शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

अखेर संपूर्ण जिल्हाच दुष्काळग्रस्त घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 22:04 IST

निसर्गाच्या लहरीपणाने यावर्षी खरिपाच्या हंगामाला मोठा फटका बसला. यामुळे कापूस, सोयाबीन आणि तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल विभागाच्या ‘रँडमली’ पीक सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली. याचा परिणाम अंतिम पैसेवारीवर झाला. जिल्ह्याची पीक पैसेवारी ४७ टक्केच्या घरात आली आहे. सर्वच १६ तालुक्यांची पैसेवारी ५० टक्केच्या आत आहे. यामुळे महसूल प्रशासनाच्या लेखी संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला आहे.

ठळक मुद्देमहसूलचे शिक्कामोर्तब : अंतिम पैसेवारी ४७ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाने यावर्षी खरिपाच्या हंगामाला मोठा फटका बसला. यामुळे कापूस, सोयाबीन आणि तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल विभागाच्या ‘रँडमली’ पीक सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली. याचा परिणाम अंतिम पैसेवारीवर झाला. जिल्ह्याची पीक पैसेवारी ४७ टक्केच्या घरात आली आहे. सर्वच १६ तालुक्यांची पैसेवारी ५० टक्केच्या आत आहे. यामुळे महसूल प्रशासनाच्या लेखी संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला आहे.संपूर्ण जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी करण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक पाच लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली. प्रारंभी उत्तम अवस्थेत असलेली कपाशी पावसाने पाठ फिरवल्याने हातातून गेली. याचा कापूस उत्पादनाला मोठा फटका बसला. एक ते दोन क्विंटलच्या कापूस उताऱ्यावरच शेतकºयांना समाधान मानावे लागले. दिवाळीनंतर गुलाबी बोंडअळीने हल्ला चढविला. यामुळे फरदडचे उत्पादनही शेतकºयांना घेता आले नाही.सोयाबीनच्या बाबतीत असेच घडले. अडीच लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. अपुºया पावसाने सोयाबीनच्या शेंगा वाळल्या. त्याला उत्तम असा उताराच आला नाही. यामुळे सोयाबीनचा लागवड खर्चही निघाला नाही. सोयाबीन उत्पादकला याची मोठी किंमत चुकवावी लागली. तुरीच्या पिकावर शेतकºयांची आशा होती. मात्र तुरीचे खराटेच झाले. धुवारी, अवेळी आलेला पाऊस, अळीचे आक्रमण आणि कडाक्याच्या थंडिने तुरीचा बार जळला. शेंगा वेळेपूर्वीच वाळल्या. जिल्ह्यातील अर्ध्या अधिक शेतकºयांनी तुरीची सोंगणीच केली नाही. इतकी वाईट अवस्था तूर उत्पादक शेतकºयांची आहे. एकंदरीत सर्वच पीक हातातून गेल्याने शेतकºयांवर मोठे संकट कोसळले आहे. आता पुढील सहा महिन्यात कुठलेही पीक हातात नाही. दुसºयांची देणी बाकी आहे. या स्थितीत कुटुंब चालवायचे कसे, हा गंभीर प्रश्न शेतकरी कुटुंबापुढे उभा आहे.तात्काळ उपाययोजना हव्यादुष्काळी स्थितीतून बाहेर पडण्यासाठी जिल्ह्यात ठोस उपाययोजनांची गरज आहे. विशेष म्हणजे, शेतीला जोडधंदा असला तरच शेतकरी अशा स्थितीत तग धरणार आहे. सलग चौथ्या वर्षी जिल्ह्यावर दुष्काळी छाया पडली. यामुळे शेतकरी पार खचला आहे.आता नऊ नव्हे १६ तालुक्यांंना दुष्काळी सवलतीसुधारीत आणेवारीमध्ये ९ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले होते. सात तालुक्यांनी महसूल प्रशासनाच्या सर्वेक्षणावर आक्षेप नोंदवित संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली होती. आता अंतिम पैसेवारीमध्ये सर्व १६ तालुके दुष्काळाच्या यादीत आले आहेत. यामुळे १६ तालुक्यांना दुष्काळी मदतीचा लाभ मिळणार आहे.