शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर संपूर्ण जिल्हाच दुष्काळग्रस्त घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 22:04 IST

निसर्गाच्या लहरीपणाने यावर्षी खरिपाच्या हंगामाला मोठा फटका बसला. यामुळे कापूस, सोयाबीन आणि तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल विभागाच्या ‘रँडमली’ पीक सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली. याचा परिणाम अंतिम पैसेवारीवर झाला. जिल्ह्याची पीक पैसेवारी ४७ टक्केच्या घरात आली आहे. सर्वच १६ तालुक्यांची पैसेवारी ५० टक्केच्या आत आहे. यामुळे महसूल प्रशासनाच्या लेखी संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला आहे.

ठळक मुद्देमहसूलचे शिक्कामोर्तब : अंतिम पैसेवारी ४७ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाने यावर्षी खरिपाच्या हंगामाला मोठा फटका बसला. यामुळे कापूस, सोयाबीन आणि तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल विभागाच्या ‘रँडमली’ पीक सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली. याचा परिणाम अंतिम पैसेवारीवर झाला. जिल्ह्याची पीक पैसेवारी ४७ टक्केच्या घरात आली आहे. सर्वच १६ तालुक्यांची पैसेवारी ५० टक्केच्या आत आहे. यामुळे महसूल प्रशासनाच्या लेखी संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला आहे.संपूर्ण जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी करण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक पाच लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली. प्रारंभी उत्तम अवस्थेत असलेली कपाशी पावसाने पाठ फिरवल्याने हातातून गेली. याचा कापूस उत्पादनाला मोठा फटका बसला. एक ते दोन क्विंटलच्या कापूस उताऱ्यावरच शेतकºयांना समाधान मानावे लागले. दिवाळीनंतर गुलाबी बोंडअळीने हल्ला चढविला. यामुळे फरदडचे उत्पादनही शेतकºयांना घेता आले नाही.सोयाबीनच्या बाबतीत असेच घडले. अडीच लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. अपुºया पावसाने सोयाबीनच्या शेंगा वाळल्या. त्याला उत्तम असा उताराच आला नाही. यामुळे सोयाबीनचा लागवड खर्चही निघाला नाही. सोयाबीन उत्पादकला याची मोठी किंमत चुकवावी लागली. तुरीच्या पिकावर शेतकºयांची आशा होती. मात्र तुरीचे खराटेच झाले. धुवारी, अवेळी आलेला पाऊस, अळीचे आक्रमण आणि कडाक्याच्या थंडिने तुरीचा बार जळला. शेंगा वेळेपूर्वीच वाळल्या. जिल्ह्यातील अर्ध्या अधिक शेतकºयांनी तुरीची सोंगणीच केली नाही. इतकी वाईट अवस्था तूर उत्पादक शेतकºयांची आहे. एकंदरीत सर्वच पीक हातातून गेल्याने शेतकºयांवर मोठे संकट कोसळले आहे. आता पुढील सहा महिन्यात कुठलेही पीक हातात नाही. दुसºयांची देणी बाकी आहे. या स्थितीत कुटुंब चालवायचे कसे, हा गंभीर प्रश्न शेतकरी कुटुंबापुढे उभा आहे.तात्काळ उपाययोजना हव्यादुष्काळी स्थितीतून बाहेर पडण्यासाठी जिल्ह्यात ठोस उपाययोजनांची गरज आहे. विशेष म्हणजे, शेतीला जोडधंदा असला तरच शेतकरी अशा स्थितीत तग धरणार आहे. सलग चौथ्या वर्षी जिल्ह्यावर दुष्काळी छाया पडली. यामुळे शेतकरी पार खचला आहे.आता नऊ नव्हे १६ तालुक्यांंना दुष्काळी सवलतीसुधारीत आणेवारीमध्ये ९ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले होते. सात तालुक्यांनी महसूल प्रशासनाच्या सर्वेक्षणावर आक्षेप नोंदवित संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली होती. आता अंतिम पैसेवारीमध्ये सर्व १६ तालुके दुष्काळाच्या यादीत आले आहेत. यामुळे १६ तालुक्यांना दुष्काळी मदतीचा लाभ मिळणार आहे.