी तालुक्यातील वरूड (तुका) या छोट्याशा गावातील पंकज महल्ले व श्वेता महल्ले या उच्चशिक्षित दाम्पत्याने यशाला गवसणी घातली आहे.

आर्णी (जि. यवतमाळ) : शेतकऱ्यांच्या मालाला सुरक्षितता आणि चांगला भाव मिळावा, त्यांचे जीवनमान उंचवावे, यासाठी शेतकरीपुत्राने स्थापन केलेल्या कंपनीने तीन हजारांवर शेतकऱ्यांना सेवा दिली आहे. या कामाची अमेरिकन मासिक ‘फोर्ब्स’ने दखल घेतल्याने यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. विशेष म्हणजे, कोरोनाकाळात या कंपनीने शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा करून मोठा आधार दिला होता.

आर्णी तालुक्यातील वरूड (तुका) या छोट्याशा गावातील पंकज महल्ले व श्वेता महल्ले या उच्चशिक्षित दाम्पत्याने यशाला गवसणी घातली आहे. शेतकऱ्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी २०१८ मध्ये शेतकऱ्यांसाठी ‘ग्रामहित’ ही कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकाच्या काढणीनंतर शेतमाल, बाजारपेठेतील चढउतार, शेतमालाला सुरक्षितता मिळवून देणे आदींबाबत मोबाईलद्वारे मार्गदर्शन करण्यात येते. कंपनीने यवतमाळ जिल्ह्यातील वरूड, सावळीसदोबा आणि कळंब, तर अकोला जिल्ह्यातील मंगरूळ कांबेसह इतर दोन गावांत सहा गोडाऊन उभारली असून शेतमाल गोडाऊनमध्ये ठेवल्यानंतर शेतकऱ्यांना कंपनीतर्फे अल्प व्याजदरावर कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्यात येतो. 

उच्चशिक्षित दाम्पत्य- शेतकरीपुत्र असलेल्या पंकज महल्ले यांनी मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून समाजकार्याची पदव्युतर पदवी प्राप्त केली. काही वर्षे टाटाच्याच सीएसआर प्रकल्पात काम केले. - श्वेता महल्ले यांनी अभियांत्रिकी पदवीनंतर हैदराबाद येथून आयआयटी पदव्युत्तर पदवी मिळविली. या दोघांनीही मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडून शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘ग्रामहित’ सुरू केले. आज ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळbusinessव्यवसायForbesफोर्ब्स