शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

यवतमाळ जिल्ह्यातील वणीत अख्खी अंत्ययात्राच झाली क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 20:15 IST

आपण ज्या अंत्ययात्रेत गेलो, त्यातच एक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळले आणि साऱ्यांची पाचावर धारण बसली. तर घाम फुटलेल्या प्रशासनाने अख्खी अंत्ययात्राच क्वारंटाईन करून टाकली!

ठळक मुद्देपॉझिटिव्ह महिलेचा सहभागचिखलगाव, कायर, घोन्सातील ६४ जणांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लग्नघरी आणि मयतीला गेले पाहिजे असं गावखेड्यातलं चलन आहे. पण याच सौहादार्मुळे कधी-कधी आफत ओढवते. वणीत मंगळवारी तसेच झाले. जवळची व्यक्ती दगावली म्हणून अनेक जण त्याच्या अंत्ययात्रेत सामील झाले. पण आपण ज्या अंत्ययात्रेत गेलो, त्यातच एक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळले आणि साऱ्यांची पाचावर धारण बसली. तर घाम फुटलेल्या प्रशासनाने अख्खी अंत्ययात्राच क्वारंटाईन करून टाकली!कोरोनाचे गांभीर्य आणि त्याबाबत सामान्य नागरिकांचा गाफिलपणा चव्हाट्यावर आणणारा हा प्रकार येथील चिखलगाव परिसरात घडला. येथील तेली फैल गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. याच भागातील कोरोना पॉझिटिव्ह महिला चिखलगावात येऊन अंत्ययात्रेत सहभागी झाली. या अंत्ययात्रेत चिखलगाव, कायर व घोन्सा येथील ६४ जणांचा समावेश होता.

सदर महिला प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर पडलीच कशी, असा प्रश्न आता चर्र्चिला जात आहे. वणी शहरातील तेली फैलात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. त्यामुळे १३ जुलैपासून हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. या परिसरातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या परिसरात लागोपाठ कोरोनाचे रूग्ण आढळत आहे.

दरम्यान, २२ जुलैला या परिसरातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याच दिवशी चिखलगाव येथे एका व्यक्तीचे निधन झाले. जी व्यक्ती पॉझिटिव्ह आली, तिच्या संपकार्तील एक महिला चिखलगावातील मृत पावलेल्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेसाठी गेली होती. २५ जुलैला या महिलेचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे प्रशासन हादरून गेले. ही महिला कुणाकुणाच्या संपर्कात आली, याचा तपास सुरू असतानाच ती चिखलगावातील एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाल्याची बाब चौकशीत पुढे आल्याने प्रशासनाला घाम फुटला. तातडीने हालचाली करून अंत्यसंस्कारात कोण कोण सहभागी झाले, याचा शोध घेणे सुरू झाले. शोध सुरू असताना चिखलगाव, घोन्सा व कायर येथील एकूण ६४ जणांना प्रशासनाने परसोडा येथील कोविड सेंटरमध्ये क्वॉरंटाईन केले आहे. या साºया प्रकारामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.नागरिकांच्या बेजबाबदारीचा हा कळस आहे. वारंवार सांगूनही लोक ऐकत नाही. ही बाब कोरोना संसर्ग वाढण्यासाठी कारणीभूत ठरली आहे. अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कातील ६४ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले.- डॉ.शरद जावळेउपविभागीय अधिकारी, वणी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस