शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

स्फोटाचे दगड शेतात; घोन्सा कोळसा खाणीत स्फोटाची तीव्रता वाढविली, नागरिक दहशतीखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 17:41 IST

Yavatmal : तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांत रोष

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : गेल्या काही दिवसांपासून घोन्सा कोळसा खाणीत स्फोटाची तीव्रता वाढविली आहे. कोळशाचे अधिक उत्पादन काढण्याच्या मोहात करण्यात येणारे हे स्फोट गावकऱ्यांसाठी विनाशकारी ठरत आहे. स्फोटानंतर खाणीत मोठमोठे दगड थेट शेतात येऊन पडत असल्याने शेतकरी दहशतीखाली वावरत आहेत. सध्या रब्बीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी, शेतमजूर शेतात राबत आहेत. अशातच घोन्सा कोळसा खाणीत दररोज मोठमोठे तीव्र स्वरूपाचे स्फोट केले जात आहेत. स्फोटानंतर आजूबाजूच्या शेतांमध्ये मोठमोठ्या दगडांचा खच येऊन पडत आहे. यातून जीवित हानी होण्याची भीती गावकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. घोन्सा कोळसा खाणीत गुरुवारी दुपारी ३:३० व त्यानंतर ४ वाजता लागोपाठ दोन स्फोट करण्यात आले. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, घोन्सा गावातील मुख्य मार्गावर असलेल्या दुकानांच्या ईमारतीचे शटर हादरत होते. त्यामुळे नागरिक भयभीत झालेत.

घरांच्या भिंतींना गेले तडेघोन्सा कोळसा खाणीतील भीषण स्फोटामुळे घोन्सा गावातील अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. या गावात पक्क्या घरांसह काही मातीची घरेदेखील आहेत. या स्फोटामुळे ही घरे कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. मागील महिनाभरापासून वेकोलिने घोन्सा कोळसा खाणीत स्फोटाची तीव्रता वाढविली असल्याचे गावकरी सांगतात.

ब्लास्टिंगच्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

  • घोन्सा कोळसा खाणीत केल्या जाणाऱ्या स्फोटानंतर त्याचा धूर गावापर्यंत येतो. या प्रदूषणामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकांना श्वसनाचे आजार आता जडू लागले आहेत. मात्र वेकोलिचे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
  • घोन्सा गावाजवळून विदर्भा नदी २ वाहते. या नदीतील पाणी जनावरे पितात. तसेच शेतपिकांनादेखील या नदीचे पाणी सिंचनासाठी वापरले जाते. परंतु घोन्सा कोळसा खाणीतील रसायनयुक्त प्रदूषित पाणी या नदीत सोडले जात आहे.
  • या रसायनयुक्त पाण्यामुळे 3 नदीतील जीवांनादेखील धोका झाला आहे. हेच पाणी काही शेतकरी सिंचनासाठी वापरत असल्याने शेतीच्या उत्पादनावरही त्याचा परिणाम होत आहे. याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
  • कोळसा खाणीमुळे या भागात धूळ प्रदूषणाचाही प्रश्न गंभीर बनत चालला आहे. धुळीचा प्रकोप होऊ नये म्हणून ज्या उपाययोजना करायला पाहिजे, त्या उपाययोजना वेकोलिकडून केल्या जात नाहीत.

३० दिवस तक्रारी करूनही कारवाई झालीच नाहीमागील ३० दिवसांपासून सायंकाळच्या वेळी हे दोनदा बारूदीचे स्फोट केले जात आहेत. यासंदर्भात गावकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या. मात्र या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही.

"गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून घोन्सा कोळसा खाणीत स्फोट घडविले जात आहेत. त्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. तक्रार करूनही उपयोग नाही."- दिलीप काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य, घोन्सा.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ