शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

घटत्या दराचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: February 23, 2015 00:19 IST

गतवर्षी कपाशीला चांगला दर मिळाल्याने यावर्षीच्या खरिपात कपाशीचा पेरा वाढला. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सुरुवातीला बसला असला..

राळेगाव : गतवर्षी कपाशीला चांगला दर मिळाल्याने यावर्षीच्या खरिपात कपाशीचा पेरा वाढला. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सुरुवातीला बसला असला तरी बहुतांश शेतकऱ्यांना कापसाचे बऱ्यापैकी उत्पादन झाले. मात्र हमी भाव गतवर्षीपेक्षा फारसा वाढला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सुरुवातीपासूनच कपाशीला तीन हजार ७५० रुपयांपासून दर सुरू केला. या काळापर्यंत गरजू शेतकऱ्यांनी आपला माल त्यांना विकला होता. याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला आहे. तालुक्यात कपाशीचे उत्पादन घेणारे अनेक शेतकरी होते. मात्र घटते उत्पादन आणि दर यामुळे त्यांचा कल सोयाबीनकडे वळला. अनेक वर्षपर्यंत तालुक्याचा सोयाबीनचा पेरा वाढत राहिला. मात्र २०१३ च्या खरिपातील कपाशीच्या उत्पादनाला पाच हजारापर्यंत दर मिळत गेला. काही भागात तर पाच हजार ५०० रुपयांवर कापूस जावून पोहोचला. २०१४ च्या खरिपातील उत्पादनालाही एवढाच किंवा त्यापेक्षा कमी-अधिक दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे कपाशीचा पेरा वाढला. खरिपाच्या सुरुवातीला या शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला. सुरुवातीला उशिराने झालेला पाऊस, यानंतर अधिक तर पुढे गरजेच्यावेळी पाऊस झाला नाही. त्यामुळे कपाशीचे उत्पादन घटण्याची स्थिती निर्माण झाली आणि झालेही तसेच. काही शेतकऱ्यांना तर लागवड खर्चाइतकेही उत्पादन झालेले नाही. ज्यांना साधारण उत्पादन झाले त्यांना कमी दराचा फटका बसत गेला. गरजू शेतकऱ्यांनी सुरुवातीला आपला कापूस व्यापाऱ्यांना विकणे सुरू केले. व्यापाऱ्यांनी तीन हजार ५०० पासून कापसाची खरेदी सुरू केली. यानंतर मात्र सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली. त्यावेळी मात्र व्यापाऱ्यांनी आपला दर वाढविला. तोपर्यंत बराचसा कापूस व्यापाऱ्यांच्या घशात गेला होता.सीसीआयनेही सुरुवातीला चार हजार ५० रुपयांपर्यंत दर दिला. पुढे मात्र भाव घसरविला. या प्रकारात शेतकरी मोडला गेला. आताही सीसीआयकडून चांगल्या कापसालाच तीन हजार ९०० ते तीन हजार ९५० पर्यंत दर दिला जात असल्याने नाईलाजास्तव व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. शिवाय कट्टी हा प्रकारही वाढीस लागला असल्याने क्विंटलमागे तीन ते चार किलोचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. राळेगाव तालुक्यालगतच्या मात्र परजिल्ह्यातील कापूसही या तालुक्यातच विक्रीसाठी आणला जात आहे. खैरी, वाढोणाबाजार आणि राळेगाव येथे सीसीआयची खरेदी सुरू आहे. तालुक्यातील आणि परजिल्ह्यातील कापसाची आवक वाढली आहे. अशातच सीसीआयच्या खरेदीमध्ये अनियमितता आहे. परिणामी गरजू शेतकऱ्यांना आपला कापूस व्यापाऱ्यांकडे देण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सीसीआयने कापूस खरेदीत सातत्य ठेवावे, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)