शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संपूर्ण वर्षभरातही सावरू शकला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 05:00 IST

यवतमाळ जिल्हा निसर्गप्रकोप आणि मानवनिर्मित संकटामुळे सतत चर्चेत राहिला आहे. सरत्या वर्षात निसर्ग प्रकोपासह बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांची वाट लागली. या परिस्थितीतून सावरण्यासाठी पीक विमा कंपनी मदतीला येईल, असा विश्वास शेतकऱ्यांना होता. मात्र, विमा कंपनीने तकलादू धोरण राबवित शेतकऱ्यांची पार निराशा केली. जिल्ह्यातील चार लाख ६७ हजार २१ शेतकऱ्यांनी साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतजमिनीचा    पीकविमा उतरविला होता.

ठळक मुद्देकृषी अर्थव्यवस्था ठप्प करणारा काळ

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाकाळात कृषी अर्थव्यवस्था सर्वाधिक मजबूत अर्थव्यवस्था म्हणून म्हटले जात होते. मात्र, निसर्गाने साथ सोडली आणि बोगस कंपन्यांनी शिरकाव केला. यामुळे कृषी अर्थव्यवस्था पार कोलमडली. त्यात भरीस भर म्हणून गुलाबी बोंडअळीने कापूस उत्पादक पट्ट्यात धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न उद्‌ध्वस्त केले असून सरते वर्ष कृषी अर्थव्यवस्थेला ठप्प करणारे ठरले आहे. यवतमाळ जिल्हा निसर्गप्रकोप आणि मानवनिर्मित संकटामुळे सतत चर्चेत राहिला आहे. सरत्या वर्षात निसर्ग प्रकोपासह बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांची वाट लागली. या परिस्थितीतून सावरण्यासाठी पीक विमा कंपनी मदतीला येईल, असा विश्वास शेतकऱ्यांना होता. मात्र, विमा कंपनीने तकलादू धोरण राबवित शेतकऱ्यांची पार निराशा केली. जिल्ह्यातील चार लाख ६७ हजार २१ शेतकऱ्यांनी साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतजमिनीचा    पीकविमा उतरविला होता. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील साडेचार लाख हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त झाले. जिल्हा प्रशासनाने तसा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला आहे. याकरिता ३१४ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. राज्य शासनाच्या निकषामध्ये      मात्र जिल्ह्यातील ३४ हजार हेक्टर क्षेत्रच मदतीला पात्र ठरले आहे. या शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयाप्रमाणे मदत जाहीर करण्यात आली. तर दुसरीकडे विमा कंपनीने इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही केवळ दहा    हजार शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. ऑनलाईन तक्रार दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांनाच ही मदत देण्यात आली. प्रत्यक्षात विमा कंपनीने नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर २५ टक्के रक्कम तत्काळ देण्याची ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात त्या पद्धतीने विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी काम पार पडले नाहीत. यामुळे साडेचार लाख शेतकरी वाऱ्यावर आहेत. आज त्यांना नुकसान झाल्यानंतरही मदत मिळाली नाही. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान झाले. पेरणीसाठीचा खर्चही निघाला नाही. अशा परिस्थितीत कर्जाची परतफेड करायची कशी, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. यासोबतच कापूस उत्पादक पट्ट्यात गुलाबी बोंडअळीने चांगलाच कहर केला आहे. कापूस, सोयाबीन आणि आता तर तुरीचे पीकही हातातून जाण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत केंद्रीय पथक जिल्ह्यात येऊन पाहणी करेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र केंद्रीय पथक जिल्ह्याकडे फिरकलेही नाही.

सोयाबीन काढायचे कामच पडले नाही. बोंडअळीने फार वाईट परिस्थिती करून टाकली. आता पुढचा कारभार चालवायचा, कसा असा गंभीर प्रश्न आमच्यापुढे उभा झाला आहे. विमा कंपनीने आमची पार निराशा केली आहे. पेरणीचा खर्चही निघाला नाही. - विलास पाटील 

या वर्षासारखे खराब वर्षे आजपर्यंत पाहिले नाही. अमाप खर्च झाला, हातात मात्र काहीच आले नाही. सोयाबीन गेले, कापूस गेला, तुरीवर आशा होती. मात्र, ती पण धुसर झाली आहे. विमा कंपनीने ७२ तासांत फोन करण्याचा अजब फतवा काढला. आम्हाला तो फोनही करता आला नाही. विमा काढून फायदाच झाला नाही. - शशांक बेंद्रे

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन मदत दिली जाणार होती. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आलीच नाही. कर्जमाफीचे पैसे अनेकांना भेटले नाही. आर्थिक परिस्थिती पार बिकट झाली आहे. - धनंजय मरपे

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती