शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडणारा सर्वंकष सर्वेक्षणाचा जिल्ह्यात प्रयोग

By admin | Updated: February 28, 2015 02:00 IST

शेतकरी कुटंबासमोर अडचणींचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा स्थितीत नैराश्याने खचलेले कुटुंब प्रमुख आत्महत्येचा मार्ग पत्कारत आहेत. आत्महत्येनंतर कुटुंबाला मदत मिळते.

रूपेश उत्तरवार यवतमाळ शेतकरी कुटंबासमोर अडचणींचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा स्थितीत नैराश्याने खचलेले कुटुंब प्रमुख आत्महत्येचा मार्ग पत्कारत आहेत. आत्महत्येनंतर कुटुंबाला मदत मिळते. ही दुर्घटना घडण्यापूर्वीच उपाय सुचविले गेले तर दुर्घटना टळेल. हाच उदात्त हेतु डोळ्यापुढे ठेवुन यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्वेक्षण होणार आहे. महसूल आणि वनविभागाने तसा अद्यादेश काढला आहे. गाव पातळीवर १ मार्च पासून सर्वेक्षण होणार असून शासन दरबारी उपाय योजना सूचविल्या जाणार आहे. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शासन दरबारी विविध उपाय सूचविण्यात आले. मात्र त्यानंतरही आत्महत्या थांबल्या नाही. आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली नाही. यामुळे प्रत्येक शेतकरी कुटुंबातील अडचणी जाणुन घेण्यासाठी शासन शेतकरी कुटुंबाच्या दारी जाणार आहे. पहिला प्रयोग यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात राबविला जाणार आहे. याबाबत तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी अधिकाऱ्यांवर सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. यासाठी शासनाचे उपसचिव प्रकाश सुरवशे यांनी अध्यादेश जारी केला आहे. कर्मचारी जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी कुटुंबांचा अर्ज भरून घेणार आहे. यामध्ये शेतकरी कुटुंबाकडे किती एकर शेत जमीन आहे. त्यांच्या घरातील इतर सदस्य काय काम करतात. त्यांच्याकडे शेतीला पूरक व्यवसाय आहे का, त्यातून त्यांना काही उत्पन्न मिळते का, गुरे, शेळ्या, मेंढ्या, दुधाळ जणावर किती आहेत. कोणत्या बँकेचे किती कर्ज आहे. सावकाराचे कर्ज आहे का, शैक्षणिक कर्ज घेतले आहे का, कुटुंबातील व्यक्तींचा विमा उतरविण्यात आला आहे का, यासह अनेक प्रश्नांची उत्तरे या सर्वेक्षणातून शोधली जाणार आहे . त्यावर कोणत्या उपाययोजना करावयाच्या, याबाबत विचार विनिमय करण्यात येणार आहे. यातूनच शेतकरी कुटुंबासमोरील अडचणीचा डोंगर दूर करण्यासाठी उपाय सूचविले जाणार आहे. यामुळे हे सर्वेक्षण एक आदर्श मॉडेल ठरणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यातून आशेचा किरण गवसणार आहे.