शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही ढाणकी तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 22:03 IST

अनेक वर्ष तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले आणि आता नगरपंचायत झालेले ढाणकी शहर तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात आहे. मोठ्या संघर्षानंतर चार दलघमी पाणी ढाणकीसाठी आरक्षित करून त्यातील दोन दलघमी पाणी त्वरित पैनगंगा नदी पात्रात सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.

ठळक मुद्देप्रशासन निर्ढावले : आरक्षित पाणी नदीपात्रात सोडलेच नाही, विहिरींच्या अधिग्रहणाकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : अनेक वर्ष तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले आणि आता नगरपंचायत झालेले ढाणकी शहर तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात आहे. मोठ्या संघर्षानंतर चार दलघमी पाणी ढाणकीसाठी आरक्षित करून त्यातील दोन दलघमी पाणी त्वरित पैनगंगा नदी पात्रात सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र प्रशासनाने हा आदेश डावलला असून अजूनही पाणी सोडलेले नाही.ढाणकी गावाची लोकसंख्या ३० हजारांच्यावर आहे. या गावाला पैनगंगा नदीच्या गांजेगाव येथील पात्रातून पाणी पुरवठा केला जातो. ग्रामपंचायत असताना दरवर्षीच हिवाळ्यापासूनच ढाणकी गावाला पाणीटंचाईच्या झळा बसत होत्या. त्यातच नगरपंचायतीची घोषणा झाल्यावर किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षा वाटली होती. नगरपंचायत झाल्यावर राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी निवेदने देऊन पाण्यासाठी आंदोलनाचे इशारेही दिले होते. मात्र पुढे फार काही झाले नाही.आज रोजी ढाणकी गावात पाचशे लिटर पाणी दीडशे ते दोनशे रुपयांना विकत घ्यावे लागत आहे. पाणी टंचाई एवढी तीव्र असून प्रशासनाने अद्यापही गावाभोवताच्या विहिरींचे अधिग्रहण करण्याची तसदी घेतलेली नाही. यावरूनच पाणी प्रश्नावर प्रशासन चालढलक करीत असल्याचे स्पष्ट होते. जिल्हाधिकाºयांनी ९ मे रोजी लेखी स्वरूपात पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्या आदेशात पाटबंधारे विभाग उमरखेड तहसीलदार व इतर सर्व जबाबदार विभागांना प्रतिलिपी देण्यात आली. तरीही नदी पात्रात अद्यापही पाणी सोडण्यात आलेले नाही.गेल्या दीड महिन्यांपासून नळाला पाणी नाही. प्रशासनाने आता तरी जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचा मान राखून आणि ढाणकीवासीयांच्या जीवाची काळजी घेऊन पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईcollectorजिल्हाधिकारी