शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
2
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
3
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
4
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
5
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
6
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
7
Zubeen Garg Death: झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
8
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
9
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
10
Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
11
Thane: पीएसआय स्नेहा करणाळे यांना ऑल इंडिया पोलीस बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 'सुवर्ण'
12
ATP Masters 1000: वयाच्या ३८व्या वर्षीही नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
13
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
14
Astro Tips: वैवाहिक सुखासाठी नवरा बायकोने दर शनिवारी लवंगीने दृष्ट कशी काढावी? वाचा 
15
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर
16
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
17
Nitish Reddy Flying Catch: नितीश रेड्डी बनला सुपरमॅन, सिराजच्या गोलंदाजीवर घेतला जबरदस्त कॅच!
18
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
19
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
20
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात

घटत्या दराचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: February 23, 2015 00:19 IST

गतवर्षी कपाशीला चांगला दर मिळाल्याने यावर्षीच्या खरिपात कपाशीचा पेरा वाढला. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सुरुवातीला बसला असला..

राळेगाव : गतवर्षी कपाशीला चांगला दर मिळाल्याने यावर्षीच्या खरिपात कपाशीचा पेरा वाढला. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सुरुवातीला बसला असला तरी बहुतांश शेतकऱ्यांना कापसाचे बऱ्यापैकी उत्पादन झाले. मात्र हमी भाव गतवर्षीपेक्षा फारसा वाढला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सुरुवातीपासूनच कपाशीला तीन हजार ७५० रुपयांपासून दर सुरू केला. या काळापर्यंत गरजू शेतकऱ्यांनी आपला माल त्यांना विकला होता. याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला आहे. तालुक्यात कपाशीचे उत्पादन घेणारे अनेक शेतकरी होते. मात्र घटते उत्पादन आणि दर यामुळे त्यांचा कल सोयाबीनकडे वळला. अनेक वर्षपर्यंत तालुक्याचा सोयाबीनचा पेरा वाढत राहिला. मात्र २०१३ च्या खरिपातील कपाशीच्या उत्पादनाला पाच हजारापर्यंत दर मिळत गेला. काही भागात तर पाच हजार ५०० रुपयांवर कापूस जावून पोहोचला. २०१४ च्या खरिपातील उत्पादनालाही एवढाच किंवा त्यापेक्षा कमी-अधिक दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे कपाशीचा पेरा वाढला. खरिपाच्या सुरुवातीला या शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला. सुरुवातीला उशिराने झालेला पाऊस, यानंतर अधिक तर पुढे गरजेच्यावेळी पाऊस झाला नाही. त्यामुळे कपाशीचे उत्पादन घटण्याची स्थिती निर्माण झाली आणि झालेही तसेच. काही शेतकऱ्यांना तर लागवड खर्चाइतकेही उत्पादन झालेले नाही. ज्यांना साधारण उत्पादन झाले त्यांना कमी दराचा फटका बसत गेला. गरजू शेतकऱ्यांनी सुरुवातीला आपला कापूस व्यापाऱ्यांना विकणे सुरू केले. व्यापाऱ्यांनी तीन हजार ५०० पासून कापसाची खरेदी सुरू केली. यानंतर मात्र सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली. त्यावेळी मात्र व्यापाऱ्यांनी आपला दर वाढविला. तोपर्यंत बराचसा कापूस व्यापाऱ्यांच्या घशात गेला होता.सीसीआयनेही सुरुवातीला चार हजार ५० रुपयांपर्यंत दर दिला. पुढे मात्र भाव घसरविला. या प्रकारात शेतकरी मोडला गेला. आताही सीसीआयकडून चांगल्या कापसालाच तीन हजार ९०० ते तीन हजार ९५० पर्यंत दर दिला जात असल्याने नाईलाजास्तव व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. शिवाय कट्टी हा प्रकारही वाढीस लागला असल्याने क्विंटलमागे तीन ते चार किलोचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. राळेगाव तालुक्यालगतच्या मात्र परजिल्ह्यातील कापूसही या तालुक्यातच विक्रीसाठी आणला जात आहे. खैरी, वाढोणाबाजार आणि राळेगाव येथे सीसीआयची खरेदी सुरू आहे. तालुक्यातील आणि परजिल्ह्यातील कापसाची आवक वाढली आहे. अशातच सीसीआयच्या खरेदीमध्ये अनियमितता आहे. परिणामी गरजू शेतकऱ्यांना आपला कापूस व्यापाऱ्यांकडे देण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सीसीआयने कापूस खरेदीत सातत्य ठेवावे, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)