शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

टिपेश्वर अभयारण्यात क्षमतेच्या चौपट वाघांचे अस्तित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 05:00 IST

वन विभागाच्या रेकॉर्डवर १८ ते १९ वाघांची नोंद असून प्रत्यक्षात २८ ते ३० वाघ असल्याचे सांगितले जाते. वाघांची ही संख्या अभयारण्याच्या कार्यक्षेत्राच्या चौपट अधिक असल्याचे दिसून येते. वास्तविक क्षेत्र कमी आणि वाघ जास्त झाल्याने त्यांना पकडून इतरत्र हलविणे, त्यांना त्यांच्या क्षेत्रात मोकळीक देणे आणि मानवी वस्त्यांमधील त्यांचा संचार, शेतशिवारातील हल्ले थांबविणे अपेक्षित आहे.

ठळक मुद्देजंगल क्षेत्र कमी पडतेय : अभयारण्याच्या बाहेर वाघांचा वावर ठरतोय गावांसाठी धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील पर्यटनाचे प्रमुख वैभव असलेल्या पांढरकवडा तालुक्याच्या टिपेश्वर अभयारण्यात ‘क्षेत्र कमी आणि वाघांची संख्या जास्त’ अशी विसंगत स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाघ जंगलाबाहेर येत असून ते मानवी व पशु जीवांसाठी धोकादायक बनले आहेत.वन्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, एका नर वाघाला किमान ८० चौरस किलोमीटर तर मादी वाघाला २० चौरस किलोमीटर क्षेत्र लागते. त्याच्या या संचार क्षेत्रात तो अन्य कुणाला एन्ट्री करू देत नाही. त्यामुळे इतर वाघ आपले क्षेत्र इतरत्र शोधतात. त्यामुळे क्षेत्र निश्चित करण्याच्या नादात हे वाघ अभयारण्याबाहेर येऊ लागले आहे. मात्र मानवाला वाघांनी आपल्या हद्दीत अतिक्रमण केल्याचा समज होऊ लागला आहे. प्रत्यक्षात वाघाला त्याचे क्षेत्र कमी पडत आहे.टिपेश्वर अभयारण्याचे एकूण क्षेत्र १४८ चौरस किलोमीटर एवढे आहे. तेथे जास्तीत जास्त ७ ते ८ वाघ संचार करू शकतात. मात्र तेथे वन विभागाच्या रेकॉर्डवर १८ ते १९ वाघांची नोंद असून प्रत्यक्षात २८ ते ३० वाघ असल्याचे सांगितले जाते. वाघांची ही संख्या अभयारण्याच्या कार्यक्षेत्राच्या चौपट अधिक असल्याचे दिसून येते. वास्तविक क्षेत्र कमी आणि वाघ जास्त झाल्याने त्यांना पकडून इतरत्र हलविणे, त्यांना त्यांच्या क्षेत्रात मोकळीक देणे आणि मानवी वस्त्यांमधील त्यांचा संचार, शेतशिवारातील हल्ले थांबविणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात सरकार व वन प्रशासन याकडे लक्षच देत नसल्याचे दिसून येते. वाघांच्या दहशतीमुळे टिपेश्वर बाहेरील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतींच्या कामांवरही त्याचा परिणाम होतो आहे.प्रत्येक व्याघ्र प्रकल्प व अभयारण्यांची स्थिती वेगळी आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ६०० चौरस किलोमीटर क्षेत्रात ८० नर वाघांचे वास्तव आहे. त्याचा बफर झोन आता वाढविल्याने सुमारे १२०० चौरस किलोमीटर झाला आहे.बोर सर्वात छोटे व्याघ्र प्रकल्पराज्यात बोर हे सर्वात छोटे अर्थात १३० चौरस किलोमीटर क्षेत्रातील व्याघ्र प्रकल्प आहे. त्याचा बफर झोन मात्र आता ५०० चौरस किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आला आहे. उमरेड-कन्हान व्याघ्र प्रकल्पातसुद्धा कमी क्षेत्रात जास्त मादी वाघ असल्याचे सांगितले जाते.व्याघ्र प्रकल्प हवा हजार चौकिमींचाटिपेश्वर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याचे प्रस्तावित असले तरी त्यासाठी किमान ८०० ते एक हजार चौरस किलोमीटर क्षेत्र असणे अपेक्षित आहे. हे क्षेत्र वाढविणे अथवा स्थलांतर करून वाघांची संख्या घटविणे हे पर्याय आहेत.वाघांच्या स्थलांतरणावर हवा जोरटिपेश्वरचे कोअर क्षेत्र वाढविताना गावांची अडचण येत आहे. कारण की परिसरात अनेक गावे आहेत. टिपेश्वर अभयारण्यातील वाघांची संख्या नियंत्रित करण्यावर, स्थलांतरित करण्यावर जोर दिला जात नसल्याने वाघ अभयारण्याबाहेर गाव आणि शेतशिवारात शिरुन नरभक्षक बनल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यात आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला असून आत्ताच व्यापक उपाययोजना न झाल्यास पुढेही मानवी जीवांना वाघांचा धोका कायम राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.क्षमता सात वाघांची, प्रत्यक्षात वावरतात ३० वाघतज्ज्ञांच्या मते, टिपेश्वर अभयारण्यात दोन नर आणि पाच मादी वाघ राहू शकतात. परंतु प्रत्यक्षात तेथे वाघांच्या वास्तव्यांची संख्या कितीतरी अधिक आहे. वाघांची सतत भटकंती सुरु असते. एखादा वाघ दरवर्षी ट्रॅप कॅमेरात दिसत असेल तर तो तिथे निवासी झाला असे वन विभाग मानतो. वाघांची पिल्ले मात्र सतत ठिकाण बदलवितात.टिपेश्वर व पैनगंगा मिळून व्याघ्र प्रकल्पआता टिपेश्वर आणि पैनगंगा हे दोन अभयारण्या मिळून एक व्याघ्र प्रकल्प करता येतो का या दृष्टीने चाचपणी केली जात आहे. टिपेश्वर परिसरात बफर झोन वाढविण्याचाही प्रस्ताव आहे. बफर झोन वाढविल्यास कोणतेही पुनर्वसन करावे लागत नाही. गावे, शेती कायम राहते. मानव व प्राण्यांचे सहअस्तित्व बफर झोनमध्ये मान्य करण्यात आले.

टॅग्स :Tipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्यTigerवाघ