शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

पिके वाचविण्यासाठी कसरत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:10 IST

लिहा बु.: परिसरात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची कसरत सुरू आहे. या परतीच्या पावसाचा फटका सोयाबीन, कापसाला बसला असून, शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा परिणाम सोयाबीन, कपाशीला फटका!

लोकमत न्यूज नेटवर्कलिहा बु.: परिसरात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची कसरत सुरू आहे. या परतीच्या पावसाचा फटका सोयाबीन, कापसाला बसला असून, शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.मोताळा तालुक्यातील लिहा बु. विभागात प्रथमपासून शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होते; मात्र परतीच्या पावसाने सुरुवातीला कमी वेळात दोन दिवस झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता. या पावसामुळे विभागातील नदी, नाल्यावरील बंधार्‍यामध्ये पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात कपाशी, तूर व रब्बी पिकांना एक-दोन पाणी देऊन आपल्या उत्पन्नात वाढ करू शकतो; मात्र संततधार पावसामुळे शेतकर्‍यांच्या समस्येत भर पडली असून, सोयाबीन व कापसाला फटका बसण्याची शक्यता आहे.या आठवड्यात प्रथमपासूनच आकाशात ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे कापूस वेचणीसाठी मजुरीचे दर वधारले आहेत. हवामान खात्याच्या इशार्‍यामुळे गावातील काही शेतकर्‍यांनी मुनादी देऊन प्रचलित दरापेक्षा प्रति किलो कापूस वेचणीत वाढ करून स्वत:च्या शेतातील कापूस पावसाअगोदरच गोळा केला; परंतु कित्येक शेतकरी मजुरी वाढविण्यासाठी तयार नसल्यामुळे शेतमजूरसुद्धा जिकडे मजुरी वाढ मिळेल, त्यांच्या शेतात जाण्यास प्राधान्य देत होते. त्यामुळे मजुराप्रती शेतकर्‍यांमध्ये रोष निर्माण होताना दिसत होता.  त्यामुळे संततधार पावसाने काही शेतकर्‍यांना फटका दिला. या परिसरातील अनेक शेतकर्‍यांचे सोयाबीन शेतात सोंगणीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी काही शेतकर्‍यांच्या सोयाबीनला अंकुर फुटण्याची शक्यता आहे.ज्या शेतकर्‍यांनी मजुरी कमी होईल व दर वाढविण्यास अनुकूलता दाखविली नाही, त्यांना सदर पावसामुळे मोठे नुकसान होऊन आर्थिक फटका बसणार आहे. या पावसामुळे शेतात कापणीसाठी आलेले सोयाबीन, ज्वारी काळी होण्याची शक्यता असून मका, ज्वारीचा चारा काळा झाला आहे, तर सतत पाऊस असल्यामुळे साेंगणीसाठी त्रास होत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीच्या कामात कोणतीही दिरंगाई यापुढे शेतकरी वर्गासाठी नुकसानीत भर टाकणारी ठरणार आहे. त्यामुळे मजुरीत वाढ करण्याबाबत शेतकर्‍यांनी आपले धोरण बदलून लवचिक करावे व पिकाची अवस्था व निसर्गाचा लहरीपणा यामध्ये समन्वय साधून मजुरी दरात वाढ देणे आवश्यक झाले आहे.  आपल्या मालास चांगला बाजार भाव मिळण्यासाठी त्याची प्रत टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक शेतकरी मजुरांना वाढीव मजुरी देत असल्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसणार आहे.