शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

शेतकरी कर्जमाफी, जिल्हा दारूबंदी ठराव

By admin | Updated: June 13, 2015 02:30 IST

जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि चंद्रपूरच्या धर्तीवर यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी लागू करावी असे दोन महत्वपूर्ण ठराव...

जिल्हा परिषद : सर्वसाधारण सभेची एकमताने मंजुरी यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि चंद्रपूरच्या धर्तीवर यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी लागू करावी असे दोन महत्वपूर्ण ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने शुक्रवारी एकमताने मंजूर केले. हे दोनही ठराव शासनाकडे पाठविले जाणार आहेत. यवतमाळ जिल्हा दारूमुक्त करावा यासाठी गत काही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारण्यात आले आहे. जिल्ह्यात दारूबंदी व्हावी यासाठी यवतमाळ जिल्हा दारूबंदी आंदोलन समितीचे प्रा.घनश्याम दरणे यांनी जिल्हा परिषदेला पत्र देऊन या संदर्भात ठराव करण्याची मागणी केली होती. शुक्रवारी येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित सर्वसाधारण सभेत हा मुद्दा चर्चेला आला. जिल्हा परिषद सदस्य वर्षा पाटील आणि स्मिता कदम यांनी जिल्ह्यात दारूबंदी करावी, यासाठी प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर देवानंद पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा ठराव सभागृहात मांडला. यालाही एकमताने मंजूर करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर सरसकट ठिंबक सिंचन सुविधा पुरविण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. हे तीनही ठराव महत्वपूर्ण असून त्यासाठी शासन स्तरावर जिल्हा परिषदेकडून सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासनही यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी सभागृहात दिले. दारूबंदीच्या ठरावाला महिला सदस्यांनी उचलून धरले. त्यापाठोपाठ पुरुष सदस्यही या ठरावाच्या बाजूने उभे राहिले. ठरावाला विरोध करण्याचा प्रयत्न कुणीही केला नाही. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातून दारू हद्दपार व्हावी यासाठी सर्व मिळूनच शासनस्तरावर प्रयत्न करू असे मत अनुमोदक माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी यावेळी मांडली. याला सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. सत्ताधारी सदस्यांच्या आक्रमक पावित्र्याने ही बैठक गाजली. त्यातच एक सदस्य प्रशासनावर घसरले. (कार्यालय प्रतिनिधी)अधिकाऱ्यांवर बरसले सत्ताधारी राष्ट्रवादी सदस्यजिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी सत्ताधारी राष्ट्रवादीचे सदस्य अधिकाऱ्यांवर चांगलेच बरसल्याचे चित्र पहायला मिळाले. विविध विकास कामांच्या मुद्यांवरून सत्ताधाऱ्यांनीच अधिकाऱ्यांना जाब विचारला. यामुळे विरोधी भूमिकेत असलेल्या भाजपा व शिवसेनेच्या सदस्यांना बोलण्याची संधीच मिळाली नाही. सत्ताधाऱ्यांकडूनच जिल्हा परिषद प्रशासनाचे वाभाडे सभागृहात काढले जात होते. माजी उपाध्यक्ष ययाती नाईक यांनी पहिल्यांदाच सभागृहात आपला ‘परफॉर्मन्स’ दाखविला. याशिवाय अमोल राठोड यांनी घरकूल, कृषी विभागाची विशेष घटक योजना यातील फोलपणा उघड केला. अधिकाऱ्यांना थेट समोर बोलावून पुराव्यानिशी अपहार झाल्याचे आरोप त्यांनी केले. यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच दाणादाण उडाली. शिवाय अनुभवी प्रवीण देशमुख, प्रकाश कासावार, देवानंद पवार, अनिल नरवाडे, राकेश नेमनवार आणि वसंत चंद्रे यांनी विविध मुद्यांवर सभा गाजविली.