शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

कर्जमाफीच्या अर्जासाठी शेतकºयांची जागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 20:44 IST

ग्रामीण भागात इंटरनेट सेवा वारंवार कोलमडत असल्यामुळे शेतकºयांना कर्जमाफीसाठी जागली करावी लागत आहे.

ठळक मुद्देइंटरनेट सेवा खंडित : उमरखेड तालुक्यात २२ ई-सेवा केंद्रात गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : ग्रामीण भागात इंटरनेट सेवा वारंवार कोलमडत असल्यामुळे शेतकºयांना कर्जमाफीसाठी जागली करावी लागत आहे.राज्य शासनाने कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. यामुळे ई-सेवा केंद्रांवर शेतकºयांची गर्दी होत आहे. मात्र, अनेक शेतकºयांचे आधारकार्ड अपडेट नसल्याने त्यांची निराशा होत आहे. अशा शेतकºयांना आधार नोंदणीसाठी बाहेर तालुक्यात जावे लागत आहे. इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत असल्याने कर्जमाफीचा आॅनलाईन अर्ज भरणे कठीण झाले आहे. तालुक्यातील मरसूळ येथील ई-सेवा केंद्रात शेतकºयांना दिवस-रात्र बसून वाट बघावी लागत आहे. तांत्रिक अडचण येत असल्याने जिल्हा व विभागीय प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.ई-सेवा केंद्राच्या कर्मचाºयांना कंपन्यांनी मानधन दिले नाही. त्यामुळे माधव चौधरी नामक केंद्र चालकाने अखेर उमरखेड तहसीलसमोर उपोषणही केले होते. तालुक्यातील २२ ही केंद्र चालकांवर हीच वेळ ओढवली आहे. त्याचा नाहक त्रास शेतकºयांना होत आहे. मरसूळ हे सहा हजार लोकसंख्येचे गाव असून, तेथे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र त्यांना कर्जमाफीचे अर्ज भरणे कठीण झाले आहे. ई-केंद्र चालक संजय बनसोड शेतकºयांना सहकार्य करतात. मात्र, इंटरनेटसेवा खंडित होत असल्याने शेतकºयांना जागली करावी लागत आहे.आधारसाठी कसरततालुक्यात २२ ई-सेवा केंद्र आहेत. या सर्वांना आधार नोंदणीची परवानगी देण्याची मागणी आहे. आधारकार्ड अपडेट नसल्याने अनेक शेतकºयांवर कर्जमाफीपासून वंचित राहण्याची वेळ ओढवली आहे. त्यासाठी या २२ ही केंद्रांना आधार नोंदणीची दारे मोकळी करून द्यावी, अशी अपेक्षा जिनिंग प्रेसिंग संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनंतराव कदम यांनी व्यक्त केली.