शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

नेर ग्रामीणमध्ये विजेचे वांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 22:25 IST

थोडाही वारा सुटल्यास तालुक्याच्या ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित होतो. दिवस असो वा रात्र तक्रार करूनही विद्युत कंपनीचे कर्मचारी वीज सुरळीत करण्यासाठी पोहोचत नाहीत. काही ठिकाणी तर ४८ तासपर्यंत वीज पुरवठा बंद राहतो. गर्मीमुळे जीव कासावीस होतो.

ठळक मुद्देसिंचनाचा प्रश्न गंभीर : गर्मीने जीव कासावीस, पंखे-कुलर बंद, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : थोडाही वारा सुटल्यास तालुक्याच्या ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित होतो. दिवस असो वा रात्र तक्रार करूनही विद्युत कंपनीचे कर्मचारी वीज सुरळीत करण्यासाठी पोहोचत नाहीत. काही ठिकाणी तर ४८ तासपर्यंत वीज पुरवठा बंद राहतो. गर्मीमुळे जीव कासावीस होतो. कुलर-पंखे घराची शोभा वाढविणारे ठरत आहेत. दुसरीकडे पाण्याअभावी शेतातील पिके वाळत आहे. कितीही तक्रारी केल्या तरी विद्युत कंपनीचे कर्मचारीच काय, तर अधिकारीही दुर्लक्ष करत आहे. परिणामी नागरिकांचा संताप वाढत आहे.विद्युत कंपनीचा उदासीन कारभार नवीन राहिलेला नाही. यामध्ये सुधारणा होण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाही. कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्याने ग्रामीण भागात विजेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी कुणीही उपलब्ध होत नाही. चार ते पाच दिवसपर्यंत वीज पुरवठा बंद राहतो. याचा सर्वाधिक फटका पाणीपुरवठ्याच्या योजनांना बसतो. पीठ गिरण्याही बंद राहात असल्याने हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचा पोटमारा होतो.उन्हाळ्यात करावयाची कामे विद्युत कंपनीने केली नाही. झाडाच्या वाढलेल्या फांद्या तोडल्या नाही. वारा सुरू होताच या तारांच्या स्पर्शाने वीज पुरवठा गुल होतो. अनेक भागातील डीपी दुरुस्त करण्यात आलेल्या नाही. काही ठिकाणी चालचलाऊ कामे झाली. एकसोय वीज पुरवठा राहावा यासाठी काहीही उपाय केलेले नाहीत. कमी जास्त होणाऱ्या वीज प्रवाहामुळे विद्युत मोटारी जळतात. घरगुती उपकरणांनाही फटका बसतो.शेतातील मोटारपंप जळाल्याने शेती पिकांचे सिंचन होत नाही. यात शेतमालाचे नुकसान होते. दुसरीकडे मोटारपंप दुरुस्तीचा आर्थिक फटका बसतो. अनेक गावातील पाणीपुरवठा योजना बंद राहते. आधीच पाणीटंचाई असताना नळाचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांची भर उन्हात पायपीट होते. या सर्व परिस्थितीला विद्युत कंपनीचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.खासगी वायरमनकडून कामाची जोखीमविजेची समस्या निर्माण झाल्यास विद्युत कंपनीचे वायरमन उपलब्ध होत नाही. अशावेळी गरजवंतांना नाईलाजाने खासगी वायरमनकडून कामे करून घ्यावी लागतात. त्यांच्याकडून कामे करून घेताना मोठी जोखीम स्वीकारावी लागते. एखाद्यावेळी अपघात झाल्यास मोठे नुकसान होण्याची भीती आहे. काही ठिकाणी विद्युत कंपनीच्या वायरमनकडूनच अशा लोकांचा वापर केला जात आहे. विजेतील बिघाड स्वत: दुरुस्त न करता अकुशल वायरमनकडून कामे करून घेतली जाते. अपघात झाल्यास अशा खासगी व्यक्तीच्या कुटुंबाचे नुकसान होते. शिवाय विद्युत कंपनीवर ठपका बसतो. तरीही वायरमनविरूद्ध कारवाईची हिंमत दाखविली जात नाही.

टॅग्स :electricityवीज