शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
4
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
5
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
7
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
8
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
9
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
10
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
11
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
12
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
13
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
14
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
15
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
16
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
17
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
18
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
19
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
20
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

अतिक्रमण हटावला अखेर सापडला मुहूर्त

By admin | Updated: June 7, 2015 00:04 IST

जत्रा मैदानावरील अतिक्रमण, शहरातील इतर अतिक्रमणाचे काय होणार याकडे लागले लक्ष....

जाहीर सूचना : जत्रा मैदानावरील अतिक्रमण, शहरातील इतर अतिक्रमणाचे काय होणार याकडे लागले लक्षवणी : येथील जत्रा मैदानावर व्यावसायीकांनी अतिक्रमण केले असून त्याकडे नगपरिषदेचे दुर्लक्ष होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ५ जूनच्या अंकात प्रकाशित केले होते. या अतिक्रमणामुळे नगरपरिषदेची कोट्यवधींची मालमत्ता अतिक्रमणधारकांच्या घशात जात आहे. आता या अतिक्रमणाला हटविण्यासाठी नगरपरिषदेला एकदाचा मुहूर्त सापडला असून येत्या १0 जूनपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात येणार आहे.येथील नगरपरिषदेला तत्कालीन ब्रिटीश सरकारने २ जुलै १९३३ रोजी ७४ एकर जागा हस्तांतरीत केली होती. साप्ताहिक बाजार, बैल बाजार व अन्य सामाजिक, सार्वजनिक कामासाठी ही जागा उपयोगात आणावयाची होती. तथापि या जागेकडे नगरपरिषदेचे सतत दुर्लक्ष झाले. परिणामी काहींनी तेथे अतिक्रमण करून दुकान, घरे थाटली. त्यामुळे ७४ एकरापैकी केवळ ३० एकर जागाच आता शिल्लक दिसत आहे. तत्कालीन ब्रिटीश शासनाने दिलेली ही जागा कुणालाही विकता येत नाही. ती कुणाला हस्तांतरीतही करता येत नाही. या सर्व जागेचे एकूण क्षेत्रफळ तब्बल ३२ लाख ७३ हजार ३९८ चौरस फूट असून ही जागा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे या खुल्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले. त्यांनी तेथे आपली दुकाने, घरे थाटली. नगरपरिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक, कर्मचाऱ्यांनी याकडे सतत दुर्लक्षच केले. त्यामुळे दिवसेंदिवस या या जागेवर अतिक्रमणाचा सपाटा सुरूच आहे. परिणामी आठवडी बाजाराच्या जागेत आता चिकन, मटन विक्रेते, इतर उद्योग, टाल उद्योग, भंगाराची दुकाने दिसून येत आहे. या अतिक्रमणामुळे आता आठवडी बाजारही रस्त्यावरच भरतो. अनेकांना रस्त्यावरच आपली दुकाने थाटावी लागतात. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच आता नगरपरिषद खडबडून जागी झाली आहे. आता अतिक्रमण हटावला मुहूर्त सापडल्याने ही समस्या दूर होण्याची शक्यता आहे. सोबतच शहरातील इतरही अतिक्रमण हटविणे गरजेचे झाले आहे. (प्रतिनिधी) लिलाव करण्याची दिली नोटीस नगरपरिषदेने ‘लोकमत’च्या वृत्तानंतर आरक्षण क्रमांक ७८ व ६६ वरील जत्रा मैदान, आठवडी बाजार परिसर, गोकुलनगर तलावाच्या जागेवरील तसेच दसरा मैदान परिसरातील आरक्षित जागेवरील अतिक्रमणधारकांना जाहीर सूचना दिली आहे. या जाहीर सूचनेत संबंधित अतिक्रमण १0 जूनपासून हटविण्यात येणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे. तत्पूर्वी अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढावे, अन्यथा १0 जूनपासून अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत हे अतिक्रमण कोणतीही सूचना न देता हटविण्यात येणार असल्याचे जाहीर सूचनेतून कळविण्यात आले आहे. अतिक्रमणधारकांना कोणतीही नुकसान भरपाई न देता अतिक्रमणाचे सर्व साहित्य जप्त करून त्याचा जाहीर लिलाव करण्याची ताकीदही या जाहीर सूचनेतून देण्यात आली आहे.