शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सेतू केंद्रांकडून शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 23:33 IST

शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सेतू केंद्रात पीक विम्याचे अर्ज भरण्याचा निर्णय झाला. मात्र हे सुविधा केंद्र शेतकऱ्यांच्या लुटीचे केंद्र बनले आहे. अर्ज मोफत भरण्याचे आदेश सरकारने दिले असताना तलाठी, मंडळ अधिकारी आणि सेतू केंद्र चालक शेतकऱ्यांकडून पैशांची लूट करीत आहे.

ठळक मुद्देसुविधा की दुविधा ?: तहसीलदारांनी तत्काळ कारवाई करावी

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सेतू केंद्रात पीक विम्याचे अर्ज भरण्याचा निर्णय झाला. मात्र हे सुविधा केंद्र शेतकऱ्यांच्या लुटीचे केंद्र बनले आहे. अर्ज मोफत भरण्याचे आदेश सरकारने दिले असताना तलाठी, मंडळ अधिकारी आणि सेतू केंद्र चालक शेतकऱ्यांकडून पैशांची लूट करीत आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी सेतू केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी झाली. मात्र महा-ई-सेवा केंद्र चालक शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. तालुक्यातील लोणी येथील शेतकरी भाऊराव बोडखे पाटील यांनी बसस्थानकासमोरील एका सेवा केंद्रात पाच शेताचा पीक विमा भरला. मात्र त्यातील काही शेतातील पिकाचे पैसे भरूनही पीक विम्याचा लाभ त्यांना मिळाला नाही. महासेवा केंद्र चालक शेतकऱ्यांची लूट तर करीतच आहे, सोबत फसवणूकही करीत आहे. सेतू सुविधा केंद्र चालक शेतकऱ्यांना १००-१५० रुपयांची मागणी करीत आहे. एका शेतकऱ्याची एकापेक्षा जादा शेती असली, तरी त्याच्या प्रत्येक शेतासाठी वेगळे पैसे मागत आहे. याबाबत भाऊराव बोडखे यांनी तहसीलदारांना निवेदनातून लूट करणाऱ्या सेतू केंद्राचा परवाना रद्द करून कारवाईची मागणी केली. शहरातील अनेक ई-सेवा केंद्र चालक पीक विम्याचे दर, कमी-जास्त आकारत आहे. काही केंद्र चालक ७५० रुपये, तर ८४० रुपये घेत आहेत. पैसे घेतल्यानंतर पावतीही दिली जात नाही, असा आरोप शेतकरी भाऊराव बोडखे यांनी केला आहे.मनसेनेही तहसीलदारांना तक्रार दिली. त्यात त्यांनी शेतकऱ्यांना सेतू केंद्रावर असभ्य वागणूक मिळत असल्याचा आरोप केला. नेट प्रॉब्लेम दर्शवून शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे तालुक्यात मोठ्या संख्येने शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. सेतू केंद्र चालकांकडून आर्थिक लूट सुरू असल्याने पीक विमा दरपत्रक सेतू केंद्रनिहाय तत्काळ लावावे, पीक विम्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणी मनसेने केली. तहसीलदारांनी तत्काळ कारवाई न केल्यास मनसे कायदा हातात घेईल, असा इशारा दिला. निवेदनावर मनसेचे जिल्हाध्यक्ष अभय गडम, पुंडलिक शिंदे, गिरीश अनंतवार, संदीप लांडे, अश्विनी चिरडे, अजय नागगणे, रवी सूर्य, सतीश गवारे, वसंता मनवर, अक्षय इनामे आदींच्या स्वाक्षºया आहे.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार