शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आठ हजार नागरिकांना सर्दी, खोकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:01 IST

आरोग्य विभागाने आशा, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेवक यांच्या मदतीने सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. २३ लाख ८६ हजार ३१९ नागरिकांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. गत आठ दिवसात २० लाख ६४ हजार ६६४ व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणातून अनेक महत्वपूर्ण बाबी पुढे आल्या आहे.

ठळक मुद्देसर्वेक्षण : ३० हजार परप्रांतीयांचीही आरोग्य तपासणी, दहा हजार होम क्वारंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना बाधितांचा प्रभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर उपाययोजना करीत आहे. या मोहिमेत आठ हजार नागरिकांना सर्दी, खोकला असल्याची बाब पुढे आली आहे. मात्र त्यांना कोरोना सारखे लक्षणे नसल्याचा निर्वाळा आरोग्य विभागाने दिला आहे.जिल्ह्यातील दोन हजार ४० गावांमध्ये आरोग्य विभागाने नागरिकांची तपासणी हाती घेतली आहे. यामध्ये जिल्ह्यातील नागरिकांसह परजिल्ह्यातून आलेले, परराज्यातून आलेले, परदेशातून आलेले अशा विविध बाबींची नोंद घेतली जात आहे. यासोबतच त्यांच्या आरोग्याची स्थिती काय आहे याबाबत अहवाल नोंदविला जात आहे.आरोग्य विभागाने आशा, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेवक यांच्या मदतीने सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. २३ लाख ८६ हजार ३१९ नागरिकांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. गत आठ दिवसात २० लाख ६४ हजार ६६४ व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणातून अनेक महत्वपूर्ण बाबी पुढे आल्या आहे. यामुळे आता पुढील उपाययोजना आणि त्याचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाला दिशा मिळणार आहे. या सर्वेक्षणात आठ हजार ७६६ नागरिकांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असल्याचे पुढे आले आहे.ही लक्षणे वातावरण बदलामुळे असल्याचे सर्वेक्षणाअंती स्पष्ट झाले आहे. यानंतरही या व्यक्तींना सर्दी, खोकला, ताप या आजारातील औषधांचे वितरण आरोग्य विभाग करणार आहे.कोरोना सदृश्य लक्षणे इतर नागरिकांमध्ये दिसले नाही. मात्र त्यानंतरही दररोज आरोग्याची तपासणी करण्याच्या सूचना गावपातळीवर पाठविण्यात आल्या आहे. या दृष्टीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. कुणाची प्रकृती खालावल्यास तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे रुग्णांना हलविण्याच्या उपाययोजना यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर आरोग्यासंदर्भात लक्षणे आढळल्यास त्यांना तत्काळ आयसोलेशन वार्डात हलविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठोस उपाययोजना केल्या जात आहे. पुढील काळात यामध्ये आणखी काही बदल होण्याची शक्यता आहे.१९ हजार नागरिक निघाले परिघाबाहेरपरजिल्ह्यातून ३० हजार ८५७ व्यक्ती दाखल झाले आहे. यामध्ये मुंबई, पुणे या शहरासह परराज्यातूनही आलेल्या नागरिकांचा समावेश आहे. यामधील १९ हजार ९३८ व्यक्ती १४ दिवस होम क्वारंटाईन होत्या. त्यांचा १४ दिवसाचा कालावधी पूर्ण होताच त्यांना परिघाबाहेर काढण्यात आले आहे. दहा हजार ९१९ व्यक्ती होम क्वारंटाईन आहे. या व्यक्तींना १४ दिवस घरातच राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. या व्यक्तींची १४ ही दिवस आरोग्य विभाग तपासणी करणार आहे. त्यांच्यात कुठले लक्षणे आढळली तर तत्काळ तालुका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्या जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या