शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
4
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
5
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
6
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
7
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
8
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
9
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
10
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
11
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
12
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
13
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
14
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
15
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
16
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
17
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
18
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
19
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
20
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?

बदलीसाठी बनावट कागदपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 10:03 PM

एका ग्रामसेवकाने पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत रायगड जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात बदलून येण्यासाठी चक्क पत्नीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली. पत्नी नोकरीत नसताही ती एका संस्थेत नोकरीत असल्याचे दर्शवून बदलीचा लाभ घेतला. ही गंभीर बाब उघडकीस येताच जिल्हा परिषदेने तीन सदस्यीय चौकशी समिती नेमून या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देग्रामसेवकाचा प्रताप : चौकशी समितीच्या अहवालाकडे लागले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एका ग्रामसेवकाने पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत रायगड जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात बदलून येण्यासाठी चक्क पत्नीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली. पत्नी नोकरीत नसताही ती एका संस्थेत नोकरीत असल्याचे दर्शवून बदलीचा लाभ घेतला. ही गंभीर बाब उघडकीस येताच जिल्हा परिषदेने तीन सदस्यीय चौकशी समिती नेमून या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्णय घेतला आहे.आर्णी तालुक्यात सध्या कार्यरत नागरगोजे नामक ग्रामसेवक पूर्वी रायगड जिल्ह्यात कार्यरत होते. त्यांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केला. त्यात आपली पत्नी यवतमाळ जिल्ह्यातील एका संस्थेवर स्वयंपाकी म्हणून कार्यरत असल्याचे कागदपत्र जोडले. पती-पत्नी एकत्रीकरणाच्या नियमानुसार ते पात्र ठरल्याने शासनाने त्यांच्या आंतरजिल्हा बदलीला मंजुरी दिली. त्यानंतर ते यवतमाळ जिल्हा परिषदेत रुजू झाले. वास्तविक कर्मचाऱ्याला रुजू करून घेताना संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी करून घेण्याची जबाबदारी त्या विभाग प्रमुखाची असते. मात्र येथील जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांची कागदपत्रे ग्राह्य धरून त्यांना रुजू करून घेतले.आता या प्रकरणाचा भंडफोड झाला. त्या ग्रामसेवकाने पत्नी एका संस्थेत स्वयंपाकी असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र त्या संस्थेत दुसरीच व्यक्ती स्वयंपाकी म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे सदर ग्रामसेवकाने पत्नी संस्थेत नोकरीत असल्याचे बनावट कागदपत्र तयार करून बदली करवून घेतल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे यात संस्थेचीही परस्पर फसवणूक झाली. त्यामुळे ती संस्थाही ग्रामसेवकाविरूद्ध फौजदारी तक्रार करणार असल्याचे कळते.तीन दिवसात अहवालजिल्हा परिषदेच्या तीन सदस्यीय चौकशी समितीचे प्रमुख विस्तार अधिकारी रामदास चंदनकर आहे. या समितीत नेरच्या विस्तार अधिकारी रिंकी डाबरे आणि यवतमाळचे विस्तार अधिकारी आर.आर. जारंडे यांचा समावेश आहे. ही समिती येत्या दोन ते तीन दिवसांत आपला अहवाल सादर करणार असल्याचे चंदनकर यांनी सांगितले. सदर ग्रामसेवक संघटनेचा तालुका पदाधिकारीसुद्धा आहे. तथापि त्याला रुजू करून घेतानाच या सर्व कागदपत्रांची पडताळणी का करण्यात आली नाही, याची चौकशी होणेही गरजेचे झाले आहे.