शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

शेतकरी जीएसटीच्या जोखडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 21:52 IST

शेतकऱ्यांना लुटण्यासाठी शासन कोणतीच संधी सोडत नाही. जीएसटी ही केंद्रीय कर प्रणाली असल्याने एक वेळा दिल्यानंतर पुन्हा लागत नाही. मात्र शेतकऱ्याला पीक कर्ज घेतानाही जीएसटी द्यावी लागते. बाजारातून खते, कीटकनाशक व इतर कृषी साहित्य खरेदी करतानाही जीएसटी मोजावीच लागते.

ठळक मुद्देपीक कर्जासाठीही कर : खते, कीटकनाशके घेताना पुन्हा वसुली

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांना लुटण्यासाठी शासन कोणतीच संधी सोडत नाही. जीएसटी ही केंद्रीय कर प्रणाली असल्याने एक वेळा दिल्यानंतर पुन्हा लागत नाही. मात्र शेतकऱ्याला पीक कर्ज घेतानाही जीएसटी द्यावी लागते. बाजारातून खते, कीटकनाशक व इतर कृषी साहित्य खरेदी करतानाही जीएसटी मोजावीच लागते. शेतकऱ्याची चहुबाजूने लूट करण्याचा घाट शासनाने घातला आहे. यावर एकही शेतकरी नेता बोलताना दिसत नाही.राष्ट्रीयकृत बँका व शेतकऱ्यांच्या हक्काची असलेली जिल्हा मध्यवर्ती बँकसुद्धा दरवर्षी पीक कर्ज मंजुरीसाठी प्रक्रिया शुल्क शेतकऱ्यांकडून वसूल करते. जिल्हा बँकेने ५० हजारापर्यंतच्या कर्जासाठी दीडशे रुपये प्रक्रिया शुल्क, एक लाखापर्यंत २०० रुपये आणि त्या पेक्षा अधिक रकमेवर ३०० रुपये शुल्क आकारले जाते. प्रक्रिया शुल्कावर १८ टक्के जीएसटी लावण्यात येते. यातून मिळणारी रक्कम ५० टक्के बँकेला व ५० टक्के सहकारी संस्थेला जाते. राष्ट्रीयकृत बँकांची पद्धत यापेक्षा वेगळी असून कर्ज मंजुरीसाठी स्टॅम्प ड्युटी व इन्स्पेक्शन चार्जेस लावले जातात. इन्स्पेक्शन चार्जेसची रक्कम निश्चित असून ७०८ रुपयांमध्ये जीएसटीही अंतर्भूत आहे. शासनाला विविध मार्गाने सतत महसूल देणाऱ्या शेतकऱ्याला कुठेच सोडले जात नाही. बाजारात माल विक्रीला घेऊन गेल्यानंतर तेथेही व्यापारी सर्व प्रकारचे चार्जेस शेतकऱ्यांकडूनच वसूल करतो. शेतमालाच्या भावातही त्याला नाडतो. लुटीची ही श्रृंखला येथेच संपत नाही. कर्ज घेण्यासाठी जीएसटी मोजलेल्या शेतकऱ्याला बाजारातून वस्तू खरेदी करतानाही प्रत्येक बाबीसाठी जीएसटी द्यावा लागतो. कृषी साहित्यातही कुठलीच सवलत मिळत नाही. एकीकडे सर्वच राजकीय पक्ष शेती व त्यांच्या समस्या याचे भांडवल करून आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी देखावा निर्माण करतात. शेतकऱ्यांच्या पिळवणुकीवर पोटतिडकीने बोलणारे शेतकरी नेतेही गप्प आहेत. पीक कर्जासाठी मोजावी लागणारी जीएसटीची रक्कम अत्यल्प वाटत असली तरी आर्थिक दृष्ट्या कृष झालेल्या शेतकऱ्यासाठी ती जीवघेणी ठरणारीच आहे. पावलोपावली होणारी लूट थांबविण्यासाठी शेतकºयांकरिता चांगले कृषी धोरण आणण्याची गरज आहे.सर्वांचेच होतेय दुर्लक्षपीक कर्ज वाटपात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या जिल्हा बँकेच्या राजकारणावर साऱ्याच राजकीय पक्षांच्या नजरा आहेत. मात्र पीक कर्ज वाटपात शेतकऱ्यांची लूट होत असताना त्याकडे ना सत्ताधारी ना विरोधक लक्ष द्यायला तयार आहेत. त्यामुळे रोष निर्माण झाला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGSTजीएसटी