शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

महागड्या मुद्रांकांचा सामान्यांना फटका; योजनांचा भार मध्यमवर्गीयांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 17:47 IST

Yavatmal : शपथपत्र, हक्कसोडपत्र, प्रतिज्ञापत्र, दस्त नोंदणीसाठी ५०० रुपयांचा मुद्रांक

लोकमत न्यूज नेटवर्क वणी : महसूल वाढीसाठी राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १०० व २०० रुपयांचे मुद्रांक बंद करून थेट ५०० रुपयांचा मुद्रांक वापरावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना प्रतिज्ञापत्र व शपथपत्रासाठी ५०० रुपयांच्या मुद्रांकाचा वापर करावा लागणार आहे. यातून शासनाचा महसूल वाढणार असला तरी सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र १००, २०० रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. मात्र, शासकीय कामांसाठी मुद्रांक पेपरची माफी कायम ठेवली आहे.

महायुती सरकारने अनेक योजनांचा धडाका लावल्यामुळे शासकीय तिजोरीवर ताण आला आहे. हा ताण कमी करण्यासाठी व महसूल वाढावा यासाठी मुद्रांक अधिनियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १०० व २०० रुपयांचे स्टॅम्प बंद केले जाणार आहेत. त्याऐवजी नागरिकांना शपथपत्र, हक्कसोडपत्र, प्रतिज्ञापत्र, दस्त नोंदणीसाठी पाचशे रुपयांच्या स्टॅम्पचा वापर करावा लागणार आहे. या निर्णयामुळे शासनाच्या महसुलात वाढ होणार असली तरी सर्वसामान्यांना मात्र भुर्दंड सहन करावा लागणार आहे. घर किंवा खोली भाड्याने देताना करावा लागणाऱ्या करारासाठीही ५०० रुपयांचाच मुद्रांक लावावा लागणार आहे.

तसेच यापूर्वी प्रतिज्ञापत्र शंभर रुपयांच्या मुद्रांकावर होत होते. ते आता ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर लावावे लागेल, तसेच विविध शासकीय कामांसाठी कराव्या लागणाऱ्या शपथपत्रासाठी ५०० रुपयांचा स्टॅम्प लावावा लागणार आहे. कारण १०० व २०० रुपयांच्या स्टॅम्पचा वापर बंद केला जाणार आहे. यामुळे जी कामे १०० किंवा २०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरमध्ये होत होती, ती कामे करण्यासाठी वणी तालुक्यातील नागरिकांना आता ५०० रुपये मोजावे लागणार आहेत. याबाबतचा अध्यादेश लवकरच जारी होणार आहे; पण या निर्णयामुळे ज्यांनी यापूर्वीच खरेदी केलेल्या १०० व २०० रुपयांचे स्टॅम्पपेपर पुढे चालणार की त्यांना ते रद्द करून पाचशे रुपयांचे स्टॅम्प घ्यावे लागणार, याबाबत सध्या तरी संभ्रमावस्था आहे. 

करारासाठीही ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क दस्त नोंदणीसाठी यापूर्वी १०० किवा २०० रुपयांचे मुद्रांक शुल्क भरून दस्तऐवज नोंदणीकृत करता येत होते. मात्र, आता ही रक्कम किमान पाचशे रुपये करण्यात आली आहे. कोणताही करार करताना वापरावे लागणारे मुद्रांकही ५०० रुपयांचे असतील.

 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ