शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नागवणा-या अधिका-यांचे शेतक-यांनीच केले स्टिंग आॅपरेशन, ‘पॉवर ग्रिड’ची पोलखोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 18:43 IST

शेतात टॉवर उभारताना पिकांचे नुकसान करणा-या पॉवर ग्रिड कंपनीविरुद्ध शेतकरी ओरड करीत आहेत. मात्र, या कंपनीचे अधिकारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचा-यांना आपला तोरा दाखवून सोयीच्या आॅर्डर काढून घेत आहे.

यवतमाळ : शेतात टॉवर उभारताना पिकांचे नुकसान करणा-या पॉवर ग्रिड कंपनीविरुद्ध शेतकरी ओरड करीत आहेत. मात्र, या कंपनीचे अधिकारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचा-यांना आपला तोरा दाखवून सोयीच्या आॅर्डर काढून घेत आहे. मंगळवारी असाच प्रकार सुरू असताना तेथे पीडित शेतकरी धडकले आणि या गैरप्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून जिल्हाधिका-यांना सादर करण्यात आले. घाटंजी आणि पांढरकवडा तालुक्यात पॉवर ग्रिड कंपनीचे टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. परंतु, यात शेतक-यांना विविध प्रकारे फसविले जात असल्याची बाब या शेतक-यांची बाजू मांडणारे अ‍ॅड. नीलेश चवरडोल यांनी ‘लोकमत’ला सांगितली. टॉवरच्या कामाबाबत काही शेतक-यांनी जिल्हाधिका-यांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यावर मंगळवारी जिल्हाधिका-यांनी सुनावणी ठेवली होती. ही सुनावणी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्यापुढे झाली. परंतु, आरडीसींनी शेतक-यांची बाजू समजून न घेता थातूरमातूर सुनावणी केल्याचा आरोप अ‍ॅड. नीलेश चवरडोल यांनी केला. त्यानंतर पॉवर ग्रिडच्या अधिका-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचा-यांसोबत बसून स्वत:च्या मर्जीनुसार आॅर्डर तयार करणे सुरू केले होते. ही बाब शेतक-यांच्या लक्षात येताच, ते सर्व अ‍ॅड. चवरडोल यांच्यासह तेथे पोहोचले. कर्मचा-यांना सूचना देऊन पॉवर ग्रिडचे अधिकारी आपल्या पद्धतीने आॅर्डर तयार करीत असल्याच्या प्रकाराचे त्यांनी चित्रीकरण केले. त्यानंतर हे चित्रीकरण जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दाखविण्यात आले. त्यामुळे जिल्हाधिका-यांनी मंगळवारची सुनावणीच स्थगित करून ५ डिसेंबर रोजी या प्रकरणाची पुन्हा सुनावणी ठेवली आहे. 

टॉवरसाठी शेतपिकांचे नुकसानया कंपनीने टॉवरसाठी ५४ बाय ६० मीटर एवढी जागा घेऊ असे कागदोपत्री दाखविले. प्रत्यक्षात तेवढ्या जागेत टॉवर होतच नाही. त्यामुळे २०० बाय २०० फूट जागा वापरली जात आहे. यात शेतक-यांची एक ते दीड एकर जमीन जात आहे. शिवाय गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये म्हणजे पीक ऐन भरात असताना काम सुरू केले. आताही नोव्हेंबरमध्ये काम केले जात आहे. या दोन्ही वेळेस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. परंतु, त्या तुलनेत शेतक-यांना मोबदला देण्यात येत नाही. साधी ४०० केव्हीची लाईन टाकतानाही ८ लाखांपर्यंत मोबदला दिला जातो. येथे ७६५ केव्हीची लाईन टाकली जात असतानाही केवळ ६० ते ६२ हजार रुपयेच शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे, असे अ‍ॅड. नीलेश चवरडोल यांनी ‘लोकमत’ला सांगितले. शिवाय, सुनावणीतील पक्षकार स्वत:च मर्जीप्रमाणे आॅर्डर तयार करणार असतील तर शेतकºयांना न्याय कसा मिळणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Farmerशेतकरी