शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

अखेर संपूर्ण जिल्हाच दुष्काळग्रस्त घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 22:04 IST

निसर्गाच्या लहरीपणाने यावर्षी खरिपाच्या हंगामाला मोठा फटका बसला. यामुळे कापूस, सोयाबीन आणि तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल विभागाच्या ‘रँडमली’ पीक सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली. याचा परिणाम अंतिम पैसेवारीवर झाला. जिल्ह्याची पीक पैसेवारी ४७ टक्केच्या घरात आली आहे. सर्वच १६ तालुक्यांची पैसेवारी ५० टक्केच्या आत आहे. यामुळे महसूल प्रशासनाच्या लेखी संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला आहे.

ठळक मुद्देमहसूलचे शिक्कामोर्तब : अंतिम पैसेवारी ४७ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाने यावर्षी खरिपाच्या हंगामाला मोठा फटका बसला. यामुळे कापूस, सोयाबीन आणि तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल विभागाच्या ‘रँडमली’ पीक सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली. याचा परिणाम अंतिम पैसेवारीवर झाला. जिल्ह्याची पीक पैसेवारी ४७ टक्केच्या घरात आली आहे. सर्वच १६ तालुक्यांची पैसेवारी ५० टक्केच्या आत आहे. यामुळे महसूल प्रशासनाच्या लेखी संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला आहे.संपूर्ण जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी करण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक पाच लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली. प्रारंभी उत्तम अवस्थेत असलेली कपाशी पावसाने पाठ फिरवल्याने हातातून गेली. याचा कापूस उत्पादनाला मोठा फटका बसला. एक ते दोन क्विंटलच्या कापूस उताऱ्यावरच शेतकºयांना समाधान मानावे लागले. दिवाळीनंतर गुलाबी बोंडअळीने हल्ला चढविला. यामुळे फरदडचे उत्पादनही शेतकºयांना घेता आले नाही.सोयाबीनच्या बाबतीत असेच घडले. अडीच लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. अपुºया पावसाने सोयाबीनच्या शेंगा वाळल्या. त्याला उत्तम असा उताराच आला नाही. यामुळे सोयाबीनचा लागवड खर्चही निघाला नाही. सोयाबीन उत्पादकला याची मोठी किंमत चुकवावी लागली. तुरीच्या पिकावर शेतकºयांची आशा होती. मात्र तुरीचे खराटेच झाले. धुवारी, अवेळी आलेला पाऊस, अळीचे आक्रमण आणि कडाक्याच्या थंडिने तुरीचा बार जळला. शेंगा वेळेपूर्वीच वाळल्या. जिल्ह्यातील अर्ध्या अधिक शेतकºयांनी तुरीची सोंगणीच केली नाही. इतकी वाईट अवस्था तूर उत्पादक शेतकºयांची आहे. एकंदरीत सर्वच पीक हातातून गेल्याने शेतकºयांवर मोठे संकट कोसळले आहे. आता पुढील सहा महिन्यात कुठलेही पीक हातात नाही. दुसºयांची देणी बाकी आहे. या स्थितीत कुटुंब चालवायचे कसे, हा गंभीर प्रश्न शेतकरी कुटुंबापुढे उभा आहे.तात्काळ उपाययोजना हव्यादुष्काळी स्थितीतून बाहेर पडण्यासाठी जिल्ह्यात ठोस उपाययोजनांची गरज आहे. विशेष म्हणजे, शेतीला जोडधंदा असला तरच शेतकरी अशा स्थितीत तग धरणार आहे. सलग चौथ्या वर्षी जिल्ह्यावर दुष्काळी छाया पडली. यामुळे शेतकरी पार खचला आहे.आता नऊ नव्हे १६ तालुक्यांंना दुष्काळी सवलतीसुधारीत आणेवारीमध्ये ९ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले होते. सात तालुक्यांनी महसूल प्रशासनाच्या सर्वेक्षणावर आक्षेप नोंदवित संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली होती. आता अंतिम पैसेवारीमध्ये सर्व १६ तालुके दुष्काळाच्या यादीत आले आहेत. यामुळे १६ तालुक्यांना दुष्काळी मदतीचा लाभ मिळणार आहे.