शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

भारनियमनावर शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 22:30 IST

वीज भारनियमनामुळे शेतकरी संतप्त आहेत. ठराविक वेळापत्रकातही वारंवार वीज ट्रिप होते. यामुळे ओलित करता येत नाही. या विरोधात आवाज उठवित ६ गावांतील शेतकऱ्यांनी उप कार्यकारी अभियंत्यांकडे धाव घेत दिवसा सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देवारंवार वीज ‘ट्रिप’ : अभियंत्यांनी आश्वासनाशिवाय पाठविले परत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वीज भारनियमनामुळे शेतकरी संतप्त आहेत. ठराविक वेळापत्रकातही वारंवार वीज ट्रिप होते. यामुळे ओलित करता येत नाही. या विरोधात आवाज उठवित ६ गावांतील शेतकऱ्यांनी उप कार्यकारी अभियंत्यांकडे धाव घेत दिवसा सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी केली.दारव्हा तालुक्यातील चिकणी, मोझर, आमसेत, उमरठा, दिघोरी, वरूड ईजारा या गावातील शेतकऱ्यांनी मंगळवारी वीज कार्यालयावर धडक दिली. वारंवार वीज ट्रिप होत असल्याने ओलित थांबल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता चितळे यांना दिली. मात्र चितळे यांनी शेतकऱ्यांनाच धारेवर धरले. आपण बिल आणले आहेत का, आपण दर महिन्याला बिल भरता काय, असे प्रश्न विचारले. लाईन ट्रिप होण्याच्या प्रश्नावर उपाययोजना करण्याचे ठोस आश्वासन न देताच शेतकऱ्यांना परत पाठविले.यावेळी शेतकऱ्यांनी आम्ही कोटेशन भरूनच वीज घेतली आहे. आम्ही आकोडे टाकत नाही. बिलाचा भरणाही केली जातो. तरीही कृषीपंपांना वीज मिळत नाही, अशी खंत व्यक्त केली. यावेळी चिकणीचे सरपंच नीलेश राऊत, राजकुमार मुंदे, नानाभाऊ ढोंगे, प्रवीण मुंदे, कसनदास राठोड, तुकाराम बठे, देवा राठोड, ज्ञानेश्वर राठोड आदी उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरी