शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

स्फोटाचे दगड शेतात; घोन्सा कोळसा खाणीत स्फोटाची तीव्रता वाढविली, नागरिक दहशतीखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 17:41 IST

Yavatmal : तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांत रोष

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : गेल्या काही दिवसांपासून घोन्सा कोळसा खाणीत स्फोटाची तीव्रता वाढविली आहे. कोळशाचे अधिक उत्पादन काढण्याच्या मोहात करण्यात येणारे हे स्फोट गावकऱ्यांसाठी विनाशकारी ठरत आहे. स्फोटानंतर खाणीत मोठमोठे दगड थेट शेतात येऊन पडत असल्याने शेतकरी दहशतीखाली वावरत आहेत. सध्या रब्बीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी, शेतमजूर शेतात राबत आहेत. अशातच घोन्सा कोळसा खाणीत दररोज मोठमोठे तीव्र स्वरूपाचे स्फोट केले जात आहेत. स्फोटानंतर आजूबाजूच्या शेतांमध्ये मोठमोठ्या दगडांचा खच येऊन पडत आहे. यातून जीवित हानी होण्याची भीती गावकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. घोन्सा कोळसा खाणीत गुरुवारी दुपारी ३:३० व त्यानंतर ४ वाजता लागोपाठ दोन स्फोट करण्यात आले. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, घोन्सा गावातील मुख्य मार्गावर असलेल्या दुकानांच्या ईमारतीचे शटर हादरत होते. त्यामुळे नागरिक भयभीत झालेत.

घरांच्या भिंतींना गेले तडेघोन्सा कोळसा खाणीतील भीषण स्फोटामुळे घोन्सा गावातील अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. या गावात पक्क्या घरांसह काही मातीची घरेदेखील आहेत. या स्फोटामुळे ही घरे कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. मागील महिनाभरापासून वेकोलिने घोन्सा कोळसा खाणीत स्फोटाची तीव्रता वाढविली असल्याचे गावकरी सांगतात.

ब्लास्टिंगच्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

  • घोन्सा कोळसा खाणीत केल्या जाणाऱ्या स्फोटानंतर त्याचा धूर गावापर्यंत येतो. या प्रदूषणामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकांना श्वसनाचे आजार आता जडू लागले आहेत. मात्र वेकोलिचे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
  • घोन्सा गावाजवळून विदर्भा नदी २ वाहते. या नदीतील पाणी जनावरे पितात. तसेच शेतपिकांनादेखील या नदीचे पाणी सिंचनासाठी वापरले जाते. परंतु घोन्सा कोळसा खाणीतील रसायनयुक्त प्रदूषित पाणी या नदीत सोडले जात आहे.
  • या रसायनयुक्त पाण्यामुळे 3 नदीतील जीवांनादेखील धोका झाला आहे. हेच पाणी काही शेतकरी सिंचनासाठी वापरत असल्याने शेतीच्या उत्पादनावरही त्याचा परिणाम होत आहे. याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
  • कोळसा खाणीमुळे या भागात धूळ प्रदूषणाचाही प्रश्न गंभीर बनत चालला आहे. धुळीचा प्रकोप होऊ नये म्हणून ज्या उपाययोजना करायला पाहिजे, त्या उपाययोजना वेकोलिकडून केल्या जात नाहीत.

३० दिवस तक्रारी करूनही कारवाई झालीच नाहीमागील ३० दिवसांपासून सायंकाळच्या वेळी हे दोनदा बारूदीचे स्फोट केले जात आहेत. यासंदर्भात गावकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या. मात्र या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही.

"गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून घोन्सा कोळसा खाणीत स्फोट घडविले जात आहेत. त्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. तक्रार करूनही उपयोग नाही."- दिलीप काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य, घोन्सा.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ