शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

घटत्या दराचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: February 23, 2015 00:19 IST

गतवर्षी कपाशीला चांगला दर मिळाल्याने यावर्षीच्या खरिपात कपाशीचा पेरा वाढला. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सुरुवातीला बसला असला..

राळेगाव : गतवर्षी कपाशीला चांगला दर मिळाल्याने यावर्षीच्या खरिपात कपाशीचा पेरा वाढला. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सुरुवातीला बसला असला तरी बहुतांश शेतकऱ्यांना कापसाचे बऱ्यापैकी उत्पादन झाले. मात्र हमी भाव गतवर्षीपेक्षा फारसा वाढला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सुरुवातीपासूनच कपाशीला तीन हजार ७५० रुपयांपासून दर सुरू केला. या काळापर्यंत गरजू शेतकऱ्यांनी आपला माल त्यांना विकला होता. याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला आहे. तालुक्यात कपाशीचे उत्पादन घेणारे अनेक शेतकरी होते. मात्र घटते उत्पादन आणि दर यामुळे त्यांचा कल सोयाबीनकडे वळला. अनेक वर्षपर्यंत तालुक्याचा सोयाबीनचा पेरा वाढत राहिला. मात्र २०१३ च्या खरिपातील कपाशीच्या उत्पादनाला पाच हजारापर्यंत दर मिळत गेला. काही भागात तर पाच हजार ५०० रुपयांवर कापूस जावून पोहोचला. २०१४ च्या खरिपातील उत्पादनालाही एवढाच किंवा त्यापेक्षा कमी-अधिक दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे कपाशीचा पेरा वाढला. खरिपाच्या सुरुवातीला या शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला. सुरुवातीला उशिराने झालेला पाऊस, यानंतर अधिक तर पुढे गरजेच्यावेळी पाऊस झाला नाही. त्यामुळे कपाशीचे उत्पादन घटण्याची स्थिती निर्माण झाली आणि झालेही तसेच. काही शेतकऱ्यांना तर लागवड खर्चाइतकेही उत्पादन झालेले नाही. ज्यांना साधारण उत्पादन झाले त्यांना कमी दराचा फटका बसत गेला. गरजू शेतकऱ्यांनी सुरुवातीला आपला कापूस व्यापाऱ्यांना विकणे सुरू केले. व्यापाऱ्यांनी तीन हजार ५०० पासून कापसाची खरेदी सुरू केली. यानंतर मात्र सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली. त्यावेळी मात्र व्यापाऱ्यांनी आपला दर वाढविला. तोपर्यंत बराचसा कापूस व्यापाऱ्यांच्या घशात गेला होता.सीसीआयनेही सुरुवातीला चार हजार ५० रुपयांपर्यंत दर दिला. पुढे मात्र भाव घसरविला. या प्रकारात शेतकरी मोडला गेला. आताही सीसीआयकडून चांगल्या कापसालाच तीन हजार ९०० ते तीन हजार ९५० पर्यंत दर दिला जात असल्याने नाईलाजास्तव व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. शिवाय कट्टी हा प्रकारही वाढीस लागला असल्याने क्विंटलमागे तीन ते चार किलोचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. राळेगाव तालुक्यालगतच्या मात्र परजिल्ह्यातील कापूसही या तालुक्यातच विक्रीसाठी आणला जात आहे. खैरी, वाढोणाबाजार आणि राळेगाव येथे सीसीआयची खरेदी सुरू आहे. तालुक्यातील आणि परजिल्ह्यातील कापसाची आवक वाढली आहे. अशातच सीसीआयच्या खरेदीमध्ये अनियमितता आहे. परिणामी गरजू शेतकऱ्यांना आपला कापूस व्यापाऱ्यांकडे देण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सीसीआयने कापूस खरेदीत सातत्य ठेवावे, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)