शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

उपबाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: November 13, 2014 23:08 IST

शेतकऱ्यांच्या शेतमालाला गावाजवळच बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी उपबाजार समित्या निर्माण केल्या. जिल्ह्यातील १७ बाजार समित्या आणि २५ उपबाजार समित्या आहेत.

यवतमाळ: शेतकऱ्यांच्या शेतमालाला गावाजवळच बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी उपबाजार समित्या निर्माण केल्या. जिल्ह्यातील १७ बाजार समित्या आणि २५ उपबाजार समित्या आहेत. मात्र या ठिकाणी असलेली उलाढाल मंदावली आणि आता तर बाजार समित्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. जिल्ह्यात १७ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. त्यासोबतच २५ ठिकाणी उपबाजार समित्यांची निर्मिती करण्यात आली. या ठिकाणी शेतमालाची उलाढाल होते. ही उलाढाल कोट्यवधी रुपयांच्या घरात असते. यातून बाजार समितीला दरवर्षी लाखो रुपयांचा सेस मिळतो. मिळणाऱ्या सेसवर बाजार समिती कर्मचाऱ्यांचे वेतन आणि दुरुस्ती आणि इतर खर्च केला जातो. त्यामुळे बाजार समितीसाठी सेस फंड म्हणजे बाजार समितीचा उत्पन्न स्रोत होय. यासाठी प्रत्येक बाजार समिती प्रयत्न करते. यावर्षी मात्र चित्र अगदी विरुद्ध आहे. शेतकऱ्यांच्या घरातच माल नाही. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये शेतमाल येणार तरी कोठून. जिल्ह्याच्या ठिकाणी शुकशुकाट आहे. तर इतर बाजार समित्यांची काय अवस्था. मुख्य बाजार समित्याच प्रभावित झाल्या. तेथे उपबाजार समित्यांची अवस्था त्याही पेक्षा दयनीय आहे. जिल्ह्यात असलेल्या २५ उपबाजार समित्यांमधील बहुतांश ठिकाणी अद्याप उलाढालीला शुभारंभही झाला नाही. यातून बाजार समितीचे कामकाज प्रभावित झाले. उलाढाल न झाल्याने सेस मिळणार नाही. सेस मिळाला नाही तर करायचे काय अशा स्थितीत या उपबाजार समितीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागले आहे.गतवर्षी कापसाचा अनुभव वाईट आहे. अनेक व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी यंदा जिनिंगच बंद आहे. जीन नसल्याने कापूस येणार नाही. त्यामुळेही उपबाजार समितीच्या आर्थिक उलाढालीला बेक्र लागला आहे. (शहर वार्ताहर)