शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

नेर ग्रामीणमध्ये विजेचे वांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 22:25 IST

थोडाही वारा सुटल्यास तालुक्याच्या ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित होतो. दिवस असो वा रात्र तक्रार करूनही विद्युत कंपनीचे कर्मचारी वीज सुरळीत करण्यासाठी पोहोचत नाहीत. काही ठिकाणी तर ४८ तासपर्यंत वीज पुरवठा बंद राहतो. गर्मीमुळे जीव कासावीस होतो.

ठळक मुद्देसिंचनाचा प्रश्न गंभीर : गर्मीने जीव कासावीस, पंखे-कुलर बंद, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : थोडाही वारा सुटल्यास तालुक्याच्या ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित होतो. दिवस असो वा रात्र तक्रार करूनही विद्युत कंपनीचे कर्मचारी वीज सुरळीत करण्यासाठी पोहोचत नाहीत. काही ठिकाणी तर ४८ तासपर्यंत वीज पुरवठा बंद राहतो. गर्मीमुळे जीव कासावीस होतो. कुलर-पंखे घराची शोभा वाढविणारे ठरत आहेत. दुसरीकडे पाण्याअभावी शेतातील पिके वाळत आहे. कितीही तक्रारी केल्या तरी विद्युत कंपनीचे कर्मचारीच काय, तर अधिकारीही दुर्लक्ष करत आहे. परिणामी नागरिकांचा संताप वाढत आहे.विद्युत कंपनीचा उदासीन कारभार नवीन राहिलेला नाही. यामध्ये सुधारणा होण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाही. कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्याने ग्रामीण भागात विजेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी कुणीही उपलब्ध होत नाही. चार ते पाच दिवसपर्यंत वीज पुरवठा बंद राहतो. याचा सर्वाधिक फटका पाणीपुरवठ्याच्या योजनांना बसतो. पीठ गिरण्याही बंद राहात असल्याने हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचा पोटमारा होतो.उन्हाळ्यात करावयाची कामे विद्युत कंपनीने केली नाही. झाडाच्या वाढलेल्या फांद्या तोडल्या नाही. वारा सुरू होताच या तारांच्या स्पर्शाने वीज पुरवठा गुल होतो. अनेक भागातील डीपी दुरुस्त करण्यात आलेल्या नाही. काही ठिकाणी चालचलाऊ कामे झाली. एकसोय वीज पुरवठा राहावा यासाठी काहीही उपाय केलेले नाहीत. कमी जास्त होणाऱ्या वीज प्रवाहामुळे विद्युत मोटारी जळतात. घरगुती उपकरणांनाही फटका बसतो.शेतातील मोटारपंप जळाल्याने शेती पिकांचे सिंचन होत नाही. यात शेतमालाचे नुकसान होते. दुसरीकडे मोटारपंप दुरुस्तीचा आर्थिक फटका बसतो. अनेक गावातील पाणीपुरवठा योजना बंद राहते. आधीच पाणीटंचाई असताना नळाचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांची भर उन्हात पायपीट होते. या सर्व परिस्थितीला विद्युत कंपनीचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.खासगी वायरमनकडून कामाची जोखीमविजेची समस्या निर्माण झाल्यास विद्युत कंपनीचे वायरमन उपलब्ध होत नाही. अशावेळी गरजवंतांना नाईलाजाने खासगी वायरमनकडून कामे करून घ्यावी लागतात. त्यांच्याकडून कामे करून घेताना मोठी जोखीम स्वीकारावी लागते. एखाद्यावेळी अपघात झाल्यास मोठे नुकसान होण्याची भीती आहे. काही ठिकाणी विद्युत कंपनीच्या वायरमनकडूनच अशा लोकांचा वापर केला जात आहे. विजेतील बिघाड स्वत: दुरुस्त न करता अकुशल वायरमनकडून कामे करून घेतली जाते. अपघात झाल्यास अशा खासगी व्यक्तीच्या कुटुंबाचे नुकसान होते. शिवाय विद्युत कंपनीवर ठपका बसतो. तरीही वायरमनविरूद्ध कारवाईची हिंमत दाखविली जात नाही.

टॅग्स :electricityवीज