शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

महागड्या मुद्रांकांचा सामान्यांना फटका; योजनांचा भार मध्यमवर्गीयांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 17:47 IST

Yavatmal : शपथपत्र, हक्कसोडपत्र, प्रतिज्ञापत्र, दस्त नोंदणीसाठी ५०० रुपयांचा मुद्रांक

लोकमत न्यूज नेटवर्क वणी : महसूल वाढीसाठी राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १०० व २०० रुपयांचे मुद्रांक बंद करून थेट ५०० रुपयांचा मुद्रांक वापरावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना प्रतिज्ञापत्र व शपथपत्रासाठी ५०० रुपयांच्या मुद्रांकाचा वापर करावा लागणार आहे. यातून शासनाचा महसूल वाढणार असला तरी सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र १००, २०० रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. मात्र, शासकीय कामांसाठी मुद्रांक पेपरची माफी कायम ठेवली आहे.

महायुती सरकारने अनेक योजनांचा धडाका लावल्यामुळे शासकीय तिजोरीवर ताण आला आहे. हा ताण कमी करण्यासाठी व महसूल वाढावा यासाठी मुद्रांक अधिनियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १०० व २०० रुपयांचे स्टॅम्प बंद केले जाणार आहेत. त्याऐवजी नागरिकांना शपथपत्र, हक्कसोडपत्र, प्रतिज्ञापत्र, दस्त नोंदणीसाठी पाचशे रुपयांच्या स्टॅम्पचा वापर करावा लागणार आहे. या निर्णयामुळे शासनाच्या महसुलात वाढ होणार असली तरी सर्वसामान्यांना मात्र भुर्दंड सहन करावा लागणार आहे. घर किंवा खोली भाड्याने देताना करावा लागणाऱ्या करारासाठीही ५०० रुपयांचाच मुद्रांक लावावा लागणार आहे.

तसेच यापूर्वी प्रतिज्ञापत्र शंभर रुपयांच्या मुद्रांकावर होत होते. ते आता ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर लावावे लागेल, तसेच विविध शासकीय कामांसाठी कराव्या लागणाऱ्या शपथपत्रासाठी ५०० रुपयांचा स्टॅम्प लावावा लागणार आहे. कारण १०० व २०० रुपयांच्या स्टॅम्पचा वापर बंद केला जाणार आहे. यामुळे जी कामे १०० किंवा २०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरमध्ये होत होती, ती कामे करण्यासाठी वणी तालुक्यातील नागरिकांना आता ५०० रुपये मोजावे लागणार आहेत. याबाबतचा अध्यादेश लवकरच जारी होणार आहे; पण या निर्णयामुळे ज्यांनी यापूर्वीच खरेदी केलेल्या १०० व २०० रुपयांचे स्टॅम्पपेपर पुढे चालणार की त्यांना ते रद्द करून पाचशे रुपयांचे स्टॅम्प घ्यावे लागणार, याबाबत सध्या तरी संभ्रमावस्था आहे. 

करारासाठीही ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क दस्त नोंदणीसाठी यापूर्वी १०० किवा २०० रुपयांचे मुद्रांक शुल्क भरून दस्तऐवज नोंदणीकृत करता येत होते. मात्र, आता ही रक्कम किमान पाचशे रुपये करण्यात आली आहे. कोणताही करार करताना वापरावे लागणारे मुद्रांकही ५०० रुपयांचे असतील.

 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ