लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊन कालावधीत शासन गोरगरिबांना घरपोच अन्नदान करीत असताना राज्यातील २२ हजार बिनपगारी शिक्षकांनी मात्र हक्काचा घास मिळविण्यासाठी बायको-पोरांसह उपोषण केले. महाराष्ट्र दिनी झालेल्या या अनोख्या ‘घरबसल्या उपोषणा’त जिल्ह्यातील शेकडो शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले.गेल्या २० वर्षांपासून विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांमध्ये काम करणारे शिक्षक या उपोषणात सहभागी झाले. वेतन अनुदान तातडीने वितरित करावे, अशी या शिक्षकांची मागणी आहे.तब्बल २३० आंदोलने केल्यानंतर वेतन अनुदानाची मागणी फेब्रुवारीत विधिमंडळ अधिवेशनात मंजूर झाली आहे. मात्र अद्यापही त्याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला नाही. शिक्षण विभागातील अधिकारी अजूनही मंत्री महोदयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.अखेर महाराष्ट्रदिनी शिक्षकांनी स्वत:च्या घरातच शासनाच्या निषेधाचे, मागण्यांचे फलक लावून सहकुटुंब उपोषण सुरू केले. विशेष म्हणजे, हजारो शिक्षकांनी याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना एका पाठोपाठ हजारो ईमेल आणि उपोषणाची छायाचित्रे रवाना केलीत. त्यामुळे ना. गायकवाड यांनी तातडीने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची व्हीसी घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, आर्णी, मारेगाव, घाटंजी, झरी, दारव्हा अशा सर्वच तालुक्यातील विनाअनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी या उपोषणात सहकुटुंब सहभाग घेतला. आता शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात बिनपगारी शिक्षकांचे सहकुटुंब ‘घरबसल्या’ उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:00 IST
तब्बल २३० आंदोलने केल्यानंतर वेतन अनुदानाची मागणी फेब्रुवारीत विधिमंडळ अधिवेशनात मंजूर झाली आहे. मात्र अद्यापही त्याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला नाही. शिक्षण विभागातील अधिकारी अजूनही मंत्री महोदयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.
जिल्ह्यात बिनपगारी शिक्षकांचे सहकुटुंब ‘घरबसल्या’ उपोषण
ठळक मुद्देमहाराष्ट्र दिनी आंदोलन । शिक्षणमंत्र्यांना पाठविला ई-मेल