शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
3
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
4
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
5
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
6
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
7
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
8
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
9
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
10
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
11
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
12
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
13
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
14
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
15
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
16
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
17
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
18
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
19
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
20
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 

शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडणारा सर्वंकष सर्वेक्षणाचा जिल्ह्यात प्रयोग

By admin | Updated: February 28, 2015 02:00 IST

शेतकरी कुटंबासमोर अडचणींचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा स्थितीत नैराश्याने खचलेले कुटुंब प्रमुख आत्महत्येचा मार्ग पत्कारत आहेत. आत्महत्येनंतर कुटुंबाला मदत मिळते.

रूपेश उत्तरवार यवतमाळ शेतकरी कुटंबासमोर अडचणींचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा स्थितीत नैराश्याने खचलेले कुटुंब प्रमुख आत्महत्येचा मार्ग पत्कारत आहेत. आत्महत्येनंतर कुटुंबाला मदत मिळते. ही दुर्घटना घडण्यापूर्वीच उपाय सुचविले गेले तर दुर्घटना टळेल. हाच उदात्त हेतु डोळ्यापुढे ठेवुन यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्वेक्षण होणार आहे. महसूल आणि वनविभागाने तसा अद्यादेश काढला आहे. गाव पातळीवर १ मार्च पासून सर्वेक्षण होणार असून शासन दरबारी उपाय योजना सूचविल्या जाणार आहे. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शासन दरबारी विविध उपाय सूचविण्यात आले. मात्र त्यानंतरही आत्महत्या थांबल्या नाही. आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली नाही. यामुळे प्रत्येक शेतकरी कुटुंबातील अडचणी जाणुन घेण्यासाठी शासन शेतकरी कुटुंबाच्या दारी जाणार आहे. पहिला प्रयोग यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात राबविला जाणार आहे. याबाबत तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी अधिकाऱ्यांवर सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. यासाठी शासनाचे उपसचिव प्रकाश सुरवशे यांनी अध्यादेश जारी केला आहे. कर्मचारी जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी कुटुंबांचा अर्ज भरून घेणार आहे. यामध्ये शेतकरी कुटुंबाकडे किती एकर शेत जमीन आहे. त्यांच्या घरातील इतर सदस्य काय काम करतात. त्यांच्याकडे शेतीला पूरक व्यवसाय आहे का, त्यातून त्यांना काही उत्पन्न मिळते का, गुरे, शेळ्या, मेंढ्या, दुधाळ जणावर किती आहेत. कोणत्या बँकेचे किती कर्ज आहे. सावकाराचे कर्ज आहे का, शैक्षणिक कर्ज घेतले आहे का, कुटुंबातील व्यक्तींचा विमा उतरविण्यात आला आहे का, यासह अनेक प्रश्नांची उत्तरे या सर्वेक्षणातून शोधली जाणार आहे . त्यावर कोणत्या उपाययोजना करावयाच्या, याबाबत विचार विनिमय करण्यात येणार आहे. यातूनच शेतकरी कुटुंबासमोरील अडचणीचा डोंगर दूर करण्यासाठी उपाय सूचविले जाणार आहे. यामुळे हे सर्वेक्षण एक आदर्श मॉडेल ठरणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यातून आशेचा किरण गवसणार आहे.