शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

गावकऱ्यांच्या परवानगीनंतरच बाहेरच्यांना एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कोरोनाचा विषाणू बाहेर ठिकाणावरून येतो. त्याला रोखण्यासाठी देशपातळीवर बंदी घातल्या गेली आहे. आता गावपातळीवर ...

ठळक मुद्देरोहटेक, जामडोह नागरिकांनी केली नाकाबंदी : कोरोनाच्या भीतीने गावाच्या हिताचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा विषाणू बाहेर ठिकाणावरून येतो. त्याला रोखण्यासाठी देशपातळीवर बंदी घातल्या गेली आहे. आता गावपातळीवर ग्रामस्थांनी गावबंदी घातली आहे. यातून गाव सुरक्षित रहावे हा नागरिकांचा मूळ उद्देश आहे.पुणे-मुंबईत रोजगार आणि शिक्षणासाठी वास्तव्याला असणाऱ्या नागरिकांचे लोंढे गावखेड्याकडे वळत आहे. राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या बसफेऱ्या रोखल्या आहे. असे असले तरी बाहेर जिल्ह्यातील व्यक्ती खासगी वाहनाच्या मदतीने गावखेड्यात प्रवेश करीत आहे. दररोज बाहेर जिल्ह्यातील नागरिकांचा आकडा वाढत आहे. यामुळे गावकरी चांगलेच धास्तावले आहे.विदेशातून आलेल्या व्यक्ती आणि पुणे-मुंबईतील व्यक्ती यांच्यामुळेच कोरोनाचा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचा समज गावकऱ्यांचा झाला आहे. याशिवाय इतर कुठला व्यक्ती कोरोनाचा विषाणू बाधित झाला असेल हे कुणालाही सांगत येत नाही. कोरोनाची बाधा झालेला व्यक्ती १४ दिवसानंतरच लक्षणे दाखवितो. तोपर्यंत अनेकांना त्याची बाधा होते. हा प्रकार थांबविण्यासाठी गावकऱ्यांनी बाहेर ठिकाणावरून येणाऱ्या व्यक्तींना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी डोर्ली गावात या निर्णयाची अंमलबजावणी झाली. बुधवारी रोहटेक आणि जामडोह गावामध्ये नागरिकांनी अशाच प्रकारे बाहेर ठिकाणावरुन येणाऱ्या व्यक्तींना प्रवेशबंदी केली आहे. कोरोनाची बाधा रोखण्यासाठी हा निर्णय या गावातील व्यक्तींनी घेतला आहे. जामडोहमध्ये मुख्य रस्त्यावर दोर बांधून बाहेर ठिकाणावरून येणारी वाहने थांबविण्यात येत आहे. तर रोहटेकमध्ये नागरिकांनी रस्त्यांवर दगडांचा थर लावून वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. रस्त्यावर तशा स्वरूपाचा संदेशही लिहिण्यात आला आहे. यामुळे गावाबाहेर पडलेल्या आणि परजिल्ह्यात वास्तव्याला असणाºया व्यक्तींना आता या गावांमध्ये प्रवेश करताना गावकºयांची खात्री झाल्यानंतरच गावात प्रवेश मिळणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसgram panchayatग्राम पंचायत